शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रंग मनुष्य स्वभावाची काळी बाजू दाखवणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 08:20 IST

सर्वत्र धुळवडीचा माहोल आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर होळी साजरी होते आहे. रंगाच्या या वातावरणात मनुष्य ...

सर्वत्र धुळवडीचा माहोल आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर होळी साजरी होते आहे. रंगाच्या या वातावरणात मनुष्य स्वभावाच्या वेगवेगळ्या छटांचेही अनोखे दर्शन होताना दिसते आहे. अर्थात हे रंग मनुष्य स्वभावाची काळी बाजू दाखवणारे आहेत. ज्या कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे आपण रंगोत्सव साजरा करू शकलो नव्हतो, त्या कोरोनाच्या मृत वारसांच्या मदतनिधीवरून बराच गदारोळ उडाला आहे. सर्वोच्च न्यायालयाला याची दखल घेऊन कान उपटवावे लागले यातच सर्व काही आले. कोरोनाकाळात ज्या घरात मृत्यू झाले त्यांच्या जवळच्या नातेवाईकाला ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशानंतर काही राज्यात मदत देण्यावरुन गोंधळ उडाला होता.

खरेतर घरातली कमावती व्यक्ती गेल्याने ते घर वाचविण्यासाठी गुजरात सरकारने सर्वप्रथम ही योजना राबविली. तेच मॉडेल योग्य गृहीत धरत सर्वोच्च न्यायालयाने सानुग्रह अनुदानाचा आदेश दिला. आता ज्या घरात आई-वडील दोघांचेही निधन झाले असेल तर भरपाई ५० हजाराची द्यायची की एक लाखाची, असा प्रश्न घेऊन आसाम सरकार न्यायालयात गेले होते. त्यावेळी बऱ्याच राज्यात पैशांसाठी खोटे प्रमाणपत्र देऊन पैसे लाटण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे साहजिकच न्यायमूर्तींनी संताप व्यक्त केला. नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. खरेतर हा संताप येणे हे स्वाभाविक म्हणायला हवे. पण पैशांसाठी कुठल्याही थराला जाणारी जमात तशी सर्वत्र पाहायला मिळते. कोरोनातून प्रत्येक जण काही ना काही शिकला.

माणुसकीचे गहिरे रंगही अनुभवाला आले. या महामारीच्या लाटेने आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला गेला. कोट्यवधी बेरोजगार झाले. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. काही ठिकाणी कुटुंबच्या कुटुंब संपली. त्यातूनही काही राक्षसी वृत्ती मात्र जिवंत राहिल्या. त्यांनी कायद्याच्या कचाट्यातून पळवाट काढत मृतांचे खोटे दावे सरकारकडे सादर केले. त्यामुळे नेमकी मदत योग्य कुटुंबापर्यंत पोहचते, की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली. आतापर्यंत  देशभरामध्ये जवळपास पाच लाख १५ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापुरते सांगायचे तर २ लाख ३८ हजार अर्ज सरकारकडे आले आहेत. त्यातील जवळपास दीड लाख अर्ज सरकारने मंजूरही केले आहेत. प्रत्यक्ष मृत्यू आणि आलेले अर्ज यातही तफावत आहे. अनेक मृत्यू प्रमाणपत्रावर कोविडचा उल्लेख नाही, त्यामुळे वाद-प्रतिवाद होत आहेत. औरंगाबादमध्येही अनेकांची नावे वगळण्याचा प्रकार घडला होता.

‘लोकमत’ने पाठपुरावा करुन त्यांना मदत देण्यास भाग पाडले. अशा अनेक घटनांचे रंग या मदतीवेळी पाहावयास  मिळत आहेत. ज्या घरात कमावती व्यक्ती कोरोनाने गिळंकृत केली त्या कुटुंबाला प्राधान्याने मदत मिळायला हवी यात शंका नाही, पण ही झाली आदर्श भावना. प्रत्यक्ष चित्र खूप वेगळे दिसते. आधीच पिचलेल्या या कुटुंबांना मदतीचे पुरेसे भानही नाही. काही राजकीय कार्यकर्ते मदतीस धावले आहेत, पण काही लुबाडणाऱ्या वृत्तीही यात घुसल्या आहेत. त्यामुळे एका चांगल्या भावनेने उभे राहिलेल्या योजनेचे ‘वाटोळे’ होताना दिसत आहे. अशाने सर्वसामान्यांचा चांगल्या गोष्टींवरचाही विश्वास उडेल. हा गेलेला विश्वास परत मिळविणे अतिशय अवघड गोष्ट आहे.

सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यात सुधारणा होईल अशी आशा आहे. कोर्टाने उच्चारलेला ‘नैतिकता’ शब्द हळूहळू फक्त पुस्तकी राहिला का, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ढासळते समाजभान रोखण्यासाठी चांगल्या मनोवृत्तीना अधिक कष्टाने काम करावे लागणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्य सरकारी अधिकारी अतिशय संथ गतीने काम करीत आहेत. त्यामुळे मदत मिळायला विलंब होत आहे.

३० दिवसांत मदत देण्याचे आदेश असताना अनेकांना तीन-तीन महिने वाट पाहावी लागली आहे. अनेक कुटुंबे कोरोनामुळे विपन्नावस्थेत गेली असताना सरकारने संवेदनशीलपणे अशी प्रकरणे हाताळायला हवी होती. त्यातून काही टाळूवरची लोणी खाणारी मंडळी घुसल्याने मदत योग्य ठिकाणी जाते की नाही, याविषयी शंकेची स्थिती निर्माण झाली. सुदैवाने आज कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. मृत्यूचा आकडाही नीचांकी आहे. कोरोना हळूहळू संपेलही, तो संपलाच पाहिजे, पण माणुसकी संपता कामा नये. न्यायालयाचा संताप त्या भावनेतून व्यक्त झाला होता, हे कुठेतरी समजावून घ्यायला हवे.

टॅग्स :Holiहोळी 2022