शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

PM Narendra Modi Birthday: PM मोदींमुळे रांगेतील शेवटच्या माणसाचे कल्याण!: चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 09:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे तारणहार आहेत.

पंतप्रधाननरेंद्र मोदी हे गरिबांचे तारणहार आहेत. देशातील गरिबांच्या गरजा आणि आकांक्षा या दोन्हींचेही भान ठेवून मोदीजींनी गेल्या सात वर्षांत पंतप्रधान म्हणून काम केले आहे. गरिबांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलाच पाहिजे, या भावनेने त्यांनी केंद्र सरकारच्या योजना राबवल्या. त्याचबरोबर गरिबांनी गरिबीतून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, यासाठीही पुढाकार घेतला. 

पंतप्रधान झाल्यावर मोदीजींनी देशातील गरिबांसाठी एक मूलभूत आणि महत्त्वाचे काम केले. नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणचे पहिले काम  केले ते म्हणजे लोकांची बँकेमध्ये खाती उघडली. जनधन योजना!  माझ्या देशात एकही माता भगिनी ही चुलीवर स्वयंपाक करणार नाही, तिला गॅस मिळाला पाहिजे, या निर्धाराने मोदी सरकारने १६ जुलै २०२१पर्यंत ८ कोटी ३ लाख ३९,९९३ उज्ज्वला गॅस कनेक्शन दिली. देशात शौचालये बांधण्यासाठी पुढाकार घेतला.  सर्वसामान्य घरातील कोट्यवधी महिलांचा महत्त्वाचा प्रश्न सुटला.

२ कोटी ८१ लाख ६९ हजार ७२४ घरांना वीज पुरवठा सुरू झाला. मोदीजींनी गहाणवट न देता कर्ज देणाऱ्या मुद्रा योजनेत होतकरू तरुणांना कर्जवाटप केले. पंतप्रधान कौशल्य योजनेमधून ९२ लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले. केवळ बारा रुपयांमध्ये अपघात विमा योजना लागू केली. असंघटित कामगारांसाठी अटल पेन्शन योजना आणली.  दरमहा केवळ ४२ रुपये एवढी रक्कम १८ ते ६० वयाच्या कालावधीत टाकुन साठ वयानंतर तहहयात एक हजार रुपये पेन्शन मिळणार. आता ती मर्यादा पाच हजार रुपयांपर्यंत केली आहे. त्यासाठी दरमहा २१० रुपये भरण्याची गरज आहे. अठरापेक्षा अधिक वयाची व्यक्ती या योजनेत सहभागी झाली तर हप्ता वाढतो. साठनंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मृत्यूपर्यंत मिळणार. पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीला पाच हजार रुपये पेन्शन मृत्यूपर्यंत मिळणार. दोघांच्या मृत्यूनंतर मुलांना साडेआठ लाख रुपये मिळणार. 

आतापर्यंत तीन कोटी सहा लाख लोकांनी या योजनेचा फायदा घेऊन आयुष्य सुरक्षित केले आहे.  लॉकडाऊननंतर गरीब महिलांच्या खात्यात तीन महिने दरमहा प्रत्येकी पाचशे रुपये, तीन महिने उज्ज्वला गॅस योजनेमधला गॅस सिलिंडर मोफत, अपंग आणि वृद्धांना जी पेन्शन मिळते त्यामध्ये तीन महिन्यात हजार रुपये जास्तीचे अशी मदत केली. त्याचबरोबर ऐंशी कोटी लोकांना येत्या नोव्हेंबरपर्यंत प्रतिमाणसी पाच किलो तांदूळ किंवा पाच किलो गहू मोफत उपलब्ध केले. त्यांनी राबविलेला गरीब कल्याणाचा अजेंडा हा भाजपचा राजकीय कार्यक्रम किंवा डावपेचाचा भाग नाही तर मूलभूत विचार आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी