शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘छिंदम’ (का) आवडे सर्वांना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 05:23 IST

समाजकारणाला पुन्हा एकदा तणावाची फोडणी दिली. छत्रपती शिवरायांबद्दल त्याने जी बेताल विधाने केली त्यामुळे महाराष्टÑ संतापला आहे. हा जनक्षोभ भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

अहमदनगरच्या श्रीपाद छिंदमने महाराष्टÑाच्या समाजकारणाला पुन्हा एकदा तणावाची फोडणी दिली. छत्रपती शिवरायांबद्दल त्याने जी बेताल विधाने केली त्यामुळे महाराष्टÑ संतापला आहे. हा जनक्षोभ भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याच्या वाचाळपणामुळे भाजपची आणि राष्टÑीय स्वयंसेवक संघाचीही वाचा बसून ते उघडे पडले आहेत.मुळात ‘छिंदम’ ही कुठलीही एक व्यक्ती नाही, ही विकृती आहे. ती एका दिवसात जन्माला आलेली नाही. काही संघटनांनी व पक्षांनी आपले घोडे पुढे दामटण्यासाठी इतिहासाची ज्या पद्धतीने मोडतोड केली त्यातून जात-धर्म-महापुरुष यांच्याबाबत विद्वेषाचे विष पसरले. संघाने या विषाला कायम खतपाणीच घातले. जेम्स लेन महाराष्टÑात येऊन शिवरायांची बदनामी करून गेला. त्याला सगळे कुचाळखोर संदर्भ पुरविणारे मेंदू महाराष्टÑातील होते. त्यामुळे दोष एकटा छिंदमचा नाही. नगरच्या छिंदमचा दुसराही एक दृश्य चेहरा आहे. बळजबरीने भूखंड खाली करणे, धमकावणे, विनयभंग अशाप्रकारचे गंभीर गुन्हे तो व त्याच्या भावावर दाखल होते. तरीही या मंडळींना राजकारणात पावन करून घेण्यात आले. भाजपच्या खासदारांनी तर त्याचा खास सन्मान करीत उपमहापौरपद दिले. आता भाजप व संघावरही इज्जत वाचविण्याची वेळ आली. छिंदम मूळचा संघाचा नाही, असे भलेही भाजप व संघ आता म्हणेल. पण, त्याची व त्याच्या भावाची पार्श्वभूमी आम्हाला माहिती नव्हती, असे त्यांना म्हणता येणार नाही.असे छिंदम आता सगळ्याच राजकीय पक्षांना हवे आहेत. आजचे राजकारण हे बहुमताचे व पैशाचे आहे. वारेमाप पैसा उधळून येनकेनप्रकारेण निवडून येणारे लोक पक्षांना लागतात. नगर महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी होऊ घातली आहे. त्यासाठी ‘लक्षाधीश’ उमेदवारांची चाचपणी राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे. नगरचे काही नेते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांचे ‘प्री-इलेक्शन’ बजेटच काही कोटींचे आहे. या ‘श्रीमंत’ राजकारणाची ‘छिंदम’ ही गरज आहे. डोक्यात कुठलेही शहाणपण, तार्किक विचार न ठेवता केवळ ‘जिंदाबाद’ म्हणणारे कार्यकर्तेच पक्षांना हवे आहेत. ‘केडर’बेस कार्यकर्ता घडविण्याची प्रक्रियाच आता थांबली आहे. विधिमंडळातील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख एस.टी. बसने प्रवास करीत असल्याचे एक छायाचित्र मध्यंतरी समाजमाध्यमांत व्हायरल झाले. छिंदम आणि त्याच्या नेत्यांना असे ‘गणपतराव’ होणे आता मंजूर नाही.छिंदमने जी चूक केली, त्यात त्याच्या समाजाचा काहीही दोष नाही. मात्र, त्याची जात शोधली जात आहे. त्याला शिव्याशाप देणाºया काही ‘क्लिप’ व्हायरल झाल्या. यात काही ठिकाणी महिलांबद्दल अपशब्द आहेत. तेही अयोग्य आहे. शिवरायांनाच हे मंजूर नव्हते. छत्रपतींनी स्त्रीचा सातत्याने आदर केला. त्या तत्त्वालाच यातून बाधा येते. छिंदमला कायद्याने शिक्षा होईल. त्यासाठी कायदा हातात घेणे योग्य ठरत नाही.- सुधीर लंके

sudhir.lanke@lokmat.com