शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

हवामान बदल आणि उद्योगांच्या सजगतेचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 04:48 IST

- शैलेश माळोदे ( हवामान बदलाचे अभ्यासक) सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) द्वारे नफ्यातील किमान दोन टक्के कंपन्यांनी समाजासाठी उपयुक्त कामांवर ...

- शैलेश माळोदे ( हवामान बदलाचे अभ्यासक)

सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) द्वारे नफ्यातील किमान दोन टक्के कंपन्यांनी समाजासाठी उपयुक्त कामांवर खर्च करणे बंधनकारक केल्यानंतर बऱ्याच कंपन्यांनी लेखापरीक्षण वा नियामकांच्या बडग्यापोटी तशी तजवीज करायला सुरुवात केली. परंतु समाजात उद्योग करून अब्जावधींचा नफा प्राप्त करणाºया कॉर्पोरेट सिटीझन्स (कंपन्या)नी हवामान बदलाचं संकट लक्षात घेऊन काय पावलं उचलली आहेत, हे मात्र अद्याप अनेकांच्या गावीही नाही. निदान भारतात तरी. त्यामुळेच केवळ कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून स्वत:बाबतची माहिती थातूरमातूर का होईना जाहीर करणं सोपा मार्ग आहे. अर्थात, यात काही सन्माननीय अपवादही आहेत. मात्र हवामान बदलाच्या संकटासंदर्भात नागरिकांद्वारे निदान जेवढी चर्चा होते तेवढीही कॉर्पोरेटच्या स्तरावर होताना दिसते का, हा संशोधनाचा विषय आहे.

भारताला तसं तूर्त बाजूला ठेवून आपण हवामान बदलाबाबतच्या संकटाविषयी जागतिक स्तरावर काय चित्र आहे, बहुराष्ट्रीय कंपन्या याबाबत काय करताना दिसताहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न कॉर्पोरेट डिस्क्लोजर प्रोजेक्ट (सीडीपी) या एका थिंक टँकच्या आकडेवारीच्या विश्लेषणातून करण्याचा प्रयत्न करूया.सिलीकॉन व्हॅलीसहित जगातील बहुतांश बड्या कंपन्या ते मोठमोठ्या युरोपीयन बँकांमध्ये याबाबत हालचाली सुरू झालेल्या असून पुढील पाच वर्षांत आपली बॉटमलाइन म्हणजे नफ्याची पातळी हवामान बदलाच्या संकटाच्या प्रभावामुळे दबावाखाली आल्यास काय करायचं याबाबत मंथन सुरू असल्याचं कॉर्पोरेट डिस्क्लोजर्सच्या विश्लेषणाअंती लक्षात येतं. शेअर होल्डर्स आणि नियामकांच्या दबावामुळे कंपन्यांनी आपली पृथ्वी तापल्यास विशिष्ट प्रकारचे वित्तीय प्रभाव पडतील याविषयी माहिती पुरविण्यास सुरुवात केलीय.

सीडीपीचे उत्तर अमेरिका विभागाचे अध्यक्ष ब्रुनो सारडा यांच्या मते, ‘कंपन्यांची संख्या तशी बरीच असली तरी हे अद्याप हिमनगाचं केवळ टोक आहे. अजून बºयाच कंपन्या याबाबत फारशा उत्साही नाही.’ सीडीपी जगभरातील कंपन्यांबरोबर काम करून त्यांना त्यांच्या व्यवसायातील हवामान बदलाच्या धोक्यामुळे निर्माण होणाºया संभाव्य धोक्यांविषयी आणि संधींविषयी सार्वजनिक पातळीवर माहिती देण्याबाबत काम करते. २0१८ मध्ये सुमारे ७000 पेक्षा जास्त कंपन्यांनी सीडीपीकडे अशा प्रकारच्या माहितीचे अहवाल सादर केले. सीडीपीने या वेळी प्रथमच कंपन्यांना तापत्या पृथ्वीचा त्यांच्या धंद्यावर होणाºया परिणामाबाबत वित्तीय बाबतीत आकडेवारी देण्यास सांगितलं होतं.

जगातल्या ५00 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी २१५ कंपन्यांच्या अहवालाचं विश्लेषण केल्यावर सीडीपीला जाणवलं की या कंपन्यांना पुढील काही दशकांतील हवामान बदलांमुळे सुमारे एक हजार अब्ज डॉलर्सचं नुकसान सोसावं लागणार आहे. कंपन्यांनी स्वत:च व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील पाच वर्षांत या वित्तीय जोखिमा प्रत्यक्षात जागवायला लागतील हे कटू सत्य आहे. या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या व्यवस्थापकांना हवामान बदलामुळे काय होईल आणि त्याबाबत कशी धोरणं असावीत याची जाणीव दिसते.

हिताची लि.सारख्या काही कंपन्यांनी आग्नेय आशियावर वाढलेलं पर्जन्यमान आणि पुराचा धोका यामुळे पुरवठादारांबाबत होणारं नुकसान टाळण्यासाठी काय करावं याबाबत विचार केलाय. एका सर्वात मोठ्या ब्राझिलियन बँकेनं म्हटलंय की, त्यांच्या भागात वाढत्या दुष्काळामुळे कर्जदारांची कर्जपरतफेडीची क्षमता घटेल. गुगलची पालक कंपनी अल्फाबेटनं वाढत्या तापमानामुळे अत्याधिक ऊर्जा मागणी असणाºया डेटा सेंटर्सना गार करण्यासाठीचा खर्च खूप वाढेल, अशी चिंता व्यक्त केलीय.

याउलट इतर अनेक कंपन्या हवामान बदलांविषयी लोकांची प्रतिक्रिया काय असेल यावर लक्ष ठेवून आहेत. ‘टोटल’ या फ्रेंच ऊर्जा कंपनीला विविध देशांद्वारे जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा भाग म्हणून खनिज इंधनांचे (तेल वा गॅस) साठे जाळून टाकणं अशक्य होईल याची भीती वाटते तर बीएएसएफ या जर्मन रसायन कंपनीला पर्यावरणाविषयी जागरूक भागधारक कंपनीपासून दूर जातील अशी भीती वाटते. हे झालं जागतिक स्तरावरील चित्र. भारतीय कंपन्यांचं काय? लवकरच याविषयी त्यांना काहीतरी हालचाल करावीच लागणार आहे. निदान सेबीने तरी काही तरी करावे.

टॅग्स :pollutionप्रदूषण