शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक हिंसाचार रोखण्यात संवादाचे माध्यम महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 06:38 IST

हिंसाचार करणारी व्यक्ती कोणी अट्टल गुन्हेगार नसते किंवा तिच्यावर होणारी हिंसा छळ हा कुठे चौकात वा बाजारात नाही, तर तिच्या स्वत:च्या घरात व जवळच्या व्यक्तीकडून होत असतो.

- अ‍ॅड. सुनीता खंडाळे (महिला व बाल विषयाच्या अभ्यासक)कौटुंबिक हिंसाचार या अत्यंत ज्वलंत व संवेदनशील विषयावर अजूनही मोकळेपणाने बोलले जात नाही. समाज काय म्हणेल, या एका गोष्टीमुळे बहुतांशजण त्रास सहन करतात. फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष, लहान मुलेही याचे बळी आहेत. कौटुंबिक हिंसाचार हा केवळ शारीरिक छळ नसून शाब्दिक, लैंगिक, मानसिक, आर्थिक, आदींचा त्यात समावेश होतो. विशेषत: अपत्य नसल्यामुळे स्त्रीला हिणवणे किंवा धमकावणे, त्रास देणे असे प्रकार घडतात. तसेच मनाविरुद्ध गर्भधारणेची सक्ती करणे, तिचा जीव धोक्यात घालणे, तिच्या नातेवाइकाकडे हुंड्याची मागणी करणे, आदी अनेक बाबी कौटुंबिक हिंसाचारात मोडतात.

हिंसाचार करणारी व्यक्ती कोणी अट्टल गुन्हेगार नसते किंवा तिच्यावर होणारी हिंसा छळ हा कुठे चौकात वा बाजारात नाही, तर तिच्या स्वत:च्या घरात व जवळच्या व्यक्तीकडून होत असतो. या प्रकाराला छोट्या-मोठ्या कुरबुरींपासून सुरुवात होते. बऱ्याचदा स्त्रिया माघार घेतात; पण कोणतीही गोष्ट सहनशीलतेच्या पलीकडे गेली की, त्या माघार घेत नाहीत. गेल्या काही दिवसांत मला आलेले कॉल्स आणि त्यावर झालेल्या संभाषणावरून काही गोष्टी स्पष्ट झाल्या की, कौटुंबिक वाद झाला तर बहुतांश स्त्रिया माघार घेऊन तडजोड करतात. असे असूनही बºयाचदा प्रत्यक्षात मात्र तिला सासरचे लोक अपमानित करतात. तुझेच काहीतरी चुकलं असेल, तू रागीट आहेस, तू सांभाळून घेतलं पाहिजे असे तिच्यावर बिंबविले जाते. त्यांना मात्र कोणी काही सांगत नाहीत. अशा वेळेस तिला माहेरी जावेसे वाटले, तर तिथे तिला खरीखोटी ऐकविली जाते.

काही ठिकाणी तिला माहेरचाही प्रतिसाद मिळत नाही. एवढा खर्च करून घरच्यांनी लग्न लावून दिले. हुंडा दिला. दागिने दिले आणि आता त्यांना सांगितले तर त्यांना ते सहन होणार नाही, या भीतीने स्त्रियाही फार बोलत नाहीत. अशा वेळेस त्यांचा मानसिक त्रास वाढू लागतो. सतत अशी वेळ येत राहिली, तर पती-पत्नीमधील प्रेम हळूहळू लोप पावू लागते. मग वाद विकोपाला जातो. शारीरिक संबंधात तणाव येतो. बºयाचदा जबरदस्ती होते. स्त्रिया प्रतिकार करू लागतात. परिणामी, हिंसा वाढू लागते. ज्याची परिणती स्त्रीने घर सोडून जाणे, घटस्फोट घेणे किंवा आत्महत्या करणे यांपैकी कशातही होऊ शकते.

