शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दहशतीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:28 IST

दंडकारण्यात दहशत माजवणाऱ्या नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माणसं आता नाकारू लागली आहेत. बंदुकीच्या धाकावर थरार माजवू पाहणा-यांना आता थारा द्यायचा नाही, कुठलेही सहकार्य करायचे नाही, असा ठराव घेत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस्त करून शांती व विकासाची गुढी उभारणा-या नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा गावातील नागरिकांच्या धाडसाला सलामच करायला हवा.

दंडकारण्यात दहशत माजवणाऱ्या नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माणसं आता नाकारू लागली आहेत. बंदुकीच्या धाकावर थरार माजवू पाहणा-यांना आता थारा द्यायचा नाही, कुठलेही सहकार्य करायचे नाही, असा ठराव घेत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस्त करून शांती व विकासाची गुढी उभारणा-या नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा गावातील नागरिकांच्या धाडसाला सलामच करायला हवा. नक्षलवाद्यांच्या भूलथापांना आपण बळी पडलो, त्यांच्यामुळेच आपला विकास झाला नाही, ही बाब आता नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना कळून चुकली आहे. म्हणून की काय, आठ दिवसांपूर्वी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गावाच्या हद्दीत असलेले नक्षल स्मारक तोडण्याचा निर्णय घेत नक्षल चळवळीलाच खुले आव्हान देण्यात आले. गुढीपाडव्याची तारीख यासाठी ठरविण्यात आली आणि एकाच दिवशी चार नक्षल स्मारके खुलेआम तोडल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. उलट नक्षल हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांचे स्मारक उभारण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यातील तीन ते चार गावात सुरू झाले आहे. कालपर्यंत ज्या गावातील माणसं नक्षल्यांना आपली वाटायची ती आता त्यांच्या मनसुब्यांना ओळखून दुरावू लागली आहेत. त्यामुळे नक्षल्यांचे मनोबल खचू लागले आहे. भरकटलेल्या युवक-युवतींना नक्षलवादी चळवळीपासून दूर नेऊन आत्मसमर्पणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारालाही आता यश मिळू लागले आहे. ठिकठिकाणी जनजागरण मेळाव्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या प्रतिनिधींना त्यात सहभागी करून घेण्यात येत आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्याची जबाबदारी पोलीस पार पाडत आहेत. पोलीस चौक्यांचे जाळे पसरू लागले आहे. गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन गावकºयांच्या विविध पातळीवरील समस्या जाणून घेतल्या जात आहेत. त्यांच्या निराकरणासाठी संबंधित विभागांकडे नुसता पाठपुरावाच केला जात नाही तर त्या सुटत असल्याने आदिवासींचा लोकतंत्रावरील विश्वास आणखी घट्ट होऊ पाहत आहे. नुकताच ‘गांधी विचार व अहिंसा’ या पुस्तकातील उतारा एकाच वेळी ७०४१ जणांना ऐकवून गडचिरोलीवासीयांनी शांतीचा संदेश देत तुर्कस्तानचा विक्रम मोडला. गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर््सच्या चमूने या ऐतिहासिक कार्यक्रमाची घेतलेली दखल नक्षलवादाविरोधी पुकारण्यात आलेल्या लढ्याची सुरुवात असून नक्षल चळवळीला ओहोटी लागत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी