शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

PM Narendra Modi Birthday: PM मोदींमुळे रांगेतील शेवटच्या माणसाचे कल्याण!: चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 09:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे तारणहार आहेत.

पंतप्रधाननरेंद्र मोदी हे गरिबांचे तारणहार आहेत. देशातील गरिबांच्या गरजा आणि आकांक्षा या दोन्हींचेही भान ठेवून मोदीजींनी गेल्या सात वर्षांत पंतप्रधान म्हणून काम केले आहे. गरिबांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलाच पाहिजे, या भावनेने त्यांनी केंद्र सरकारच्या योजना राबवल्या. त्याचबरोबर गरिबांनी गरिबीतून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, यासाठीही पुढाकार घेतला. 

पंतप्रधान झाल्यावर मोदीजींनी देशातील गरिबांसाठी एक मूलभूत आणि महत्त्वाचे काम केले. नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणचे पहिले काम  केले ते म्हणजे लोकांची बँकेमध्ये खाती उघडली. जनधन योजना!  माझ्या देशात एकही माता भगिनी ही चुलीवर स्वयंपाक करणार नाही, तिला गॅस मिळाला पाहिजे, या निर्धाराने मोदी सरकारने १६ जुलै २०२१पर्यंत ८ कोटी ३ लाख ३९,९९३ उज्ज्वला गॅस कनेक्शन दिली. देशात शौचालये बांधण्यासाठी पुढाकार घेतला.  सर्वसामान्य घरातील कोट्यवधी महिलांचा महत्त्वाचा प्रश्न सुटला.

२ कोटी ८१ लाख ६९ हजार ७२४ घरांना वीज पुरवठा सुरू झाला. मोदीजींनी गहाणवट न देता कर्ज देणाऱ्या मुद्रा योजनेत होतकरू तरुणांना कर्जवाटप केले. पंतप्रधान कौशल्य योजनेमधून ९२ लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले. केवळ बारा रुपयांमध्ये अपघात विमा योजना लागू केली. असंघटित कामगारांसाठी अटल पेन्शन योजना आणली.  दरमहा केवळ ४२ रुपये एवढी रक्कम १८ ते ६० वयाच्या कालावधीत टाकुन साठ वयानंतर तहहयात एक हजार रुपये पेन्शन मिळणार. आता ती मर्यादा पाच हजार रुपयांपर्यंत केली आहे. त्यासाठी दरमहा २१० रुपये भरण्याची गरज आहे. अठरापेक्षा अधिक वयाची व्यक्ती या योजनेत सहभागी झाली तर हप्ता वाढतो. साठनंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मृत्यूपर्यंत मिळणार. पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीला पाच हजार रुपये पेन्शन मृत्यूपर्यंत मिळणार. दोघांच्या मृत्यूनंतर मुलांना साडेआठ लाख रुपये मिळणार. 

आतापर्यंत तीन कोटी सहा लाख लोकांनी या योजनेचा फायदा घेऊन आयुष्य सुरक्षित केले आहे.  लॉकडाऊननंतर गरीब महिलांच्या खात्यात तीन महिने दरमहा प्रत्येकी पाचशे रुपये, तीन महिने उज्ज्वला गॅस योजनेमधला गॅस सिलिंडर मोफत, अपंग आणि वृद्धांना जी पेन्शन मिळते त्यामध्ये तीन महिन्यात हजार रुपये जास्तीचे अशी मदत केली. त्याचबरोबर ऐंशी कोटी लोकांना येत्या नोव्हेंबरपर्यंत प्रतिमाणसी पाच किलो तांदूळ किंवा पाच किलो गहू मोफत उपलब्ध केले. त्यांनी राबविलेला गरीब कल्याणाचा अजेंडा हा भाजपचा राजकीय कार्यक्रम किंवा डावपेचाचा भाग नाही तर मूलभूत विचार आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी