शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

चीनची मग्रुरी आणि आपले मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:22 IST

चीनच्या लष्कराने उत्तराखंडच्या बाराहोती या चमोली जिल्ह्यातील भारतीय क्षेत्रात अतिक्रमण करून आपल्या वाढत्या आक्रमणखोरीचा नवा पुरावा पुढे केला आहे.

चीनच्या लष्कराने उत्तराखंडच्या बाराहोती या चमोली जिल्ह्यातील भारतीय क्षेत्रात अतिक्रमण करून आपल्या वाढत्या आक्रमणखोरीचा नवा पुरावा पुढे केला आहे. भारताचे संरक्षणविषयक सल्लागार अजित डोवल हे ब्रिक्सच्या बैठकीसाठी चीनला जाण्याच्या तयारीत असताना हे अतिक्रमण होणे ही चीनची आक्रमक वृत्ती भारताच्या लक्षात आणून देणारी बाब आहे. या भागात चिनी लष्कराने यापूर्वी अनेक आक्रमणे केली आहेत. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने या अतिक्रमणाची गंभीर दखल घेण्याचे टाळले असले तरी गेल्या १२ महिन्यात चीनने अशी ३००हून अधिक अतिक्रमणे या क्षेत्रात केली ही बाब गंभीर म्हणावी अशी नक्कीच आहे. बाराहोतीचे क्षेत्र हे दोन देशांतील वादाचे क्षेत्र ठरविण्यात आल्यामुळे त्याकडे भारताने बरीच वर्षे लक्ष दिले नाही. चीननेही आपले लष्कर तिकडे गेल्या अनेक वर्षांत पाठविले नाही. त्यामुळे त्याचे आताचे आक्रमण केवळ नवेच नाही तर त्या प्रदेशावरचा त्याचा अधिकार बजावून घेणारे आहे. आधीच डोकलाम या भूतानच्या सीमेवर भारत आणि चीनच्या फौजा समोरासमोर उभ्या आहेत. डोकलाम हे क्षेत्र भारताचे नाही. ते भूतानचे आहे. मात्र भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारताकडे असल्यामुळे त्यावर भारताची लष्करी पथके आता उभी आहेत. चीनचा दावा हा की डोकलामचा प्रदेश त्याचा आहे आणि त्यामुळे त्यातून भारतीय पथकांसारखीच भूतानची पथकेही मागे हटली पाहिजेत. अरुणाचल हे सबंध राज्य, उत्तराखंडचा बाराहोती हा प्रदेश, उत्तर प्रदेशचे सीमावर्ती भाग, नेपाळची दक्षिण सीमा याखेरीज लदाख हा काश्मीरच्या पूर्वेचा भाग यातील अनेक क्षेत्रांवर चीन आपला हक्क गेली अनेक वर्षे सांगत आहे. भारत आणि चीन यांच्यातील मॅकमहोन ही सीमारेषा त्याला मान्य नाही आणि या दोन देशांत नवी सीमारेषा आखण्याची मागणी तो करीत आहे. ती आखताना अर्थातच तो भारताच्या या सर्व प्रदेशांवर आपली मालकी सांगेल हे उघड आहे. चीनचा हा पवित्रा सीमावर्ती क्षेत्रातील भांडणांपुरता किंवा मर्यादित स्वरुपाचा आहे असे समजण्याचे कारण नाही. आठच दिवसांपूर्वी चीनच्या लष्कराने त्याचा ९०वा वर्धापनदिन साजरा केला. त्यात दहा हजार जवानांच्या संचलनासोबत सहाशे शस्त्रे त्याने जगाला दाखविली. या शस्त्रांत साडेतीनशेहून अधिक शस्त्रे नवी व जास्तीची संहारक असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आमचे लष्कर जगातल्या कोणत्याही लष्कराहून सामर्थ्यवान असून ते कोणाचाही पराभव करण्याची क्षमता राखणारे आहे, असे उद््गार त्या संचलनाच्यावेळी चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग यांनी काढले आहे. आपली ही ताकद भारतावरील अतिक्रमणातून तो देश आता दाखवू लागला आहे. पाकिस्तानने सूचना करताच आम्ही आमचे लष्कर काश्मिरात पाठवू अशी धमकी त्याने याआधीच भारताला दिली आहे. त्याचवेळी डोकलाममधून भारतीय पथके मागे गेली नाहीत तर आमचे लष्कर त्यांच्यावर आक्रमण करील असेही म्हटले आहे. आक्रमण करणे आणि आक्रमणाची धमकी देणे या दोन्ही गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणात सारख्याच गंभीरपणे घेतल्या जातात. काश्मीरवरील आक्रमणाची धमकी नवी असली तरी ती भारताला जास्तीची चिंता करायला लावणारी आहे. उत्तराखंडमधील आताचे आक्रमण ही त्या आक्रमणाची नांदी म्हणूनही पाहता येणारी आहे. उत्तराखंडमध्ये आपली सेना पाठवून चीन काश्मीरला भारताकडून होणारा जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा थांबवू शकणार आहे. एका अर्थाने त्यामुळे काश्मीरचा जीवनमार्गच (लाईफलाईन) त्याला अडवून धरता येणार आहे. चीन हे उघडउघड व सांगूनसवरून करताना दिसत आहे. थोडक्यात अरुणाचलपासून काश्मीरपर्यंतची भारताची चार हजार कि.मी.ची सारी उत्तरसीमाच चीनच्या आक्रमणाच्या छायेत आहे. आश्चर्य याचे की या आक्रमणाची घ्यावी तशी दखल भारताचे संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि प्रत्यक्ष पंतप्रधानांचे कार्यालयही घेताना दिसत नाही. पाकिस्तानबाबत ही मंत्रालये जेवढी संवेदनशीलता दाखवितात तेवढी त्यांना याबाबत दाखविता न येणे हे त्याच्या मुत्सद्देगिरीचे लक्षण नाही. चीनच्या वाढलेल्या सामर्थ्याची भारताने धास्ती घेतल्याचे ते चिन्ह आहे. देशाच्या उत्तरसीमेवर आक्रमणाचे ढग असे जमले असताना देशाचे पंतप्रधान आसामचा दौरा करतात, परराष्ट्र मंत्री त्याविषयी काही एक न बोलता मौन पाळतात आणि लष्करातील वरिष्ठ अधिकारी मात्र त्यांना न शोभणारी राजकीय धमकीवजा भाषा वापरताना दिसतात तेव्हा ते सारे देशाच्या परराष्ट्र नीतीत व विशेषत: चीनबाबत वापरायच्या धोरणात एकवाक्यता नसल्याचे लक्षण ठरते. चीनने डोकलामवर लष्कर पाठविले, सिक्कीमच्या उत्तरसीमेवर सैन्य तैनात केले आणि काश्मिरात लष्कर पाठविण्याची सरळ धमकी भारताला दिली तरी त्यावर देशाचे पंतप्रधान त्यांच्या ‘मन की बात’ बोलताना कधी दिसले नाहीत. याच काळात भारताच्या कॅग या वरिष्ठ अधिकाºयाने भारतीय लष्कराजवळ युद्धात जेमतेम दहा दिवस कामी येईल एवढीच शस्त्रसामुग्री असल्याचे जाहीर केले आहे. हा प्रकारही आक्रमणाला निमंत्रण देणारा आहे. चीन धमक्या देतो, आमची माणसे आपले दुबळेपण सांगतात आणि सरकार मौन धारण करते हा देशालाच विस्मयात टाकणारा प्रकार आहे.