शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

किल्ले रामशेज

By admin | Updated: April 2, 2017 01:15 IST

रामशेज म्हणजे रामाची शय्या. आख्यायिकेनुसार श्रीराम वनवासात असताना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता, त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला ‘रामशेज’ हे नाव मिळाले

- गौरव भांदिर्गेरामशेज म्हणजे रामाची शय्या. आख्यायिकेनुसार श्रीराम वनवासात असताना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता, त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला ‘रामशेज’ हे नाव मिळाले.किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा :-पेठ मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम नाशिक गाठावे. नाशिकच्या सीबीएस बस स्थानकावरून ‘पेठ’कडे जाणारी एसटी पकडावी आणि आशेवाडी फाट्यावर उतरावे. येथून आशेवाडी गावात जावे. गावातून समोरच किल्ला दिसतो. किल्ला डाव्या बाजूला ठेवून वळसा घालून जाणारी वाट गावाच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जाते. या वाटेने गड गाठण्यास १ तास लागतो, तर संपूर्ण किल्ला बघायला दोन तास लागतात. गडदर्शन :-1रामशेज किल्ल्याची उंची समुद्र्रसपाटीपासून ९८५ मी. आहे. गावातील हनुमान मंदिराच्या शेजारून किल्ल्यावर जाणारी वाट जाते. गडावर शिरताना गुहा लागते. गुहेत रामाचे मंदिर आहे, तर एका बाजूला शिलालेख कोरलेला असून खालच्या बाजूला पाण्याचे एक टाके आहे. गुहेसमोरच्या तुटलेल्या पायऱ्या आपल्याला थेट गडावर घेऊन जातात. गडमाथ्यावर समोरच भग्न अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. येथून वर जाणारी वाट गडाच्या दुसऱ्या टोकापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट गडाच्या माचीवर जाते. थोडे पुढे गेल्यावर एक वाट उजवीकडे वळून कड्यापाशी येऊन थांबते. येथेच खाली गडाचा मुख्य दरवाजा आहे. आज दरवाजा भग्न अवस्थेत आहे. 2मुख्य वाटेवर थोडे वर चढल्यावर पाण्याची दोन टाके आणि एक मोठा तलाव पाहायला मिळतो. थोडे आणखी वर चढून गेल्यावर भगवती मातेच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिराच्या मागच्या बाजूने थोडे खाली उतरल्यावर चोर दरवाजा दिसतो. मंदिराच्या समोरून पुढे जाणारी वाट गडाच्या दुसऱ्या टोकापाशी जाते. या टोकाशी दोन पाण्याचे टाके व घरांचे पडके अवशेष आढळतात. हा सर्व परिसर पाहून मुख्य दरवाजापाशी परतायचे. येथून डावीकडे जाणारी वाट समोरच्या पठारावर जाते. पठाराच्या शेवटी एक ध्वजस्तंभ आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याच्या पिछाडीस पाण्याचे टाके, शिवलिंग व नंदी आहे. किल्ल्यावरून भोरगड म्हणजेच देहेरचा किल्ला, चांभार लेणी दिसतात.किल्ला जिंकण्यासाठी बहादूरखान काहीही करायला तयार होता. सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला सांगितले मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून द्या. तो मंतरून मी हातात घेईन आणि मग कुठलीही अडचण न येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेईन, मग विजय आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले. एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेवून मोगल सेना गडाच्या रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली. त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकाच्या छातीवर इतक्या जोराने लागला की, त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला. हे पाहून मोगल पळत सुटले. या पराभवाने औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जाताना शहाबुद्दीनने उभारलेला लाकडी बुरूज जाळून टाकला.इतिहास :-संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब हिंदवी स्वराज्य बुडविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला. अशा वेळी रामसेज घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर हल्ला चढवला, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला. त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले. मग शहाबुद्दीनने आजूबाजूचे जंगल तोडून लाकडी बुरूज उभारून त्यावर तोफा चढवून किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. या पराजयामुळे औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची आज्ञा दिली. आता वेढ्याची जबाबदारी बहादूरखानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली. या योजनेनुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा, वाद्ये इत्यादी साहित्य घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा. त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही संधी साधून मोगलांच्या दुसऱ्या गटाने विरुद्ध बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा. मराठ्यांना या योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी दोन्ही बाजूंना सैन्य विभागून मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले.