शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

चीनला घरचा अहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:41 IST

डोकलाम मुद्यावरून भारत व चीनदरम्यान सुरू असलेला वाद शमण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भारताने डोकलाममधून सैन्य मागे घ्यावे, यासाठी गत दीड महिन्यापासून रोजच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून भारताला धमकावत असलेल्या चीनने, बुधवारी पुन्हा एकदा धमकी दिली. भारताने सैन्य मागे न घेतल्यास, कठोर पावले उचलल्या जातील, असा इशारा चीनने दिला. डोकलाममधील विवाद ...

डोकलाम मुद्यावरून भारत व चीनदरम्यान सुरू असलेला वाद शमण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भारताने डोकलाममधून सैन्य मागे घ्यावे, यासाठी गत दीड महिन्यापासून रोजच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून भारताला धमकावत असलेल्या चीनने, बुधवारी पुन्हा एकदा धमकी दिली. भारताने सैन्य मागे न घेतल्यास, कठोर पावले उचलल्या जातील, असा इशारा चीनने दिला. डोकलाममधील विवाद हा चीन व भूतानदरम्यानचा विवाद असून, भारताचे त्या विवादाशी काहीही देणे-घेणे नाही, अशी भूमिका चीनने घेतली आहे. भारत आणि भूतानला मात्र ती भूमिका मान्य नाही. भारत आणि भूतानदरम्यानच्या करारानुसार भूतानचे बाह्य आक्रमणापासून संरक्षण करण्याची जबाबदारी भारताची आहे आणि त्या अनुषंगानेच भारतीय सैन्य भूतानच्या भूमीवर आहे, अशी भूमिका उभय देशांनी घेतली आहे. या विवादासंदर्भात भारताने अत्यंत संयंत भूमिका घेतली असताना, चीन मात्र दररोज आक्रस्ताळेपणा करीत आहे. स्वत:ला अमेरिकेच्या बरोबरीची महाशक्ती समजू लागलेल्या चीनसारख्या सामर्थ्यशाली राष्ट्रासाठी हे शोभादायक नाही, अशा वर्तणुकीमुळे आपण आपल्या देशाला उत्तर कोरियासारख्या बेजबाबदार देशाच्या पंगतीत नेऊन बसवित आहोत, याचेही भान चिनी प्रसार माध्यमांना राहिलेले दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, बुधवारी चीनमधील एका तज्ज्ञाने चीनला घरचा अहेर दिला. विशेष म्हणजे एका चिनी प्रसार माध्यमामध्येच त्या संदर्भातील बातमी उमटली आहे. मकाऊस्थित लष्करी तज्ज्ञ अँटनी वाँग डाँग यांनी ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाशी संवाद साधताना असे वक्तव्य केले, की जमिनीवरील लढाईत चीन भारताला मात देईलही; पण भारतीय नौदलाला हिंद महासागरात पराभूत करणे चिनी नौदलासाठी अशक्यप्राय आहे आणि त्या स्थितीत चीनचा इंधन पुरवठा बंद होऊ शकतो. चीनच्या सरकारी प्रसार माध्यमांमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, चीनचा ८० टक्के इंधन पुरवठा हिंद महासागरातील जलमार्गाने होतो. त्याचे स्मरणही डाँग यांनी करवून दिले. मलाक्काच्या समुद्रधुनीतील ज्या चिंचोळ्या मार्गाने चीन खनिज तेलाची आयात करतो, तो मार्ग अंदमान-निकोबार द्वीपसमूहावरील भारतीय नौदलाच्या तळाच्या अगदी आवाक्यात आहे, हेच डाँग यांना सूचित करायचे होते. चिनी राज्यकर्त्यांनाही त्याची जाणीव आहे आणि बहुधा त्यामुळेच चीन रणमैदानात उतरण्याऐवजी मनोवैज्ञानिक युद्ध खेळू बघत आहे.