शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

मुख्यमंत्र्यांचं भांडण

By admin | Updated: September 24, 2015 23:35 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्याप्रकरणी अगदी प्रथमपासून ज्या संघटनेकडे संशयाने बघितले जात होते, त्या सनातन संस्थेच्याच एका साधकाला पोलिसांनी संशयावरुन अटक

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्याप्रकरणी अगदी प्रथमपासून ज्या संघटनेकडे संशयाने बघितले जात होते, त्या सनातन संस्थेच्याच एका साधकाला पोलिसांनी संशयावरुन अटक केल्यानंतर आता ‘सनातन’वर बंदी लागू करण्याच्या मागणीला जोर चढणे स्वाभाविक आहे. सनातन ही कडवी हिन्दुत्ववादी संघटना असल्याने आणि आज देशात आणि राज्यात हिन्दुत्ववादावरच ज्यांचे राजकीय भरणपोषण झाले आहे, अशा लोकांचे सरकार असल्याने अशी बंदी लागू केली जाणे सोपे नाही, याचीही साऱ्यांनाच जाणीव आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीदेखील केवळ राजकीय दबाव निर्माण केला जातो आहे म्हणून सनातनवर बंदी आणणार नाही, असे स्पष्टपणे सांगूनही टाकले आहे. मुख्यमंत्री ज्या राजकीय दबावाचा उल्लेख करीत आहेत तो दबाव प्राय: काँग्रेस पक्षाकडून केला जात असला तरी केन्द्रात आणि राज्यात हा पक्ष सत्तेत असतानाच सुमारे चार वर्षांपूर्वी सनातनवरील बंदीचा विषय सरकारी कागदावर उतरला होता पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. आता ते का झाले नाही व कोणामुळे झाले नाही यावरुन खुद्द काँग्रेस पक्षातच एक कलह सुरु झाला असून सुशीलकुमार शिन्दे आणि पृथ्वीराज चव्हाण या राज्याच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जाहीर सवाल जबाब सुरु झाले आहेत. चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना शिन्दे राज्यातून दिल्लीत जाऊन केन्द्रीय गृहमंत्री बनले होते. चव्हाणांच्या कथनानुसार त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने सनातनवरील बंदीचा एक अहवाल केन्द्रीय गृह मंत्रालयाला पाठविला होता पण त्या मंत्रालयाने त्यावर काही कार्यवाहीच केली नाही. त्यावर शिन्दे एकदा म्हणाले, ‘माझ्या टेबलावर अहवाल आला नाही, तो सचिवालयातच राहिला’ आणि ‘दुसऱ्यांदा म्हणाले, नुसता अहवाल पाठवून काय होते, मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते’. त्याला लगेच पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिले की, ‘ते काय माझ्या घरचे काम होते? रीतसर अहवाल पाठवला होता, त्यावर कार्यवाही व्हायला हवी होती’. सरकारी कामकाज कसे चालते, याचा हा एक उत्तम नमुना तर आहेच शिवाय पारदर्शी, तत्पर आणि पेपरलेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हे कसे एक सोंग आहे, हेदेखील यातून स्पष्ट होते. चार वर्षांपूर्वीच तत्कालीन राज्य सरकारला सनातनच्या अस्तित्वातला धोका लक्षात आला होता तर सुशीलकुमार म्हणतात त्याप्रमाणे राज्य सरकारने खरोखरीच त्याचा पाठपुरवा करावयास हवा होता. त्याचबरोबर तेव्हांचे गृहसचिव आणि आजचे भाजपाचे खासदार राजकुमार सिंह मनाने व कलाने भाजपाकडे झुकलेले आहेत याची किमान केन्द्रीय गृह मंत्र्यांना तरी कल्पना असायलाच हवी होती. कारण याच राजकुमार सिंह यांनी राज्याकडून आलेला प्रस्ताव आपल्या मंत्र्यापुढे ठेवला नाही व आपल्याच अखत्यारीत रफादफा करुन टाकला असाही एक आरोप या संदर्भात केला गेला आहे. इत्यर्थ इतकाच की खुद्द काँग्रेस सरकारदेखील सनातनवरील बंदीबाबत फार गंभीर नव्हते.