शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

स्वस्त मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:32 IST

भारतात मरण फार स्वस्त आहे, असे नेहमी म्हटले जाते. सहज टाळता येण्याजोग्या कारणांसाठीही आपल्या देशात माणसे हकनाक जीव गमावत असतात.

भारतात मरण फार स्वस्त आहे, असे नेहमी म्हटले जाते. सहज टाळता येण्याजोग्या कारणांसाठीही आपल्या देशात माणसे हकनाक जीव गमावत असतात. अशा बहुतांश प्रकरणांमध्ये सरकारी यंत्रणांना, दर्जाहीन पायाभूत सुविधांना जबाबदार ठरविल्या जाते; मात्र अनेकदा मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळेही त्याचा बळी जातो. विशेषत: रेल्वेमार्गांवरील बळींच्या संदर्भात तर हे प्रकर्षाने जाणवते. शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे अशाच प्रकारे एका इसमाचा रेल्वेगाडीखाली सापडून मृत्यू झाला. रेल्वेगाडी येण्याची वेळ झाल्याने बंद झालेल्या रेल्वे फाटकाखालून दुचाकी काढण्याच्या प्रयत्नात त्याने हकनाक जीव गमावला. आपल्या देशातील बहुतांश रेल्वे फाटकांवरील हे सार्वत्रिक चित्र आहे. स्वत:चा जीव गमावण्याचा धोका पत्करण्यास तयार होण्याएवढी दुचाकीस्वारांना कशाची घाई असते, हे कळण्यास मार्ग नाही! आपल्या देशात दोन प्रकारचे रेल्वे क्रॉसिंग आहेत. काही ठिकाणी रेल्वे फाटके आहेत, तर काही ठिकाणी नाहीत. फाटक नसलेल्या क्रॉसिंगची संख्या आता बºयापैकी घटली असली तरी, अजूनही ती शेकडोच्या घरात आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गत सप्टेंबरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अशा क्रॉसिंगची संख्या सुमारे पाच हजार एवढी आहे. वर्षभरात असे सर्व क्रॉसिंग संपुष्टात आणण्याचे लक्ष्य रेल्वे मंत्रालयाने समोर ठेवले आहे. शिवाय भारतीय अवकाश संस्था म्हणजेच इस्रोच्या सहकार्याने, भारतीय रेल्वे उपग्रहावर आधारित यंत्रणाही प्रत्येक रेल्वे इंजीनमध्ये बसवित आहे. या यंत्रणेच्या साहाय्याने फाटक नसलेल्या क्रॉसिंगपासून रेल्वेगाडी पाचशे मीटर अंतरावर असताना इशारा देणारा भोंगा वाजणे सुरू होईल. रेल्वेद्वारा करण्यात येत असलेल्या या उपाययोजना स्वागतार्हच आहेत; पण जिथे बंद असलेल्या फाटकालाच जुमानल्या जात नाही, तिथे भोंग्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्नच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला रेल्वे फाटक असे संबोधल्या जाते, तो प्रत्यक्षात केवळ एक आडवा दांडा असतो. त्याची जमिनीपासूनची उंची एवढी असते, की थोडी कसरत करून त्या दांड्याखालून दुचाकी पार नेणे सहजशक्य असते. त्यामुळेच फाटक असलेल्या अनेक क्रॉसिंगवर रेल्वेगाडी पोहचण्यापूर्वी दुचाकी पलीकडे नेण्यासाठी झुंबड उडालेली दिसते. वास्तविक रेल्वे फाटकाच्या आरेखनात आवश्यक ते बदल करून, फाटकाच्या खालून अथवा वरून कोणतेही वाहन पलीकडे नेता येणार नाही, अशी व्यवस्था करणे सहजशक्य आहे. रेल्वे मंत्रालय त्या दृष्टीने का विचार करीत नाही, हे अनाकलनीय आहे. मरण स्वस्त आहे, हेच बहुधा त्यामागचे कारण असावे!

टॅग्स :Deathमृत्यू