शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

दहशतीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:28 IST

दंडकारण्यात दहशत माजवणाऱ्या नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माणसं आता नाकारू लागली आहेत. बंदुकीच्या धाकावर थरार माजवू पाहणा-यांना आता थारा द्यायचा नाही, कुठलेही सहकार्य करायचे नाही, असा ठराव घेत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस्त करून शांती व विकासाची गुढी उभारणा-या नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा गावातील नागरिकांच्या धाडसाला सलामच करायला हवा.

दंडकारण्यात दहशत माजवणाऱ्या नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माणसं आता नाकारू लागली आहेत. बंदुकीच्या धाकावर थरार माजवू पाहणा-यांना आता थारा द्यायचा नाही, कुठलेही सहकार्य करायचे नाही, असा ठराव घेत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस्त करून शांती व विकासाची गुढी उभारणा-या नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा गावातील नागरिकांच्या धाडसाला सलामच करायला हवा. नक्षलवाद्यांच्या भूलथापांना आपण बळी पडलो, त्यांच्यामुळेच आपला विकास झाला नाही, ही बाब आता नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना कळून चुकली आहे. म्हणून की काय, आठ दिवसांपूर्वी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गावाच्या हद्दीत असलेले नक्षल स्मारक तोडण्याचा निर्णय घेत नक्षल चळवळीलाच खुले आव्हान देण्यात आले. गुढीपाडव्याची तारीख यासाठी ठरविण्यात आली आणि एकाच दिवशी चार नक्षल स्मारके खुलेआम तोडल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. उलट नक्षल हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांचे स्मारक उभारण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यातील तीन ते चार गावात सुरू झाले आहे. कालपर्यंत ज्या गावातील माणसं नक्षल्यांना आपली वाटायची ती आता त्यांच्या मनसुब्यांना ओळखून दुरावू लागली आहेत. त्यामुळे नक्षल्यांचे मनोबल खचू लागले आहे. भरकटलेल्या युवक-युवतींना नक्षलवादी चळवळीपासून दूर नेऊन आत्मसमर्पणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारालाही आता यश मिळू लागले आहे. ठिकठिकाणी जनजागरण मेळाव्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या प्रतिनिधींना त्यात सहभागी करून घेण्यात येत आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्याची जबाबदारी पोलीस पार पाडत आहेत. पोलीस चौक्यांचे जाळे पसरू लागले आहे. गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन गावकºयांच्या विविध पातळीवरील समस्या जाणून घेतल्या जात आहेत. त्यांच्या निराकरणासाठी संबंधित विभागांकडे नुसता पाठपुरावाच केला जात नाही तर त्या सुटत असल्याने आदिवासींचा लोकतंत्रावरील विश्वास आणखी घट्ट होऊ पाहत आहे. नुकताच ‘गांधी विचार व अहिंसा’ या पुस्तकातील उतारा एकाच वेळी ७०४१ जणांना ऐकवून गडचिरोलीवासीयांनी शांतीचा संदेश देत तुर्कस्तानचा विक्रम मोडला. गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर््सच्या चमूने या ऐतिहासिक कार्यक्रमाची घेतलेली दखल नक्षलवादाविरोधी पुकारण्यात आलेल्या लढ्याची सुरुवात असून नक्षल चळवळीला ओहोटी लागत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी