शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोसळलेली सुरक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:49 IST

रेल्वेला श्रीमंती चोचले पुरवणाऱ्या प्रकल्पांपेक्षा सुरक्षित, सुसह्य प्रवासाची गरज आहे, या मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांच्या सल्ल्याचे महत्त्व किती आहे, हे दुस-याच दिवशी अंधेरीत रेल्वेमार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेने दाखवून दिले.

रेल्वेला श्रीमंती चोचले पुरवणाऱ्या प्रकल्पांपेक्षा सुरक्षित, सुसह्य प्रवासाची गरज आहे, या मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांच्या सल्ल्याचे महत्त्व किती आहे, हे दुसºयाच दिवशी अंधेरीत रेल्वेमार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेने दाखवून दिले. त्याचवेळी पुलाखालून एखादी लोकल जात असती, तर अनर्थ ओढवला असता. दहा महिन्यांपूर्वी एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर पायाभूत सुविधांवर भर दिल्याचा दावा रेल्वेने केला. स्ट्रक्चरल आॅडिट करत सारे पूल सुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आला. तो किती तकलादू होता, याची प्रचिती या दुर्घटनेमुळे आली. सुरक्षेचा अधिभार वसूल करूनही मुंबईच्या ७५ लाख उपनगरी प्रवाशांची सुरक्षा कशी वाºयावर आहे, हे नव्याने समोर आले. यापूर्वी ठाण्यात लोकलवर जलवाहिनी पडली होती. डोंबिवलीत काम सुरू असलेला पादचारी पूल कोसळला होता. असह्य गर्दीमुळे गाडीतून पडून प्रवासी मरण पावतात. दरवर्षी रेल्वे दुर्घटनांत सरासरी दोन हजार प्रवाशांचा बळी जातो. असे काही घडले, की लगोलग सुरक्षा बळकटीच्या घोषणा होतात, पण आपल्या हक्कासाठी प्रवाशांना वेठीला धरणाºया संघटना असोत, की तोट्याचे कारण दाखवून भाडेवाढ लादणारे प्रशासन, ज्या रेल्वे प्रवाशांच्या जिवावर हा कारभार सुरू आहे त्यांच्या जिवाची त्यांना किती फिकीर आहे, हेच या घटनेने दाखवून दिले. दुरुस्तीच्या कामांना पुरेसा वेळ मिळत नाही, म्हणून दर आठवड्याला मेगाब्लॉक घेतला जातो, त्याला दोन दशकांहून अधिक काळ उलटला. रोजची उपनगरी वाहतूक बंद असण्याचा काळ पावणेतीन तासांवरून साडेतीन तासांवर नेण्यात आला. तरीही रेल्वेचे रडगाणे सुरूच आहे. गाडी किती काळात फलाटावर येईल, ती वेळ दाखवून कधी पाळली जात नाही; पण ती इंडिकेटर बदलण्याचा खर्च वारंवार केला जातो, या वृत्तीतून रेल्वेची कार्यक्षमता चव्हाट्यावर येते. आताही दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांनी सुरक्षेवर ६५ हजार कोटी खर्च करणार असल्याचा आकडा जाहीर केला. तोवर सारे पूल सुरक्षित असल्याची ग्वाही देणाºया रेल्वे आणि पालिकेने जबाबदारी परस्परांवर ढकलण्याचा पोरखेळ पार पाडला. आजवरच्या कोणत्याही रेल्वे दुर्घटनांत कधी कुणावर जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. व्यवस्थेतील, यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवून कधी तांत्रिक; तर कधी मानवी चुकांवर बोट ठेवून चौकशीचा सोपस्कार उरकला जातो. त्यामुळे आताच्या घटनेनंतरही जर जबाबदारी निश्चित झाली नाही, तर चौकशीच्या नावावर वेळ काढला जाईल. पुन्हा नवी दुर्घटना घडेपर्यंत साºया यंत्रणा सुस्त राहतील आणि प्रवासी मात्र तसाच घुसमटत राहील.

टॅग्स :Andheri Bridge Collapsedअंधेरी पूल दुर्घटना