शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

कोसळलेली सुरक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:49 IST

रेल्वेला श्रीमंती चोचले पुरवणाऱ्या प्रकल्पांपेक्षा सुरक्षित, सुसह्य प्रवासाची गरज आहे, या मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांच्या सल्ल्याचे महत्त्व किती आहे, हे दुस-याच दिवशी अंधेरीत रेल्वेमार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेने दाखवून दिले.

रेल्वेला श्रीमंती चोचले पुरवणाऱ्या प्रकल्पांपेक्षा सुरक्षित, सुसह्य प्रवासाची गरज आहे, या मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांच्या सल्ल्याचे महत्त्व किती आहे, हे दुसºयाच दिवशी अंधेरीत रेल्वेमार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेने दाखवून दिले. त्याचवेळी पुलाखालून एखादी लोकल जात असती, तर अनर्थ ओढवला असता. दहा महिन्यांपूर्वी एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर पायाभूत सुविधांवर भर दिल्याचा दावा रेल्वेने केला. स्ट्रक्चरल आॅडिट करत सारे पूल सुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आला. तो किती तकलादू होता, याची प्रचिती या दुर्घटनेमुळे आली. सुरक्षेचा अधिभार वसूल करूनही मुंबईच्या ७५ लाख उपनगरी प्रवाशांची सुरक्षा कशी वाºयावर आहे, हे नव्याने समोर आले. यापूर्वी ठाण्यात लोकलवर जलवाहिनी पडली होती. डोंबिवलीत काम सुरू असलेला पादचारी पूल कोसळला होता. असह्य गर्दीमुळे गाडीतून पडून प्रवासी मरण पावतात. दरवर्षी रेल्वे दुर्घटनांत सरासरी दोन हजार प्रवाशांचा बळी जातो. असे काही घडले, की लगोलग सुरक्षा बळकटीच्या घोषणा होतात, पण आपल्या हक्कासाठी प्रवाशांना वेठीला धरणाºया संघटना असोत, की तोट्याचे कारण दाखवून भाडेवाढ लादणारे प्रशासन, ज्या रेल्वे प्रवाशांच्या जिवावर हा कारभार सुरू आहे त्यांच्या जिवाची त्यांना किती फिकीर आहे, हेच या घटनेने दाखवून दिले. दुरुस्तीच्या कामांना पुरेसा वेळ मिळत नाही, म्हणून दर आठवड्याला मेगाब्लॉक घेतला जातो, त्याला दोन दशकांहून अधिक काळ उलटला. रोजची उपनगरी वाहतूक बंद असण्याचा काळ पावणेतीन तासांवरून साडेतीन तासांवर नेण्यात आला. तरीही रेल्वेचे रडगाणे सुरूच आहे. गाडी किती काळात फलाटावर येईल, ती वेळ दाखवून कधी पाळली जात नाही; पण ती इंडिकेटर बदलण्याचा खर्च वारंवार केला जातो, या वृत्तीतून रेल्वेची कार्यक्षमता चव्हाट्यावर येते. आताही दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांनी सुरक्षेवर ६५ हजार कोटी खर्च करणार असल्याचा आकडा जाहीर केला. तोवर सारे पूल सुरक्षित असल्याची ग्वाही देणाºया रेल्वे आणि पालिकेने जबाबदारी परस्परांवर ढकलण्याचा पोरखेळ पार पाडला. आजवरच्या कोणत्याही रेल्वे दुर्घटनांत कधी कुणावर जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. व्यवस्थेतील, यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवून कधी तांत्रिक; तर कधी मानवी चुकांवर बोट ठेवून चौकशीचा सोपस्कार उरकला जातो. त्यामुळे आताच्या घटनेनंतरही जर जबाबदारी निश्चित झाली नाही, तर चौकशीच्या नावावर वेळ काढला जाईल. पुन्हा नवी दुर्घटना घडेपर्यंत साºया यंत्रणा सुस्त राहतील आणि प्रवासी मात्र तसाच घुसमटत राहील.

टॅग्स :Andheri Bridge Collapsedअंधेरी पूल दुर्घटना