शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

स्वस्त मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:32 IST

भारतात मरण फार स्वस्त आहे, असे नेहमी म्हटले जाते. सहज टाळता येण्याजोग्या कारणांसाठीही आपल्या देशात माणसे हकनाक जीव गमावत असतात.

भारतात मरण फार स्वस्त आहे, असे नेहमी म्हटले जाते. सहज टाळता येण्याजोग्या कारणांसाठीही आपल्या देशात माणसे हकनाक जीव गमावत असतात. अशा बहुतांश प्रकरणांमध्ये सरकारी यंत्रणांना, दर्जाहीन पायाभूत सुविधांना जबाबदार ठरविल्या जाते; मात्र अनेकदा मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळेही त्याचा बळी जातो. विशेषत: रेल्वेमार्गांवरील बळींच्या संदर्भात तर हे प्रकर्षाने जाणवते. शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे अशाच प्रकारे एका इसमाचा रेल्वेगाडीखाली सापडून मृत्यू झाला. रेल्वेगाडी येण्याची वेळ झाल्याने बंद झालेल्या रेल्वे फाटकाखालून दुचाकी काढण्याच्या प्रयत्नात त्याने हकनाक जीव गमावला. आपल्या देशातील बहुतांश रेल्वे फाटकांवरील हे सार्वत्रिक चित्र आहे. स्वत:चा जीव गमावण्याचा धोका पत्करण्यास तयार होण्याएवढी दुचाकीस्वारांना कशाची घाई असते, हे कळण्यास मार्ग नाही! आपल्या देशात दोन प्रकारचे रेल्वे क्रॉसिंग आहेत. काही ठिकाणी रेल्वे फाटके आहेत, तर काही ठिकाणी नाहीत. फाटक नसलेल्या क्रॉसिंगची संख्या आता बºयापैकी घटली असली तरी, अजूनही ती शेकडोच्या घरात आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गत सप्टेंबरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अशा क्रॉसिंगची संख्या सुमारे पाच हजार एवढी आहे. वर्षभरात असे सर्व क्रॉसिंग संपुष्टात आणण्याचे लक्ष्य रेल्वे मंत्रालयाने समोर ठेवले आहे. शिवाय भारतीय अवकाश संस्था म्हणजेच इस्रोच्या सहकार्याने, भारतीय रेल्वे उपग्रहावर आधारित यंत्रणाही प्रत्येक रेल्वे इंजीनमध्ये बसवित आहे. या यंत्रणेच्या साहाय्याने फाटक नसलेल्या क्रॉसिंगपासून रेल्वेगाडी पाचशे मीटर अंतरावर असताना इशारा देणारा भोंगा वाजणे सुरू होईल. रेल्वेद्वारा करण्यात येत असलेल्या या उपाययोजना स्वागतार्हच आहेत; पण जिथे बंद असलेल्या फाटकालाच जुमानल्या जात नाही, तिथे भोंग्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्नच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला रेल्वे फाटक असे संबोधल्या जाते, तो प्रत्यक्षात केवळ एक आडवा दांडा असतो. त्याची जमिनीपासूनची उंची एवढी असते, की थोडी कसरत करून त्या दांड्याखालून दुचाकी पार नेणे सहजशक्य असते. त्यामुळेच फाटक असलेल्या अनेक क्रॉसिंगवर रेल्वेगाडी पोहचण्यापूर्वी दुचाकी पलीकडे नेण्यासाठी झुंबड उडालेली दिसते. वास्तविक रेल्वे फाटकाच्या आरेखनात आवश्यक ते बदल करून, फाटकाच्या खालून अथवा वरून कोणतेही वाहन पलीकडे नेता येणार नाही, अशी व्यवस्था करणे सहजशक्य आहे. रेल्वे मंत्रालय त्या दृष्टीने का विचार करीत नाही, हे अनाकलनीय आहे. मरण स्वस्त आहे, हेच बहुधा त्यामागचे कारण असावे!

टॅग्स :Deathमृत्यू