शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

चंद्रकांत खैरे स्वत:लाच फसवत नाहीत ना ?

By सुधीर महाजन | Updated: January 11, 2020 11:44 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खैरे हे खासदारांसाठी राखीव आसनावर जाऊन बसले आणि खा. इम्तियाज जलील यांना बाजूला कोपऱ्यात बसावे लागले.

- सुधीर महाजन 

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना काय झाले आहे? हा प्रश्न जसा प्रसारमाध्यमांना पडतो, तसा औरंगाबादच्या सामान्य माणसालाही पडला आहे. त्याचे उत्तर दुसरे-तिसरे कोणी नसून खैरेच देऊ शकतात; पण ते देणार नाहीत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खैरे हे खासदारांसाठी राखीव आसनावर जाऊन बसले आणि खा. इम्तियाज जलील यांना बाजूला कोपऱ्यात बसावे लागले. शासकीय शिष्टाचारानुसार बैठकीची आसन व्यवस्था असते. तिचे पालन व्हावे हे अभिप्रेत असते आणि राजकारणातील मंडळी तेवढी परिपक्वता दाखवतात. या घटनेनंतर जलील यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यात केवळ खैरे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला नाही, तर शिवसेनेच्या प्रतिमेवर परिणाम झाला.

संगीत खुर्चीची ही घटना काही पहिलीच नाही. यापूर्वी दोन वेळा एकदा एका पंचतारांकित हॉटेलातील बैठकीत आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीच्या वेळी असाच प्रकार घडला होता; परंतु यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या समक्षच ही घटना घडल्याने तिचे गांभीर्य वेगळे आहे. वास्तविक खैरे हे शिवसेनेचे नेते असले तरी कोणत्याही शासकीय पदावर नसल्याने त्यांना अशा प्रशासकीय बैठकांना उपस्थित राहता येत नाही; पण त्यांना टोकणारे प्रशासनातही कोणी नाही. त्यामुळेच असे वारंवार घडते. खरे तर उद्धव ठाकरेंनी त्याचवेळी सावरून घ्यायला पाहिजे होते. कारण यामुळे खैरेंपेक्षा जास्त शिवसेनेचे हसे झाले. ठाकरेंनी खैरेंना टोकले असते, तर ही नामुष्की टळली असती.

गेल्या ३५ वर्षांपासून चंद्रकांत खैरे हे राजकारणात आणि सातत्याने पदावर आहेत. नगरसेवकापासून ते मंत्री आणि खासदार, अशी त्यांची राजकीय कारकीर्द उंचावत गेली आणि सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत झालेला हा पहिलाच पराभव होता. अशा प्रकारातून नव्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडते. जी सध्या तळागाळातून वरपर्यंत फोफावत आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलेसाठी आरक्षण असताना पदाधिकारी महिलेचे अधिकार त्यांचे नवरे सर्रास वापरताना दिसतात. ‘झेरॉक्स पदाधिकारी’ असा या नवरोबांचा चेष्टेने उल्लेख केला जातो; पण त्याचा परिणाम होत नाही. सार्वजनिक जीवनात हा कोडगेपणा सर्रास दिसून येतो.

आता विषय निघालाच, तर औरंगाबादच्या राजकीय संस्कृतीचीही दखल घ्यायला हरकत नाही. ३५/४० वर्षांपूर्वी तत्कालीन राजकीय वातावरणाच्या गरजेतून मुंबईबाहेर औरंगाबादेत शिवसेनेचा उदय झाला. काँग्रेस पक्षाची आत्मभग्नता आणि बेपर्वाई ही औरंगाबादसह मराठवाड्यात शिवसेनेच्या उदयाची कारणे आहेत. सेनेने येथे आक्रमक राजकीय संस्कृती आणली आणि ती फोफावली. या आक्रमकपणात राजकीय परिपक्वतेचा ऱ्हास झाला आणि पुढची पस्तीस वर्षे शिवसेनेचे राजकारण या आक्रमकतेभोवती फिरत राहिले. याचा परिणाम या संघटनेवर झाला आणि तो आज प्रकर्षाने जाणवतो. आज सेनेकडे परिपक्व, प्रगल्भ नेतृत्वाची वानवा आहे. भविष्याचा वेध घेणारा उच्चशिक्षित असा एकही नेता मराठवाड्यात सेनेजवळ नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे एखादे द्रष्ट्ये नेतृत्व नाही आणि उगवत्या कार्यकर्त्यांमध्येही कोणी दिसत नाही. चार्टर्ड अकाऊंटंट रोहन आचलिया हे एकच नाव दिसते. या उलट सेनेचा प्रतिस्पर्धी असलेल्या एमआयएममध्ये खा. इम्तियाज जलील, डॉ. गफार कादरी, डॉ. हाश्मी, नासेर सिद्दीकी ही नावे घेता येतील. भाजपमध्ये तर उच्चशिक्षितांची भलीमोठी यादी आहे. याचाच अर्थ जी संस्कृती सेनेने जोपासली त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. उलट मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा हाताळला असता, तर एमआयएमला त्याचे भांडवल करता आले नसते. खैरे मात्र ही संधी त्यांना वारंवार उपलब्ध करून देतात, त्यांच्यासारख्या राजकारणी व्यक्तीला हे समजत नसावे, असे म्हणणे चूक आहे. सत्तेपासून दूर गेल्यानंतरही तिच्या आभासात राहत चंद्रकांत खैरे स्वत:लाच फसवत नाहीत ना?

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाImtiaz Jalilइम्तियाज जलीलChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन