शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी निवडणुकांचे सरकारसमोर आव्हान

By admin | Updated: March 21, 2017 23:12 IST

सार्वजनिक निवडणुकांमधील दोष बाजूला सारून एक आदर्श निवडणूक प्रणाली अस्तित्वात आणण्याची संधी विद्यापीठ, महाविद्यालय विद्यार्थी संसद निवडणुकांमधून शक्य

सार्वजनिक निवडणुकांमधील दोष बाजूला सारून एक आदर्श निवडणूक प्रणाली अस्तित्वात आणण्याची संधी विद्यापीठ, महाविद्यालय विद्यार्थी संसद निवडणुकांमधून शक्य आहे, असा विश्वास असणारा एक वर्ग, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या निवडणुका म्हणजे विद्यापीठ, महाविद्यालयांचे रणांगण होणार असे ठाम मत व्यक्त करणारा मोठा प्रवाह आहे़ आता निवडणूक हवी की नको हा मुद्दा राहिलेला नाही़ कायदा अस्तित्वात आलेला आहे़ येणाऱ्या शैक्षणिक वर्षात त्याची अंमलबजावणीही होणार आहे़ परंतु ज्या कारणांसाठी यापूर्वी निवडणुका बंद करण्यात आल्या होत्या, तीच कारणे पुन्हा उद्भवणार नाहीत याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे़लोकशाहीत कुठल्याही निवडणुकांना विरोध करता येणार नाही़ परंतु सार्वजनिक निवडणुकांमधील हाणामारी, गुन्हेगारी, सत्ता, संपत्तीचा होणारा वापर, हे सर्व काही विद्यार्थी निवडणुकांमध्ये घडू नये अशी अपेक्षा आहे़ लिंग्डोह समितीच्या शिफारसीनंतर विद्यार्थी निवडणुकांचा संदर्भ पुढे आला आहे़ त्या अहवालातील विद्यार्थीहिताच्या शिफारशींचा विचार नियमावलीत करण्याची आवश्यकता आहे़ शिवाय विद्यार्थी संघटना, शिक्षणतज्ज्ञ व जाणकारांना विश्वासात घेतले पाहिजे़ मुंबई, पुणे, नागपूर अशा ठिकाणच्या विद्यापीठातील प्रश्न व ग्रामीण महाविद्यालयातील प्रश्न, शैक्षणिक वातावरण, तेथील विद्यार्थ्यांचे समाजजीवन यात मोठी तफावत आहे़ त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निश्चित करताना राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी व संस्था डोळ्यासमोर ठेवून नियमावली केली पाहिजे़ सरकारने यापूर्वी विद्यार्थी संघटनांशी चर्चा केली, विद्यापीठस्तरावर चर्चासत्रे झाली़ त्यामध्ये झालेल्या चर्चेचा, सूचनांचा गोषवारा सरकारने विचारात घेण्याची आवश्यकता आहे़ विद्यापीठ व महाविद्यालय निवडणुकीद्वारे अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व एक मागास प्रवर्गातील प्रतिनिधी निवडून द्यावयाचा आहे़ त्या-त्या वर्गातील विद्यार्थी आपला वर्ग प्रतिनिधी निवडून देणार आहेत़ यापूर्वी गुणवत्तेच्या निकषावर वर्ग प्रतिनिधी निवडला जात असे, त्यानंतर वर्गप्रतिनिधी सचिव निवडून देत़ केवळ सचिव पदासाठी मर्यादित स्वरूपात निवडणूक होऊनही वर्ग प्रतिनिधींची पळवापळवी, राजकीय हस्तक्षेप, प्रतिनिधींना सहल घडवून आणणे, किंबहुना हाणामारीपर्यंत प्रकरणे गेली़ त्याला केवळ विद्यार्थी वा त्यांच्या संघटना जबाबदार नाहीत, तर त्यासाठी राजकीय प्रवाह व पक्षांचा हस्तक्षेप कारणीभूत आहे़ नव्या कायद्यानुसार हस्तक्षेपाला जागा नाही, परंतु ते नियमात कसे बसविले जाईल हे पहावे लागेल़मतदान सर्वच विद्यार्थी करू शकतील; परंतु उभे राहण्यासाठी काही कठोर नियम होऊ शकतात़ ज्या महाविद्यालय वा विद्यापीठातून विद्यार्थी उभा राहणार आहे, त्याने किमान एक वर्ष त्याच संस्थेत शिक्षण घेतलेले असावे़ त्याची मागील वर्षाची हजेरी ७५ टक्के असावी़ आंदोलनवगळता कुठलाही गंभीर गुन्हा तर नसावाच शिवाय महाविद्यालय व विद्यापीठात गैरवर्तणुकीबद्दल शिक्षा झालेला नसावा, एकापेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण नसावा़ सर्वात महत्त्वाचे म्हणजे शैक्षणिक दिवसांचे नुकसान होऊ नये यासाठी सबंध निवडणूक प्रक्रिया तीन दिवसांपेक्षा अधिक काळ नसावी असे अनेक पर्याय सांगितले जात आहेत़ त्यावर सखोल चर्चा होऊ शकते, बदल होऊ शकतात़ एकंदर उमेदवारांची पात्रता, विनाखर्च प्रचारपद्धती, निवडणूक प्रक्रियेचा अत्यअल्प कालावधी, नियमांची पायमल्ली केली तर होणारी शिक्षा या सर्वच पातळीवर कठोर नियम केले तरच सकस नेतृत्व घडेल अन् शैक्षणिक वातावरणही दूषित होणार नाही़- धर्मराज हल्लाळे