शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांचं भांडण

By admin | Updated: September 24, 2015 23:35 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्याप्रकरणी अगदी प्रथमपासून ज्या संघटनेकडे संशयाने बघितले जात होते, त्या सनातन संस्थेच्याच एका साधकाला पोलिसांनी संशयावरुन अटक

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्याप्रकरणी अगदी प्रथमपासून ज्या संघटनेकडे संशयाने बघितले जात होते, त्या सनातन संस्थेच्याच एका साधकाला पोलिसांनी संशयावरुन अटक केल्यानंतर आता ‘सनातन’वर बंदी लागू करण्याच्या मागणीला जोर चढणे स्वाभाविक आहे. सनातन ही कडवी हिन्दुत्ववादी संघटना असल्याने आणि आज देशात आणि राज्यात हिन्दुत्ववादावरच ज्यांचे राजकीय भरणपोषण झाले आहे, अशा लोकांचे सरकार असल्याने अशी बंदी लागू केली जाणे सोपे नाही, याचीही साऱ्यांनाच जाणीव आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीदेखील केवळ राजकीय दबाव निर्माण केला जातो आहे म्हणून सनातनवर बंदी आणणार नाही, असे स्पष्टपणे सांगूनही टाकले आहे. मुख्यमंत्री ज्या राजकीय दबावाचा उल्लेख करीत आहेत तो दबाव प्राय: काँग्रेस पक्षाकडून केला जात असला तरी केन्द्रात आणि राज्यात हा पक्ष सत्तेत असतानाच सुमारे चार वर्षांपूर्वी सनातनवरील बंदीचा विषय सरकारी कागदावर उतरला होता पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. आता ते का झाले नाही व कोणामुळे झाले नाही यावरुन खुद्द काँग्रेस पक्षातच एक कलह सुरु झाला असून सुशीलकुमार शिन्दे आणि पृथ्वीराज चव्हाण या राज्याच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जाहीर सवाल जबाब सुरु झाले आहेत. चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना शिन्दे राज्यातून दिल्लीत जाऊन केन्द्रीय गृहमंत्री बनले होते. चव्हाणांच्या कथनानुसार त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने सनातनवरील बंदीचा एक अहवाल केन्द्रीय गृह मंत्रालयाला पाठविला होता पण त्या मंत्रालयाने त्यावर काही कार्यवाहीच केली नाही. त्यावर शिन्दे एकदा म्हणाले, ‘माझ्या टेबलावर अहवाल आला नाही, तो सचिवालयातच राहिला’ आणि ‘दुसऱ्यांदा म्हणाले, नुसता अहवाल पाठवून काय होते, मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते’. त्याला लगेच पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिले की, ‘ते काय माझ्या घरचे काम होते? रीतसर अहवाल पाठवला होता, त्यावर कार्यवाही व्हायला हवी होती’. सरकारी कामकाज कसे चालते, याचा हा एक उत्तम नमुना तर आहेच शिवाय पारदर्शी, तत्पर आणि पेपरलेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हे कसे एक सोंग आहे, हेदेखील यातून स्पष्ट होते. चार वर्षांपूर्वीच तत्कालीन राज्य सरकारला सनातनच्या अस्तित्वातला धोका लक्षात आला होता तर सुशीलकुमार म्हणतात त्याप्रमाणे राज्य सरकारने खरोखरीच त्याचा पाठपुरवा करावयास हवा होता. त्याचबरोबर तेव्हांचे गृहसचिव आणि आजचे भाजपाचे खासदार राजकुमार सिंह मनाने व कलाने भाजपाकडे झुकलेले आहेत याची किमान केन्द्रीय गृह मंत्र्यांना तरी कल्पना असायलाच हवी होती. कारण याच राजकुमार सिंह यांनी राज्याकडून आलेला प्रस्ताव आपल्या मंत्र्यापुढे ठेवला नाही व आपल्याच अखत्यारीत रफादफा करुन टाकला असाही एक आरोप या संदर्भात केला गेला आहे. इत्यर्थ इतकाच की खुद्द काँग्रेस सरकारदेखील सनातनवरील बंदीबाबत फार गंभीर नव्हते.