शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चिल्लर पार्टी-विद्यार्थी चित्रपट चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 03:16 IST

कोल्हापुरात लहान मुलांवर संस्कारक्षम विचारांचे अभिसरण व्हावे, यासाठी दर महिन्याला बालचित्रपट मोफत दाखविणारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळ गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे.

कोल्हापुरात लहान मुलांवर संस्कारक्षम विचारांचे अभिसरण व्हावे, यासाठी दर महिन्याला बालचित्रपट मोफत दाखविणारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळ गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. या चळवळीतर्फे आता तिसरा बालचित्रपट महोत्सव कोल्हापुरात सुरू आहे. चित्रपट हे एक असे माध्यम आहे की, ज्याचा समाजमनावर खोलवर परिणाम होतो. लहान मुले ही अधिकच प्रभावी होतात, पण लहानांनी चित्रपट पाहू नयेत, असेच संस्कार आपल्याकडे केले जातात. अशा वातावरणात देश-विदेशातील संस्कारक्षम चित्रपट लहान मुलांनी पाहावेत, असा आग्रह धरणारी ही चळवळ आता रुजते आहे.चित्रपट पाहण्यासाठी लहान मुले आणि त्यांच्या पालकांनी एकत्र यावे, या तळमळीतून २०१२ मध्ये ही चळवळ सुरू करण्यात आली. प्रथमत: हे चित्रपट शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये दाखविले जात असत. गेल्या सहा वर्षांत मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासह प्रबोधनाचे कार्यही या चळवळीच्या माध्यमातून उभे राहते आहे. त्याचे पुढचे पाऊल म्हणून चित्रपट तयार कसा होतो, त्यातील कथानक कसे निवडले जाते, त्यातील प्रसंग किती खरे असतात, हे सर्व मुलांना समजावून सांगण्यासाठी कार्यशाळाही घेतली जाते. या कार्यशाळेत कॅमेरा, कथानक, संहिता, चित्रपटाचे संकलन, लोकेशन आदीवरही मार्गदर्शन केले जाते. चित्रपट हे एक मनोरंजनाचे साधनच नव्हे, तर तो एक व्यवसाय, कला आणि त्याचे अर्थकारणही असते याची जाणीव मुलांना होत राहते.चिल्लर पार्टीतर्फे दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात सकाळी १० वाजता मोफत चित्रपट दाखविला जातो. लहान मुलांसाठी अत्यंत उत्कृष्ट चित्रपट पाहणे ही मेजवानीच असते. या चित्रपटांची पार्श्वभूमीपासून विविध वैशिष्ट्ये सांगितली जातात. परिणाम देश-विदेशातील कोणत्याही भाषेतील चित्रपट असला तरी लहान मुलांना समजतो.कोल्हापुरात चित्रपट निर्मितीची एका शतकाची परंपरा आहे. गेल्या २ डिसेंबरला हा शतक महोत्सव साजराही करण्यात आला. १९३८ च्या सुमारास धु्रव नावाचा पहिला बालचित्रपटही कोल्हापुरातच तयार करण्यात आला होता. या चित्रपटात काम करणारे सर्व कलाकारही बालकेच होती. प्रभात चित्र नावाच्या बॅनरखाली तो बनविण्यात आला होता. आजही अनेक संस्था, संघटना आहेत, ज्या बालकलाकारांना मार्गदर्शन करतात. बालकलाकार घडवितात. कोल्हापूरच्या बाहेर निर्मिती होणाºया चित्रपटात किंवा मालिकांमध्येही संधी मिळावी म्हणून प्रयत्न करण्यासाठी धडपडणाºयांची संस्थाही कोल्हापुरात चालते.चिल्लर पार्टी ही चळवळ केवळ लहान मुलांना समोर ठेवून चालविण्यात येत आहे. त्यातही गरीब, वंचित किंवा ज्यांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहता येत नाहीत, अशा मुलांसाठी जाणीवपूर्वक चालविलेली ही चळवळ आहे. आज शाहू स्मारक भवनाचे ४०० जणांची क्षमता असलेले प्रेक्षकगृह भरलेले असते. त्यातच या चळवळीचे यश आहे.- वसंत भोसले