शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

भाष्य - इंजीन ‘रुळावले’?

By admin | Updated: January 12, 2017 00:15 IST

आखाड्यात उतरलेले दोन्ही मल्ल बराच काळ शड्डू ठोकत राहून प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत

आखाड्यात उतरलेले दोन्ही मल्ल बराच काळ शड्डू ठोकत राहून प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत असतात आणि त्याचवेळी समोरच्याकडून हल्ला केला जाण्याची प्रतीक्षाही करीत असतात. कोण जाणे, कदाचित कुस्तीमध्ये हल्ल्यापेक्षा प्रतिहल्ला अधिक परिणामकारक ठरत असावा. पण राजकारणात मात्र तो हमखास परिणामकारक ठरत असतो. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपा-सेना युती संपुष्टात आणण्याची अधिकृत आणि एकतर्फी घोषणा त्या काळातील मुख्यमंत्रिपदाचे स्वयंभू व स्वयंघोषित भावी मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी केली आणि त्यानंतर ते सातत्याने शिवसेनेच्या प्रतिहल्ल्यांचे लक्ष्य राहिले. कदाचित त्यामुळेच की काय राज्यातील जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांंमध्ये या दोन्ही पक्षांच्या युतीची अथवा युतीभंगाची घोषणा कोणी करावी किंवा त्याकामी कुणी पुढाकार घ्यावा, यावरुन उभय युतीकरांमध्ये परस्परांना जोखण्याची स्पर्धा चालली आहे. धमक असेल तर युती तोडा, अशी गर्जना शिवसेनेने अनेकवार केली असली तरी भाजपाने अद्याप सेनेला अपेक्षित असलेली कथित धमक दाखविलेली नाही. मुख्यमंत्री युतीचे समर्थक आहेत पण मंत्री-आमदार मात्र विरोधक आहेत असे केवळ पतंग उडविणे सुरु आहे. इकडे ही घुळघुळ सुरु असताना मनसेचे कर्तेधर्ते राज ठाकरे यांनी मात्र कुणाकडून प्रस्ताव आलाच तर युतीचा विचार करु असे विधान केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. जर ते खरे असेल तर मनसेचे ‘इंजीन’ प्रथमच ‘रुळावर’ आले आहे असे म्हणता येईल. मनसेच्या तुलनेत शिवसेना आणि भाजपा यांची ताकद अफाट असली तरी ही ताकद स्वबळावर मुंबई वा महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी पुरेशी नाही याचे त्या दोहोंना भान आहे. त्यामुळेच हा ‘असंगाशी संग आहे’ हे जाणवत असूनही ते एकत्र आले आहेत. राज ठाकरे मात्र आजवर या भानाशीदेखील तसे फटकूनच वागत आले. राज्यातील लोक आपल्या बोलण्यावर लट्टू झाले आहेत तेव्हां ते आपल्या पाठीशी उभे राहाणारच आहेत, मग पाहिजे कशाला कुणी वाटेकरी असाच विचार ते आजवर करीत आले. पण आता ते भानावर आलेले दिसतात. त्यांचे हे भान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तूर्तास तरी ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणून अव्हेरले आहे. भाजपा मात्र कदाचित दोन्ही बंधूंना झुलवत ठेऊ शकते.