शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

संघ बदलतोय?

By admin | Updated: October 18, 2016 06:58 IST

समाजाची, विशेषत: तरुणाईची मानसिकता लक्षात घेता संघाला बदलावे लागेल, हे सरसंघचालक जाणून आहेत.

समाजाची, विशेषत: तरुणाईची मानसिकता लक्षात घेता संघाला बदलावे लागेल, हे सरसंघचालक जाणून आहेत. त्यामुळे ते सातत्याने सामाजिक अभिसरण आणि परिवर्तनाचा विचार मांडून संघाच्या प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न करीत असतात.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेले भाषण, हिंदुत्ववादी संघटनेच्या भविष्यातील नव्या वाटचालीचे सूचक आहे. त्यांच्या या भाषणाची माध्यमांमध्ये फारशी चर्चा झाली नाही. जर त्यांनी खळबळजनक आणि वादग्रस्त विधाने केली असती तर कदाचित माध्यमांनी बातम्यांचा रतीब घातला असता. सरसंघचालकांच्या भाषणातील जे मुद्दे दुर्लक्षिले गेले, त्यांचीच खरे तर देशात चर्चा व्हायला हवी. ती जशी सकारात्मक, तशीच टीकात्मकही अभिप्रेत आहे. कारण, देशातील सर्वात मोठ्या हिंदुत्ववादी संघटनेचा प्रमुख जेव्हा संघटनेच्या मूळ गाभ्यालाच हात घालून त्यात परिवर्तन घडवू पाहातो, संघटनेची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून देशातील समाजकारण आणि राजकारण ढवळून निघत असते. संघाने अलीकडेच मध्य भारतातील नऊ हजार गावांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ४० टक्के गावात मंदिरे, ३० टक्के गावात पाणी व ३५ टक्के गावात स्मशानभूमीच्या वापरावरून सामाजिक भेदभाव होत असल्याचे समोर आले. सरसंघचालकांनी आपल्या भाषणात याच विषयाला हात घातला. ते म्हणाले की, ‘अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या संविधानातील तरतुदी व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, यासाठी संघ स्वयंसेवक प्रयत्न करीत आहेत’. सरसंघचालकांचे हे विधान सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. ‘श्रेष्ठत्वाच्या अहंकारामुळे आपल्याच निरपराध बंधूंना त्रास सहन करावा लागतो ही आपल्या साऱ्यांसाठीच लज्जास्पद गोष्ट आहे’, हे भागवतांचे विचार क्रांतिकारक आहेत. ज्या वर्णव्यवस्थेचे समर्थन दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी केले, त्याच संघाचे विद्यमान सरसंघचालक जेव्हा वर्णव्यवस्थेवर प्रहार करतात तेव्हा संघ बदलत आहे किंबहुना या संघटनेसाठी काळाची ती गरज आहे, असा त्याचा अर्थ निघतो. सार्वजनिक, धार्मिक उत्सवातील धांगडधिंंग्याबद्दलही भागवतांनी आपल्या भाषणात कठोर शब्दात प्रहार केले. भागवतांचे व्यक्तिमत्त्व तसे बाळासाहेब देवरसांसारखे सुधारणावादी आहे. समाजाची, विशेषत: तरुणाईची मानसिकता लक्षात घेता संघाला बदलावे लागेल, हे भागवत जाणून आहेत. त्यामुळे ते सातत्याने सामाजिक अभिसरण आणि परिवर्तनाचा विचार मांडून संघाच्या प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न करीत असतात. इतर धर्मीयांचा द्वेष करून, त्यांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करून, राष्ट्रवादाच्या आवरणाखाली धर्मांधतेचे विष पेरल्याने हिंदू संघटित होणार नाही, उलट तो विघटितच होईल हे सत्य संघाला एव्हाना कळून चुकले आहे. हिंदुत्ववादी संघटना असूनही या देशातील बहुसंख्य हिंदू संघाचे विचार मान्य करीत नाहीत. उलट या संघटनेच्या षड्यंत्राला वारंवार हाणून पाडण्याचे काम हेच सामान्य हिंदू करीत असतात, ही बाबही संघाला उमगली आहे. शंकराचार्य हे हिंदूंचे अध्यात्मिक प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्या सोईचे वदवून घेतले की, हिंदू त्यांच्या शब्दांना प्रमाण मानून ते स्वीकारतील, हा संघाचा भ्रमही खोटा ठरला आहे. उलट या वाचाळ शंकराचार्यांवर हिंदूंची श्रद्धा नाही, त्यांच्या अचरटपणाचा सामान्य हिंदूंच्या मनात रागच आहे, हेही अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या प्रसाराचे सारे मार्ग अपयशी ठरल्याचे सत्य ९१ वर्षांच्या संघाला कळून चुकले आहे. म्हणूनच सामान्य हिंदूंना आपलेसे करणारे सुधारणावादी विचार आता सातत्याने मांडले जात आहेत. समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक उपक्रमही संघ वेगाने राबवित आहे. संघाचे विचार पटत नाही म्हणून त्याच्या सेवाकार्याबद्दल कुत्सित भाव ठेवणे चुकीचे आहे, संघ स्वयंसेवकांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल शंका घेण्याचेहीे कारण नाही. बहुजन समाजातील संतांबद्दल अलीकडच्या काळात संघाकडून व्यक्त होणारा कळवळा संघ अधिक व्यापक आणि सहिष्णु होत असल्याचे निदर्शक आहे. संघाचा मूळ गाभा कधी बदलणार नाही, पण हिंदू धर्मातील सर्व जाती-पोटजातींना आपल्या नवविचारांनी आकृष्ट करण्याचे प्रयत्न म्हणून सरसंघचालकांच्या या ताज्या विधानाकडे बघितले पाहिजे. यावर सकारात्मक-नकारात्मक अशा दोन्ही अंगाने तार्किक विचारमंथन होणे म्हणूनच गरजेचे आहे. - गजानन जानभोर