शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

किल्ले रामशेज

By admin | Updated: April 2, 2017 01:15 IST

रामशेज म्हणजे रामाची शय्या. आख्यायिकेनुसार श्रीराम वनवासात असताना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता, त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला ‘रामशेज’ हे नाव मिळाले

- गौरव भांदिर्गेरामशेज म्हणजे रामाची शय्या. आख्यायिकेनुसार श्रीराम वनवासात असताना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता, त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला ‘रामशेज’ हे नाव मिळाले.किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा :-पेठ मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम नाशिक गाठावे. नाशिकच्या सीबीएस बस स्थानकावरून ‘पेठ’कडे जाणारी एसटी पकडावी आणि आशेवाडी फाट्यावर उतरावे. येथून आशेवाडी गावात जावे. गावातून समोरच किल्ला दिसतो. किल्ला डाव्या बाजूला ठेवून वळसा घालून जाणारी वाट गावाच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जाते. या वाटेने गड गाठण्यास १ तास लागतो, तर संपूर्ण किल्ला बघायला दोन तास लागतात. गडदर्शन :-1रामशेज किल्ल्याची उंची समुद्र्रसपाटीपासून ९८५ मी. आहे. गावातील हनुमान मंदिराच्या शेजारून किल्ल्यावर जाणारी वाट जाते. गडावर शिरताना गुहा लागते. गुहेत रामाचे मंदिर आहे, तर एका बाजूला शिलालेख कोरलेला असून खालच्या बाजूला पाण्याचे एक टाके आहे. गुहेसमोरच्या तुटलेल्या पायऱ्या आपल्याला थेट गडावर घेऊन जातात. गडमाथ्यावर समोरच भग्न अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. येथून वर जाणारी वाट गडाच्या दुसऱ्या टोकापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट गडाच्या माचीवर जाते. थोडे पुढे गेल्यावर एक वाट उजवीकडे वळून कड्यापाशी येऊन थांबते. येथेच खाली गडाचा मुख्य दरवाजा आहे. आज दरवाजा भग्न अवस्थेत आहे. 2मुख्य वाटेवर थोडे वर चढल्यावर पाण्याची दोन टाके आणि एक मोठा तलाव पाहायला मिळतो. थोडे आणखी वर चढून गेल्यावर भगवती मातेच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिराच्या मागच्या बाजूने थोडे खाली उतरल्यावर चोर दरवाजा दिसतो. मंदिराच्या समोरून पुढे जाणारी वाट गडाच्या दुसऱ्या टोकापाशी जाते. या टोकाशी दोन पाण्याचे टाके व घरांचे पडके अवशेष आढळतात. हा सर्व परिसर पाहून मुख्य दरवाजापाशी परतायचे. येथून डावीकडे जाणारी वाट समोरच्या पठारावर जाते. पठाराच्या शेवटी एक ध्वजस्तंभ आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याच्या पिछाडीस पाण्याचे टाके, शिवलिंग व नंदी आहे. किल्ल्यावरून भोरगड म्हणजेच देहेरचा किल्ला, चांभार लेणी दिसतात.किल्ला जिंकण्यासाठी बहादूरखान काहीही करायला तयार होता. सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला सांगितले मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून द्या. तो मंतरून मी हातात घेईन आणि मग कुठलीही अडचण न येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेईन, मग विजय आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले. एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेवून मोगल सेना गडाच्या रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली. त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकाच्या छातीवर इतक्या जोराने लागला की, त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला. हे पाहून मोगल पळत सुटले. या पराभवाने औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जाताना शहाबुद्दीनने उभारलेला लाकडी बुरूज जाळून टाकला.इतिहास :-संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब हिंदवी स्वराज्य बुडविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला. अशा वेळी रामसेज घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर हल्ला चढवला, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला. त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले. मग शहाबुद्दीनने आजूबाजूचे जंगल तोडून लाकडी बुरूज उभारून त्यावर तोफा चढवून किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. या पराजयामुळे औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची आज्ञा दिली. आता वेढ्याची जबाबदारी बहादूरखानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली. या योजनेनुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा, वाद्ये इत्यादी साहित्य घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा. त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही संधी साधून मोगलांच्या दुसऱ्या गटाने विरुद्ध बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा. मराठ्यांना या योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी दोन्ही बाजूंना सैन्य विभागून मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले.