शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

सीआरझेड कायद्यातील बदल पर्यावरणीय विकासाला धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 00:35 IST

घर ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे; पण वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा विचार न करता मानवाने निसर्गावर अतिक्रमण करीत मिळेल त्या जागेवर बांधकाम करण्याचा सपाटा लावला.

- दाजी कोळेकरघर ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे; पण वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा विचार न करता मानवाने निसर्गावर अतिक्रमण करीत मिळेल त्या जागेवर बांधकाम करण्याचा सपाटा लावला. मग तिथे समुद्रकिनारा असो किंवा नदीकिनारा, गावठाण, गायरान असो की शासकीय जमीन असो, अशा मनमुराद अतिवावरामुळे पर्यावरण धोक्यात येण्याची वेळ आली. परिणामी, शासनाला याबाबत कायदे करावे लागले. त्यातूनच सीआरझेड कायदा आला. त्यामध्ये वेळावेळी बदल होत गेला. त्यामुळे त्याचा मूळ हेतू धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.पर्यावरण रक्षणासाठी १९८६ साली पर्यावरण संरक्षण कायदा अस्तित्वात आला. या कायद्यातील कलम ३-१ आणि ३-२-५ अन्वये सागरी पर्यावरणासंदर्भात सीआरझेड अर्थात किनारा नियमन कायदा १९९१ मध्ये राजपत्राच्या माध्यमातून जारी केला. यानुसार समुद्रकिनाऱ्यावर येणाºया भरतीचा विचार करून भरतीरेषेपासून ५०० मीटरच्या अंतरात कोणतेही बांधकाम करण्यात बंदी घालण्यात आली. या कायद्यामुळे या परिसरात येणाºया अनेक वस्तीस्थानांच्या बांधकामाबाबत अडचणी येत असल्याचे पुढे निदर्शनास आले. त्यामुळे हा कायदा अनेकांच्या अडचणीचा ठरू लागला. उदा. मुंबईतील कोळीवाडे, कोकणातील समुद्रकिनाºयावरील काही रहिवासी घरे यांची पुनर्बांधणी करणे अवघड झाले. याचा व समुद्रकिनारी भागाचा विकास व्हावा, याचा विचार करून शासनाने वेळोवेळी या कायद्यातील तरतुदीमध्ये काही बदल केले. त्यामध्ये २०११ मोठा बदल करत सीआरझेड १, २ व ३ असे भाग पाडले. मुख्य सागरी भागात भरती रेषेपासून जमिनीच्या दिशेने २०० मीटर अंतरापर्यंत व नदीखाडी या परिसराच्या १०० मीटर भागाला ‘ना विकास क्षेत्र’ घोषित केले.त्यानंतर केंद्रीय वने व पर्यावरण खात्याने विकासाच्या नावाखाली २०११ च्या कायद्यातील तरतुदी शिथिल केल्या. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील भागाचा विकास करण्याचा विचार पुढे येत आहे. भारताला ७ हजार ५१७ कि.मी. लांबीच्या किनाºयापैकी ७२० कि.मी. लांबीचा किनारा आपल्या राज्याला लाभला आहे. २०१८ मधील नवीन तरतुदीप्रमाणे ना विकास क्षेत्राची मर्यादा घटवून ५० मीटर इतकी करण्यात आली आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि कोकण परिसरातील खाडी परिसरात व राज्यातील इतर ठिकाणी नदीमुख व खाडी परिसर असेल, अशा सर्वच क्षेत्रांना हा बदल लागू होणार. या परिसरातील विकासकामांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून व्यवस्थापन आराखडा तयार केला जाईल.वेळावेळी होणाºया या सीआरझेड कायद्यातील बदलामुळे मूळ हेतू अडचणीत येऊन पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो. अटी शिथिल केल्यामुळे या परिसरात बांधकाम लोकवस्ती वाढली आणि पुढे त्सुनामीसारखे संकट ओढवले, तर याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळे सीआझेडमधील तरतुदी पर्यावरणीय विकासाला मारक ठरू शकतात.।पर्यावरण रक्षणासाठी १९८६ साली पर्यावरण संरक्षण कायदा अस्तित्वात आला.सागरी पर्यावरणासंदर्भात सीआरझेड अर्थात किनारा नियमन कायदा १९९१ मध्ये राजपत्राच्या माध्यमातून जारी केला.केंद्रीय वने व पर्यावरण खात्याने विकासाच्या नावाखाली २०११ च्या कायद्यातील तरतुदी शिथिल केल्या.