शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

CM Uddhav Thackeray On CoronaVirus : पहले आप, पहले आप नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 02:08 IST

लागलीच झोपेतून जागे झाल्याप्रमाणे सरकारला कार्यालयीन वेळा बदलण्याची सुरसुरी आली.

‘पहले आप, पहले आप में दो नवाबो की गाडी छूट गयी’ अशी एक कहावत आहे. तशीच काहीशी अवस्था सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबत राज्य व केंद्र सरकारची आहे. निती आयोगाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने कार्यालयाच्या वेळा बदलण्याचा विचार करावा, अशी आग्रही मागणी धरली.  तुडुंब भरलेल्या लोकलला लटकून प्रवास करताना एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला की दरवेळी सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्याचा विषय चर्चेला येतो. गेले काही दिवस कोरोनाचा कहर आटोक्यात होता. मात्र, लोकल बहुतांशी सर्वांकरिता सुरू केल्यावर लोकांनी लग्नसमारंभापासून पिकनीक स्पॉटपर्यंत सर्वत्र गर्दी करायला सुरुवात करताच कोरोना वाढू लागला.

लागलीच झोपेतून जागे झाल्याप्रमाणे सरकारला कार्यालयीन वेळा बदलण्याची सुरसुरी आली. पण जर कार्यालयीन वेळा बदलायच्या तर त्याकरिता जी व्यवस्था करायला हवी, लोकांची मानसिकता बदलायला हवी, रेल्वेची सेवा रात्री उशिरापर्यंत किंवा अहोरात्र सुरू असायला हवी त्या दृष्टिकोनातून कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. अनेक खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देऊन कार्यालयाचे भाडे वाचविले आहे.  मागील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना एक तास उशिरा येऊन एक तास उशिरापर्यंत काम करण्याची मुभा दिली होती. त्यामागील हेतू अर्थातच काही कर्मचारी उशिरा आले तरी लोकल सेवेवरील ताण कमी व्हावा हा होता.

राज्य सरकारच्या सेवेतील केवळ १२ टक्के कर्मचाऱ्यांकडे सरकारी वसाहतीमधील घर आहे. उर्वरित कर्मचारी हे अंबरनाथ-बदलापूर किंवा वसई-विरारपासून तब्बल दोन तासांचा प्रवास करून येतात. सरकारी असो की खासगी, बहुतांश कार्यालयांची वेळ ही सकाळी नऊ ते अकरा यादरम्यान असते. त्यामुळे सकाळी साडेसात ते साडेनऊ ही रेल्वे प्रवासाची गर्दीची वेळ असते. त्याचप्रमाणे संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत कार्यालये सुटत असल्याने याच काळात रेल्वेला गर्दी होते. केंद्र, राज्य सरकारची काही खाती अशी आहेत की, त्यांचा थेट लोकांशी संबंध नाही. सर्वसामान्य माणूस या कार्यालयात दररोज पायधूळ झाडत नाही. अशा काही विभागांच्या कार्यालयीन वेळा या दुपारी दोन ते रात्री दहा केल्या तर काही बिघडत नाही.

अर्थात जोपर्यंत सरकार ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत कर्मचारी संघटना माना डोलवतील. मात्र, जेव्हा कर्मचारी विरोध करतील तेव्हा कदाचित संघटना विरोधाची भूमिका घेतील. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवायचे तर कठोर पावले उचलायला हवीत. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत मंत्रालय हलवण्याचा प्रस्ताव त्यांनी तयार केला होता. मात्र, अल्पजीवी कारकीर्द ठरलेल्या अंतुले यांनी तो प्रत्यक्षात आणण्यापूर्वी त्यांचे पद गेले. मुंबई महापालिकेचे मुख्यालय वांद्रे येथे हलवण्याकरिता राखीव ठेवलेला भूखंड बिल्डरच्या घशात घातला गेला. खरेतर हे निर्णय दूरगामी विचार करून घेतलेले होते. मात्र ऱ्हस्व दृष्टिकोन असलेल्या मंडळींनी ते हाणून पाडले. सरकारने वांद्रे-कुर्ला संकुल उभारले. तेथील भूखंड विदेशी बँका, हॉटेल, कॉर्पोरेट कंपन्यांना विकले. मात्र, मंत्रालयातील काही विभाग तेथे हलवले नाहीत.

सरकार हे कुठल्याही बिल्डरपेक्षा सर्वांत मोठे जमीन मालक असते. त्यामुळे ऐंशी-नव्वदच्या दशकात जेव्हा उपनगरे वाढू लागली तेव्हाच ठाणे, कल्याण, दहिसर, वसई येथे सरकारी कार्यालये हलवण्याचा व कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय व्हायला हवा होता. सरकारी कार्यालयातील ‘साहेबा’ला आपला कर्मचारी सतत डोळ्यासमोर लागतो. मंत्रालयाच्या आजूबाजूला वास्तव्य करणारे काही सनदी अधिकारी हे दुपारी जेवणाच्या सुटीत गायब होतात व सायंकाळी उशिरा येऊन रात्री उशिरापर्यंत काम करतात. अशा ‘साहेबां’नी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उशिरा येण्याची मुभा दिली पाहिजे.

रेल्वेनेही आपली सेवा रात्री उशिरापर्यंत किंवा अहोरात्र सुरू ठेवली पाहिजे तर कार्यालयीन वेळा बदलणे शक्य होईल. काही वर्षांपूर्वी मंत्रालयास भीषण आग लागल्यावर मंत्रालयाची इमारत पाडून तेथे व नवीन प्रशासन भवनाची जुनी इमारत पाडून तेथे उत्तुंग टॉवर उभे करण्याचा व सर्व सरकारी कार्यालये एका छताखाली आणण्याचा विचार झाला होता. मंत्रालयाजवळील मंत्र्यांचे जुने बंगले पाडून तेथेही टॉवर उभे केले जाणार होते. असे झाले असते तर कदाचित वरच्या श्रेणीतील सरकारी कर्मचाऱ्यांना दूरवरून प्रवास करून येण्याची गरज भासली नसती. मात्र, सरकारी तिजोरी रिकामी असल्यामुळे तो प्रस्ताव कागदावर राहिला. मात्र, केवळ राज्य व केंद्र सरकारने एकमेकांवर जबाबदारी ढकलू नये. ठोस कृती करावी.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस