शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

चीनची मग्रुरी आणि आपले मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:22 IST

चीनच्या लष्कराने उत्तराखंडच्या बाराहोती या चमोली जिल्ह्यातील भारतीय क्षेत्रात अतिक्रमण करून आपल्या वाढत्या आक्रमणखोरीचा नवा पुरावा पुढे केला आहे.

चीनच्या लष्कराने उत्तराखंडच्या बाराहोती या चमोली जिल्ह्यातील भारतीय क्षेत्रात अतिक्रमण करून आपल्या वाढत्या आक्रमणखोरीचा नवा पुरावा पुढे केला आहे. भारताचे संरक्षणविषयक सल्लागार अजित डोवल हे ब्रिक्सच्या बैठकीसाठी चीनला जाण्याच्या तयारीत असताना हे अतिक्रमण होणे ही चीनची आक्रमक वृत्ती भारताच्या लक्षात आणून देणारी बाब आहे. या भागात चिनी लष्कराने यापूर्वी अनेक आक्रमणे केली आहेत. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने या अतिक्रमणाची गंभीर दखल घेण्याचे टाळले असले तरी गेल्या १२ महिन्यात चीनने अशी ३००हून अधिक अतिक्रमणे या क्षेत्रात केली ही बाब गंभीर म्हणावी अशी नक्कीच आहे. बाराहोतीचे क्षेत्र हे दोन देशांतील वादाचे क्षेत्र ठरविण्यात आल्यामुळे त्याकडे भारताने बरीच वर्षे लक्ष दिले नाही. चीननेही आपले लष्कर तिकडे गेल्या अनेक वर्षांत पाठविले नाही. त्यामुळे त्याचे आताचे आक्रमण केवळ नवेच नाही तर त्या प्रदेशावरचा त्याचा अधिकार बजावून घेणारे आहे. आधीच डोकलाम या भूतानच्या सीमेवर भारत आणि चीनच्या फौजा समोरासमोर उभ्या आहेत. डोकलाम हे क्षेत्र भारताचे नाही. ते भूतानचे आहे. मात्र भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारताकडे असल्यामुळे त्यावर भारताची लष्करी पथके आता उभी आहेत. चीनचा दावा हा की डोकलामचा प्रदेश त्याचा आहे आणि त्यामुळे त्यातून भारतीय पथकांसारखीच भूतानची पथकेही मागे हटली पाहिजेत. अरुणाचल हे सबंध राज्य, उत्तराखंडचा बाराहोती हा प्रदेश, उत्तर प्रदेशचे सीमावर्ती भाग, नेपाळची दक्षिण सीमा याखेरीज लदाख हा काश्मीरच्या पूर्वेचा भाग यातील अनेक क्षेत्रांवर चीन आपला हक्क गेली अनेक वर्षे सांगत आहे. भारत आणि चीन यांच्यातील मॅकमहोन ही सीमारेषा त्याला मान्य नाही आणि या दोन देशांत नवी सीमारेषा आखण्याची मागणी तो करीत आहे. ती आखताना अर्थातच तो भारताच्या या सर्व प्रदेशांवर आपली मालकी सांगेल हे उघड आहे. चीनचा हा पवित्रा सीमावर्ती क्षेत्रातील भांडणांपुरता किंवा मर्यादित स्वरुपाचा आहे असे समजण्याचे कारण नाही. आठच दिवसांपूर्वी चीनच्या लष्कराने त्याचा ९०वा वर्धापनदिन साजरा केला. त्यात दहा हजार जवानांच्या संचलनासोबत सहाशे शस्त्रे त्याने जगाला दाखविली. या शस्त्रांत साडेतीनशेहून अधिक शस्त्रे नवी व जास्तीची संहारक असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आमचे लष्कर जगातल्या कोणत्याही लष्कराहून सामर्थ्यवान असून ते कोणाचाही पराभव करण्याची क्षमता राखणारे आहे, असे उद््गार त्या संचलनाच्यावेळी चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग यांनी काढले आहे. आपली ही ताकद भारतावरील अतिक्रमणातून तो देश आता दाखवू लागला आहे. पाकिस्तानने सूचना करताच आम्ही आमचे लष्कर काश्मिरात पाठवू अशी धमकी त्याने याआधीच भारताला दिली आहे. त्याचवेळी डोकलाममधून भारतीय पथके मागे गेली नाहीत तर आमचे लष्कर त्यांच्यावर आक्रमण करील असेही म्हटले आहे. आक्रमण करणे आणि आक्रमणाची धमकी देणे या दोन्ही गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणात सारख्याच गंभीरपणे घेतल्या जातात. काश्मीरवरील आक्रमणाची धमकी नवी असली तरी ती भारताला जास्तीची चिंता करायला लावणारी आहे. उत्तराखंडमधील आताचे आक्रमण ही त्या आक्रमणाची नांदी म्हणूनही पाहता येणारी आहे. उत्तराखंडमध्ये आपली सेना पाठवून चीन काश्मीरला भारताकडून होणारा जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा थांबवू शकणार आहे. एका अर्थाने त्यामुळे काश्मीरचा जीवनमार्गच (लाईफलाईन) त्याला अडवून धरता येणार आहे. चीन हे उघडउघड व सांगूनसवरून करताना दिसत आहे. थोडक्यात अरुणाचलपासून काश्मीरपर्यंतची भारताची चार हजार कि.मी.ची सारी उत्तरसीमाच चीनच्या आक्रमणाच्या छायेत आहे. आश्चर्य याचे की या आक्रमणाची घ्यावी तशी दखल भारताचे संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि प्रत्यक्ष पंतप्रधानांचे कार्यालयही घेताना दिसत नाही. पाकिस्तानबाबत ही मंत्रालये जेवढी संवेदनशीलता दाखवितात तेवढी त्यांना याबाबत दाखविता न येणे हे त्याच्या मुत्सद्देगिरीचे लक्षण नाही. चीनच्या वाढलेल्या सामर्थ्याची भारताने धास्ती घेतल्याचे ते चिन्ह आहे. देशाच्या उत्तरसीमेवर आक्रमणाचे ढग असे जमले असताना देशाचे पंतप्रधान आसामचा दौरा करतात, परराष्ट्र मंत्री त्याविषयी काही एक न बोलता मौन पाळतात आणि लष्करातील वरिष्ठ अधिकारी मात्र त्यांना न शोभणारी राजकीय धमकीवजा भाषा वापरताना दिसतात तेव्हा ते सारे देशाच्या परराष्ट्र नीतीत व विशेषत: चीनबाबत वापरायच्या धोरणात एकवाक्यता नसल्याचे लक्षण ठरते. चीनने डोकलामवर लष्कर पाठविले, सिक्कीमच्या उत्तरसीमेवर सैन्य तैनात केले आणि काश्मिरात लष्कर पाठविण्याची सरळ धमकी भारताला दिली तरी त्यावर देशाचे पंतप्रधान त्यांच्या ‘मन की बात’ बोलताना कधी दिसले नाहीत. याच काळात भारताच्या कॅग या वरिष्ठ अधिकाºयाने भारतीय लष्कराजवळ युद्धात जेमतेम दहा दिवस कामी येईल एवढीच शस्त्रसामुग्री असल्याचे जाहीर केले आहे. हा प्रकारही आक्रमणाला निमंत्रण देणारा आहे. चीन धमक्या देतो, आमची माणसे आपले दुबळेपण सांगतात आणि सरकार मौन धारण करते हा देशालाच विस्मयात टाकणारा प्रकार आहे.