शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

PM Narendra Modi Birthday: PM मोदींमुळे रांगेतील शेवटच्या माणसाचे कल्याण!: चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 09:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे तारणहार आहेत.

पंतप्रधाननरेंद्र मोदी हे गरिबांचे तारणहार आहेत. देशातील गरिबांच्या गरजा आणि आकांक्षा या दोन्हींचेही भान ठेवून मोदीजींनी गेल्या सात वर्षांत पंतप्रधान म्हणून काम केले आहे. गरिबांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलाच पाहिजे, या भावनेने त्यांनी केंद्र सरकारच्या योजना राबवल्या. त्याचबरोबर गरिबांनी गरिबीतून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, यासाठीही पुढाकार घेतला. 

पंतप्रधान झाल्यावर मोदीजींनी देशातील गरिबांसाठी एक मूलभूत आणि महत्त्वाचे काम केले. नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणचे पहिले काम  केले ते म्हणजे लोकांची बँकेमध्ये खाती उघडली. जनधन योजना!  माझ्या देशात एकही माता भगिनी ही चुलीवर स्वयंपाक करणार नाही, तिला गॅस मिळाला पाहिजे, या निर्धाराने मोदी सरकारने १६ जुलै २०२१पर्यंत ८ कोटी ३ लाख ३९,९९३ उज्ज्वला गॅस कनेक्शन दिली. देशात शौचालये बांधण्यासाठी पुढाकार घेतला.  सर्वसामान्य घरातील कोट्यवधी महिलांचा महत्त्वाचा प्रश्न सुटला.

२ कोटी ८१ लाख ६९ हजार ७२४ घरांना वीज पुरवठा सुरू झाला. मोदीजींनी गहाणवट न देता कर्ज देणाऱ्या मुद्रा योजनेत होतकरू तरुणांना कर्जवाटप केले. पंतप्रधान कौशल्य योजनेमधून ९२ लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले. केवळ बारा रुपयांमध्ये अपघात विमा योजना लागू केली. असंघटित कामगारांसाठी अटल पेन्शन योजना आणली.  दरमहा केवळ ४२ रुपये एवढी रक्कम १८ ते ६० वयाच्या कालावधीत टाकुन साठ वयानंतर तहहयात एक हजार रुपये पेन्शन मिळणार. आता ती मर्यादा पाच हजार रुपयांपर्यंत केली आहे. त्यासाठी दरमहा २१० रुपये भरण्याची गरज आहे. अठरापेक्षा अधिक वयाची व्यक्ती या योजनेत सहभागी झाली तर हप्ता वाढतो. साठनंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मृत्यूपर्यंत मिळणार. पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीला पाच हजार रुपये पेन्शन मृत्यूपर्यंत मिळणार. दोघांच्या मृत्यूनंतर मुलांना साडेआठ लाख रुपये मिळणार. 

आतापर्यंत तीन कोटी सहा लाख लोकांनी या योजनेचा फायदा घेऊन आयुष्य सुरक्षित केले आहे.  लॉकडाऊननंतर गरीब महिलांच्या खात्यात तीन महिने दरमहा प्रत्येकी पाचशे रुपये, तीन महिने उज्ज्वला गॅस योजनेमधला गॅस सिलिंडर मोफत, अपंग आणि वृद्धांना जी पेन्शन मिळते त्यामध्ये तीन महिन्यात हजार रुपये जास्तीचे अशी मदत केली. त्याचबरोबर ऐंशी कोटी लोकांना येत्या नोव्हेंबरपर्यंत प्रतिमाणसी पाच किलो तांदूळ किंवा पाच किलो गहू मोफत उपलब्ध केले. त्यांनी राबविलेला गरीब कल्याणाचा अजेंडा हा भाजपचा राजकीय कार्यक्रम किंवा डावपेचाचा भाग नाही तर मूलभूत विचार आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी