शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गडकरींचे आव्हान अन् गुजरातचा कौल!

By रवी ताले | Updated: December 19, 2017 00:45 IST

सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधल्या दिवशी भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पश्चिम विदर्भात होते. त्यावेळी गडकरींनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलेले आव्हान आणि दुस-याच दिवशी शेजारच्या गुजरातने दिलेला कौल यांचा निश्चितपणे संबंध आहे.

सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधल्या दिवशी भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पश्चिम विदर्भात होते. त्यावेळी गडकरींनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलेले आव्हान आणि दुस-याच दिवशी शेजारच्या गुजरातने दिलेला कौल यांचा निश्चितपणे संबंध आहे.फडणवीस-गडकरी जोडगोळीने पश्चिम विदर्भात एकूण तीन ठिकाणी विविध विकास प्रकल्पांच्या कार्यान्वयन समारंभांमध्ये हजेरी लावली. त्यामध्ये प्रामुख्याने सिंचन प्रकल्पांचा समावेश होता. त्यापैकी अनेक प्रकल्प गत अनेक वर्षांपासून रखडले आहेत. ते पूर्णत्वास नेण्यासाठी तब्बल २० हजार कोटी रुपयांची तरतूद, केंद्रीय जल संधारण मंत्री या नात्याने गडकरींनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील कार्यक्रमास संबोधित करताना, आणखी पैसा लागला तरी उपलब्ध करून देऊ; पण मंजूर प्रकल्पांची कामे तीन वर्षांऐवजी एका वर्षात पूर्ण करून दाखवा, असे थेट आव्हानच त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. घोषणा केलेली कामे सरकारच्या उरलेल्या कालखंडात पूर्णत्वास नेण्याची निकडच गडकरींच्या आव्हानातून जाणवत होती.गुजरातच्या जनतेने भाजपाला कौल दिला असला तरी, आम्हाला गृहित धरू नका, असा सज्जड इशाराही भाजपाच्या जागा कमी करून दिला आहे. सोबतच जातीय समीकरणांच्या आधारे भाजपाला घेरण्याचा हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकोर या त्रिकुटाचा प्रयत्नही गुजराती मतदारांनी हाणून पाडला आहे. विकास, आश्वासनांची पूर्तता आणि स्वच्छ कारभार या निकषांवरच मतदान करण्याचा देशभरातील मतदारांचा कल गत काही काळापासून दिसून येत आहे.या पाशर््वभूमीवर, दीड-दोन वर्षात दोन निवडणुकांना सामोरे जाणार असलेल्या महाराष्ट्रातील भाजपा सरकारला, यापुढे आश्वासनपूर्तीकडे प्रामुख्याने लक्ष पुरवावे लागणार आहे. विदर्भापुरते बोलायचे २झाल्यास, केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर अनेक विकास प्रकल्पांची घोषणा झाली. प्रत्यक्षात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका खुणावू लागल्या असतानाही, अनेक प्रकल्पांच्या कामांना साधा प्रारंभही झालेला नाही, तर कामांना प्रारंभ झालेले प्रकल्प रखडले आहेत. रस्ते हा गडकरींचा खूप आवडीचा विषय; पण त्यांनी घोषणा केलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम कूर्मगतीने सुरू आहे. कृषी कर्जमाफीचा फडणवीस सरकारने खूप गाजावाजा केला; पण अंमलबजावणीत घालण्यात आलेल्या घोळामुळे ‘शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड’ अशी गत झाली आहे. सिंचन प्रकल्पांमधील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपाने खूप रान उठविले होते; पण भाजपाच्या कार्यकाळातही सिंचन प्रकल्प रखडलेलेच आहेत, ही वस्तुस्थिती आहे.ही परिस्थिती बदलली नाही, घोषणा प्रत्यक्षात उतरत असल्याचे जनतेला दिसले नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये फटका बसण्याचा धोका, आता फडणवीस-गडकरी जोडगोळीला जाणवू लागला आहे. त्याचेच प्रतिबिंब गिरीश महाजनांना दिलेल्या आव्हानात उमटले आहे.-रवी टालेravi.tale@lokmat.com 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Nitin Gadakriनितिन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस