शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

शंभरीतील दगडी बँक

By admin | Updated: May 28, 2016 04:03 IST

दगडी इमारतीतील सहकारी क्षेत्रातील जळगाव जिल्हा बँकेने शंभर वर्षांच्या वाटचालीत शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी फुलविली आहे.

- मिलिंद कुलकर्णीदगडी इमारतीतील सहकारी क्षेत्रातील जळगाव जिल्हा बँकेने शंभर वर्षांच्या वाटचालीत शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी फुलविली आहे. सहकार क्षेत्रातील वित्तीय संस्था अखंडपणे १०० वर्षे कार्यरत राहाणे हे संस्थापकांच्या दूरदृष्टी आणि या काळातील संचालकांच्या कुशल व्यवस्थापनाचा सुयोग्य परिपाक म्हणावा लागेल. जळगाव जिल्हा बँक हे त्याचे ठळक उदाहरण आहे. योग्य व्यक्तींच्या हाती संस्था राहावी आणि कारभाऱ्यांनी व्यवस्थित काम करावे याकडे जागरुक सभासदांनी कायम लक्ष ठेवल्याने बँकेला सोनियाचे दिवस आले आहेत. ब्रिटीश काळात खान्देशचे पूर्व व पश्चिम खान्देश असे दोन जिल्हे होते. पूर्व म्हणजे जळगाव तर पश्चिम म्हणजे धुळे-नंदुरबार असे त्याचे स्वरुप होते. पहिल्या महायुध्दानंतर ब्रिटीशकालीन भारतात आर्थिक संकट ओढवले. काही बँका डबघाईला गेल्या. यावेळी पाचोरा येथे एका कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रतिष्ठित नागरीक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आणि तेथे बँक स्थापनेचा विचार करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी जॉन हेर्ने सॅडर्स आणि प्रतिष्ठीत वकील दत्तात्रय गोविंद जुवेकर यांनी पुढाकार घेऊन आठ जणांची समिती गठीत केली. ठिकठिकाणी बैठका झाल्या. भागभांडवल गोळा करण्यास सुरुवात झाली. परंतु डबघाईला आलेल्या बँकांची स्थिती नजरेसमोर असताना नागरीक नव्या बँकेचे भाग घ्यायला पुढे येईनात. अखेर वकील जुवेकर यांनी स्वत: दहा भाग खरेदी करुन सुरुवात केली आणि मग हळूहळू सभासद वाढू लागले, असा बँक स्थापनेचा रंजक इतिहास आहे. दगडी बँक म्हणूनही या बँकेला ओळखले जाते, ते दोन अर्थाने. जळगावच्या नवीपेठेत १९३० मध्ये संपूर्ण दगडी बांधकामात बँकेची इमारत बांधण्यात आली. भक्कम वास्तू या अर्थाने दगडी बँक म्हणून जिल्हावासीयांच्या ती कौतुकाचा विषय आहे, आजही ही वास्तू सुस्थितीत आहे. जरी मुख्यालय रिंगरोडवरील सुसज्ज वास्तूत स्थलांतरीत झाले असले तरी. बँकेची भक्कम आर्थिक स्थिती या अर्थानेही ती शेतकरी, सहकारी संस्था यांना ‘दगडी बँक’ म्हणून आधारवड ठरली आहे. आर्थिक स्थैर्य, कुशल व्यवस्थापन, शाखा विस्तार यामुळे आशिया खंडातील अग्रणी बँक असा या बँकेचा नावलौकीक होता. वकील दत्तात्रय गोविंद जुवेकर हे पहिले चेअरमन होते. त्यानंतर बी.व्ही.देशमुख, जे.एस.पाटील आणि प्रल्हादराव पाटील या चेअरमन झालेल्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने बँकेला वैभवाच्या शिखरापर्यंत नेले. यातील प्रल्हादराव पाटील हे तर पुढे राज्य सहकारी बँकेचे चेअरमनदेखील झाले. के.एम.पाटील, सुरेशदादा जैन, डॉ.सतीश पाटील यांनी चेअरमनपद यशस्वी सांभाळल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातही आपल्या कामाचा ठसा उमटविला. महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खेवलकर आता चेअरमन आहेत. बँकेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत उनसावलीचे प्रसंगदेखील आले. आशिया खंडात नावलौकीक मिळविणाऱ्या या बँकेवर परवाना रद्दचा काळा दिवसदेखील पाहावा लागला. परंतु बँकेचा पाया भक्कम असल्याने हे दिवसही गेले आणि बँक पुन्हा प्रगतीपथावर घोडदौड करु लागली. तब्बल २७७ शाखांद्वारे जिल्हा बँकेने वित्तीय सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. सावकाराच्या जाळ्यात जाण्यापासून शेतकऱ्याला वाचविले ही खऱ्या अर्थाने बँकेची मोठी उपलब्धी आहे. सभासद आणि शेतकऱ्यांनी बँकेच्या उपकाराची परतफेड नेहमी विश्वासाने केली आहे. बँक आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांनी ठेवी काढल्या नाहीत आणि आता दुष्काळी स्थिती असतानाही यंदा ठेवींमध्ये २१३ कोटींची वाढ झाली आहे. हे बँकेवरील विश्वासाचे प्रतीक आहे. सहकारी क्षेत्रात निवडणुकांच्या माध्यमातून गैरकारभार करणाऱ्या संचालकांना सभासदांनी खड्यासारखे दूर ठेवले. चांगल्या व्यक्तींकडे वारंवार बँकेची धुरा सोपवली. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची बिकट अवस्था असताना जिल्हा बँक दमदार वाटचाल करीत आहे.