शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

थाळ्या-टाळ्या... आणि ऑक्सिजनच्या नळ्या!

By किरण अग्रवाल | Updated: April 23, 2021 05:03 IST

तांत्रिक चुकीपायी रुग्ण दगावल्याचे पाहून ओकसाबोकशी रडणारे नाशिकच्या रुग्णालयातले डॉक्टर्स - हे दृश्य विदीर्ण करणारे होते!

- किरण  अग्रवाल, निवासी संपादक, लोकमत, नाशिकआपत्ती कोणतीही असो, ती धडा घालून देत असते वा काहीतरी शिकवून जातेच जाते. पण आपल्याकडे हल्ली हरेक आपत्तीचे भांडवल आणि त्या भांडवलातून मग राजकारण करण्याचा प्रघात रूढ झाला आहे.  नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना याला अपवाद नाही.  एकीकडे कोरोनाबाधितांना रुग्णालयातील ऑक्सिजन बेड‌्स उपलब्ध होत नसल्याची सार्वत्रिक ओरड असताना दुसरीकडे नाशकात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तब्बल २४ रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ आली. या आपत्ती काळात मरण कसे स्वस्त होऊ पाहते आहे याचेच हे भयकारी चित्र !ही दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. रुग्णालयाच्या बाहेर गळती झाल्याने प्राणवायूचा पूर उफाळला असताना  आतले रुग्ण मात्र श्वासासाठी तडफडत गेले. विदीर्ण करणारी अशीच ही घटना. तिला कारणीभूत आहे ती व्यवस्थांची बेपर्वाई ! अवघ्या महिनाभरापूर्वीच बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन टाकीत द्रवरूप प्राणवायू भरला जात असताना त्या टाकीच्या जोडणीमधून गळती होतेच कशी, गळती सुरू झाल्यानंतर ती रोखण्यासाठी दीड ते दोन तासांची यातायात करण्याची वेळ का यावी, यंत्रणेच्या नियमित तपासणीची काहीही व्यवस्था, निकष नसावेत का, असे अनेक प्रश्न यातून समोर आले आहेत. 

नाशकातील ज्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही दुर्घटना घडली ते महानगरपालिकेचे रुग्णालय पूर्णतः कोरोनाबाधितांसाठी वाहिलेले आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच तेथे ऑक्सिजन टाकीची उभारणी करण्यात आली आहे. या टाक्या स्वतः बसविण्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्या भाड्याने घेतल्या आहेत, त्यामुळे त्यासंबंधीची हाताळणी करण्याचा ठेका, त्यातील अटी शर्ती आणि ठेकेदारीची गणिते यानिमित्ताने चर्चेत येऊन गेली आहेत. व्यवस्थेची हाताळणी ही जर ठेकेदाराची जबाबदारी असेल तर या गळतीची व त्यातून जीव गमावलेल्यांची जबाबदारी कोणाची?- या प्रश्नाचे उत्तर वेगळे शोधण्याची गरज नाही. राज्य शासनाने व महापालिकेनेही जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत, परंतु पैशाने संबंधितांचा जीव परत येणार नाही. झालेली हानी भरून निघणे शक्य नाही, त्यामुळे या संदर्भातील बेपर्वाईची सखोल चौकशी झाली पाहिजे!

सदर दुर्घटनेच्या निमित्ताने एकूणच आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करून आरोपांची राळ उडवणे सुरू झाले आहे. व्यवस्थेत काही दोष नक्कीच आहेत, साधनांची कमतरता जाणवते आहे हेदेखील खरे; परंतु म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवार्थींच्या परिश्रमांवर पाणी फेकणे हे आपल्याला शोभणारे नव्हे. कोरोना संसर्गाच्या धास्तीने जिथे रक्ताचे नाते असलेली हक्काची माणसे प्रत्यक्ष मदतीला न येता चार हात लांबूनच वावरतात, तिथे डॉक्टर्स, नर्सेस, वाॅर्डबॉय, मावश्या, रुग्णवाहिकांचे चालक  स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत सेवा बजावत आहेत. ज्या रुग्णालयात सदर दुर्घटना घडली तेथील डॉक्टर्स लिफ्ट बंद असताना ऑक्सिजनचे सिलिंडर्स आपल्या खांद्यावर घेऊन रुग्णांसाठी धावल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेले आहे. गेल्या वर्षभरापासून अविश्रांतपणे  आपले कर्तव्य बजावणारे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांना सध्या कोणत्या तणावातून जावे लागते आहे, याची कल्पनाही सामान्यांना करता येणार नाही. या डॉक्टरांना केवळ कोरोनायोद्धे म्हणून त्यांच्या हातात आपण सत्काराचे पुष्पगुच्छ देणार असू आणि त्यांचे रुग्ण ज्या नळीतून येणारा ऑक्सिजन श्वासात भरून मृत्यूशी  झगडा मांडून बसले आहेत, त्या नळ्याच  कोरड्या पडणार असतील, तर अख्खी व्यवस्था या डॉक्टरांची गुन्हेगार आहे असेच म्हणावे लागेल. भ्रष्टाचाराचा, बेपर्वाईचा, अनास्थेचा भुंगा लागलेली ही व्यवस्था अशीच खिळखिळी राहिली, तर डॉक्टरच काय खुद्द ईश्वरसुद्धा रुग्णांचे प्राण वाचवू शकणार नाही.

राज्य शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल काय यायचा तो येईलच; परंतु वैद्यकीय तांत्रिक सज्जता व तज्ज्ञता याकडे  लक्ष देणे किती गरजेचे असते, हे या घटनेने स्पष्ट केले आहे. एका तांत्रिक चुकीपायी कोरोना संसर्गातून सावरणारे रुग्ण डोळ्यादेखत दगावल्याचे पाहून अक्षरशः ओकसाबोकशी रडणारे या रुग्णालयातले डॉक्टर्स आणि कर्मचारी ‘लोकमत’च्या सहकाऱ्यांनी पाहिले आहेत. हे दृश्य विदीर्ण करणारे होते. डॉक्टरांसाठी थाळ्या - टाळ्या वाजवू नका, त्यांना हवी ती साधनसामग्री मिळेल एवढे फक्त पाहिले तरी पुरे आहे!वायू गळतीची घटना हा अपघात होता हे मान्य ! पण प्रशासन त्यातून काही धडा घेणार का हे महत्त्वाचे ! नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ही दुर्घटना घडली.  महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने, ऊठसूट राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांनाही आत्मपरीक्षणाची संधी आहे. ती त्यांनी गमावू नये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळती