शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री, जरा इकडेही लक्ष द्या!

By admin | Updated: February 15, 2016 03:31 IST

महाराष्ट्राला सुवर्णसंधी चालून आली आहे, स्वत:चे जबरदस्त मार्केटिंग करण्याची. एमएमआरडीएच्या सव्वा दोन लाख स्क्वेअर फूट जागेत देश विदेशातील कंपन्यांनी, राज्यांनी स्टॉल थाटले आहेत

महाराष्ट्राला सुवर्णसंधी चालून आली आहे, स्वत:चे जबरदस्त मार्केटिंग करण्याची. एमएमआरडीएच्या सव्वा दोन लाख स्क्वेअर फूट जागेत देश विदेशातील कंपन्यांनी, राज्यांनी स्टॉल थाटले आहेत. चार देशांचे पंतप्रधान, आठ राज्यांचे मुख्यमंत्री येत आहेत. बिझनेस घेऊन येणाऱ्या उद्योजक आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात अनेक सेमिनार आहेत. अशा भव्य दिव्य मेक इन इंडियाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सगळी व्यवस्था नीट होते आहे का हे पाहात आहेत. जगभरातून येणाऱ्या उद्योगविश्वाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झालंय असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मेगा इव्हेंटसाठी स्वत:ला झोकून दिले आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.मात्र त्यांना असणारी कळकळ दुर्दैवाने केंद्राच्या आणि राज्याच्या माहिती खात्याकडे दिसत नाही. पीआयबीचे डायरेक्टर मनिष देसाई, आहे त्या परिस्थितीत मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसतात, पण त्यांच्याकडे काम करायला माणसेच नाहीत. तुटपुंजा स्टाफ घेऊन ते हा सगळा तामझाम देशभर कसा पोहोचवणार, याचे उत्तर त्यांच्याकडेही नाही.एकूण किती सेमिनार आहेत, कोणत्या विषयावर आहेत, त्यात कोण भाग घेणार आहे, ते कोठे होणार आहेत याची कोणतीही एकत्रित माहिती कोणाकडेही नाही. पीआयबीच्या अधिकाऱ्यांनाच केंद्राचा उद्योग विभाग पुरेशी माहिती देताना दिसत नाही. हा त्याच्याकडे बोट दाखवतोय, तो त्याचे नाव घेतोय, सगळे काम करताना दिसतात पण नेमकी जबाबदारी कोणाची याबद्दल सगळा सावळा गोंधळ आहे. एकत्रीत सगळी माहिती कोठे मिळणार याविषयी कोणीही ठामपणे काहीही सांगताना दिसत नाही. महाराष्ट्राला मेक इन इंडिया भरवण्याची संधी मिळाली याचा आनंद राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागालाही व्हायला हवा होता. राज्याला प्रमोट करण्याची एवढी चांगली संधी चालून आली, पण पकडून आणल्यासारखे, किंवा या सगळ्याशी आपला काहीच संबंध नाही असे भाव माहिती खात्याच्या चेहऱ्यावर आहेत. महाराष्ट्राच्या सेमिनारपुरती माहिती ते देतात, पण बाकी काही विचारले की माहिती नाही असे सांगतात. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मेगा इव्हेन्टची माहिती देण्यासाठी माध्यमाना बोलावले. तेथे माहिती खात्याचा एकही वरिष्ठ अधिकारी हजर नव्हता. जेनसिस नावाच्या पीआर एजन्सीच्या नवख्या मुलींनी प्रवेशद्वारावर पत्रकारानाच प्रश्न विचारुन सळो की पळो केले. त्या मुलीना अनेक माध्यमांची नावे माहिती नव्हती. कोठून आलात असे त्या मुली विचारत होत्या, त्यावर एकाने वैतागून, बाळकृष्ण प्रिंटींग प्रेस... असे सांगितले. त्यावर त्या मुलीने तेही नाव निष्ठेने डायरीत लिहिणे सुरु केले. पीआयबीच्या मर्यादा आहेत. त्यांच्याकडे माणसे नाहीत, मात्र राज्याच्या माहिती खात्याला आपल्या राज्यात होत असलेल्या या मेगा इव्हेन्टकडे आपुलकीने पाहाण्याची गरज वाटत नाही. सरकारचे कौतुक करुन घेण्याच्या चालून आलेल्या संधीचे जर सोने करता येत नसेल तर अन्य वेळी हा विभाग काय करणार? या सगळ्या इव्हेन्टच्या आॅफबीट स्टोरीज, माहिती देऊन कितीतरी चकटफू प्रसिध्दी राज्याला मिळवून घेता आली असती.जी अवस्था माहिती खात्याची, तीच अन्य विभागांची आहे. आपल्याकडे देशोदेशीचे व अनेक राज्यांचे पाहुणे येत आहेत, अशावेळी माध्यमाना सोबत घेऊन काय सांगू आणि काय नको असे व्हायला हवे होते. त्याउलट हा सगळा सोहळा जास्तीत जास्त सरकारी कसा होईल याकडे सगळ्यांचे जास्त लक्ष लागले आहे. पंतप्रधानांनी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कार्यक्रमात सुंदर भाषण केले तर माहिती खात्याने चार ओळीत त्याची बातमी पाठवली! अशाने मेक इन महाराष्ट्र कसा साकारणार?पोलिसही तसेच. कुठून ही ब्याद आलीय असा त्यांचा आविर्भाव. यातून ‘अतिथी देवो भव’ कसे साकारणार? एकट्या मुख्यमंत्र्यांना तळमळ असून भागणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आजपासून चार दिवस हातात आहेत. महाराष्ट्राचे ब्रँडींग करण्याची ही सुवर्णसंधी आहे. नुसत्या लामणदिव्याचेच कौतुक करत बसाल तर निराशेच्या अंधाराशिवाय हाती काही लागणार नाही. यापेक्षा जास्त काय सांगावे?- अतुल कुलकर्णी