जसे मी आधी म्हटल्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी केवळ स्त्रियाच आहेत असं नाही, तर कित्येक पुरुषही आहेत. बºयाच वेळा पुरुष आणि त्यांच्या कुटुंबीयांना खोट्या आरोपाखाली अडकविले जाते. आपल्या पितृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषावर अन्याय, अत्याचार होतो, हे कोणी मान्यच करीत नाही. त्यामुळे पुरुष याविषयी कुठेही तक्रार करीत नाहीत व कोणी यासंदर्भात तक्रार केलीच, तर त्याला पुरुषासारखा पुरुष तू बायकांसारख्या काय तक्रारी करतोस, असे म्हटले जाते. तूच तुझा विषय संपव, असे सल्लेही दिले जातात आणि त्यातूनच मन:स्ताप, दारूचे व्यसन, कटकटी यांमुळे घरातील वातावरण बिघडते आणि त्यातूनच हिंसाचार वाढीस लागतो.

लॉकडाऊनपूर्वी असे समजले जायचे की, पती-पत्नीमध्ये नीट संवाद होत नसल्याचे कारण हे आहे की, दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे समज-गैरसमज वाढतात. त्यातूनच वाद निर्माण होतात; परंतु लॉकडाऊनमुळे घरी राहण्याची जेव्हा सक्ती केली, त्यावेळी मात्र हद्दच झाली. बºयाच ठिकाणी एकमेकांचा अतिसहवासही नकोसा झाला आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली. ह्या विषयाने अतिशय गंभीर स्वरूप धारण केले. त्यामुळे स्त्रियांना तसेच बालकांना संरक्षण मिळावे यासाठी विविध स्तरावर काम सुरू आहे. परंतु, हा कौटुंबिक वादाचा विषय असल्यामुळे आपल्या घरातील वाद स्वत: सोडविण्याचा प्रयत्न करणेच योग्य. कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या वाचल्या की साहजिकच आपल्याला चीड येते आणि हे थांबविण्यासाठी आपण काय करू शकतो, असा विचार करतो. मी म्हणेन, कौटुंबिक हिंसाचारात वाढ होऊ न देण्यासाठी सर्वांनीच आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत.

बºयाच वेळेला कौटुंबिक प्रकरण म्हणून आपण त्यात हस्तक्षेप करीत नाही आणि पीडितही कुटुंबीयांच्या भीतीपोटी कुणाला काही सांगत नाही. अशावेळेस आपण पोलिसांकडे तक्रार करावी किंवा सामाजिक संस्थांना कळविल्यास ती पीडितेसाठी एकप्रकारची मदत ठरू शकते. कौटुंबिक हिंसाचार या अत्यंत नाजूक व भावनिक विषयावर आपण सर्वांशी बोलले पाहिजे. स्त्री असो वा पुरुष, आपल्याला दैनंदिन जीवनात येणाºया समस्यांवर जवळच्या व्यक्तींशी चर्चा केली पाहिजे. यातून अनेक प्रश्न सुटतात आणि विचारपूर्वक व सामंजस्याने केलेले भाष्य फायद्याचे ठरते. असे करून तर बघा, नक्कीच यामुळे आपल्यातील वाद तर दूर होतीलच; शिवाय आपल्यातील चांगला संवाद इतरही कुणाचे आयुष्य सुंदर बनवू शकेल आणि तुमचे नाते विकसित व्हायला मदत होईल.

संवादाची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासून होऊ शकते. त्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नाही. आपली गरज आणि अपेक्षा यातील फरक कळायला पाहिजे. केवळ गरजांचाच विचार करून त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केल्यास त्या सहज पूर्ण होऊ शकतील. संयम व समजूतदारपणामुळे आपल्या जीवनात सुख, शांती आणि समाधान टिकविण्यात यशस्वी होऊ. शेवटी कुटुंबाच्या आनंदाशिवाय काहीही महत्त्वाचे नाही, हे मात्र खरे.

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसा