शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

भाष्य - इंजीन ‘रुळावले’?

By admin | Updated: January 12, 2017 00:15 IST

आखाड्यात उतरलेले दोन्ही मल्ल बराच काळ शड्डू ठोकत राहून प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत

आखाड्यात उतरलेले दोन्ही मल्ल बराच काळ शड्डू ठोकत राहून प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत असतात आणि त्याचवेळी समोरच्याकडून हल्ला केला जाण्याची प्रतीक्षाही करीत असतात. कोण जाणे, कदाचित कुस्तीमध्ये हल्ल्यापेक्षा प्रतिहल्ला अधिक परिणामकारक ठरत असावा. पण राजकारणात मात्र तो हमखास परिणामकारक ठरत असतो. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपा-सेना युती संपुष्टात आणण्याची अधिकृत आणि एकतर्फी घोषणा त्या काळातील मुख्यमंत्रिपदाचे स्वयंभू व स्वयंघोषित भावी मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी केली आणि त्यानंतर ते सातत्याने शिवसेनेच्या प्रतिहल्ल्यांचे लक्ष्य राहिले. कदाचित त्यामुळेच की काय राज्यातील जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांंमध्ये या दोन्ही पक्षांच्या युतीची अथवा युतीभंगाची घोषणा कोणी करावी किंवा त्याकामी कुणी पुढाकार घ्यावा, यावरुन उभय युतीकरांमध्ये परस्परांना जोखण्याची स्पर्धा चालली आहे. धमक असेल तर युती तोडा, अशी गर्जना शिवसेनेने अनेकवार केली असली तरी भाजपाने अद्याप सेनेला अपेक्षित असलेली कथित धमक दाखविलेली नाही. मुख्यमंत्री युतीचे समर्थक आहेत पण मंत्री-आमदार मात्र विरोधक आहेत असे केवळ पतंग उडविणे सुरु आहे. इकडे ही घुळघुळ सुरु असताना मनसेचे कर्तेधर्ते राज ठाकरे यांनी मात्र कुणाकडून प्रस्ताव आलाच तर युतीचा विचार करु असे विधान केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. जर ते खरे असेल तर मनसेचे ‘इंजीन’ प्रथमच ‘रुळावर’ आले आहे असे म्हणता येईल. मनसेच्या तुलनेत शिवसेना आणि भाजपा यांची ताकद अफाट असली तरी ही ताकद स्वबळावर मुंबई वा महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी पुरेशी नाही याचे त्या दोहोंना भान आहे. त्यामुळेच हा ‘असंगाशी संग आहे’ हे जाणवत असूनही ते एकत्र आले आहेत. राज ठाकरे मात्र आजवर या भानाशीदेखील तसे फटकूनच वागत आले. राज्यातील लोक आपल्या बोलण्यावर लट्टू झाले आहेत तेव्हां ते आपल्या पाठीशी उभे राहाणारच आहेत, मग पाहिजे कशाला कुणी वाटेकरी असाच विचार ते आजवर करीत आले. पण आता ते भानावर आलेले दिसतात. त्यांचे हे भान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तूर्तास तरी ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणून अव्हेरले आहे. भाजपा मात्र कदाचित दोन्ही बंधूंना झुलवत ठेऊ शकते.