शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

फडणवीसांची जात

By admin | Updated: July 5, 2016 03:37 IST

फडणवीसांनी संभाजी राजेंना राज्यसभेवर पाठविण्याची केलेली खेळी हा पवारांसाठी मोठा धक्काच. ज्या समाजाच्या भरवशावर आपण आयुष्यभर राजकारण केले तो आपल्या हातून निसटून

- गजानन जानभोर फडणवीसांनी संभाजी राजेंना राज्यसभेवर पाठविण्याची केलेली खेळी हा पवारांसाठी मोठा धक्काच. ज्या समाजाच्या भरवशावर आपण आयुष्यभर राजकारण केले तो आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना, या भीतीतून पवार मुद्दाम तसे बोलले. शरद पवारांनी परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जात काढली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील जातीची गटारे पुढच्या काळात आणखी तुंबण्याची शक्यता बळावली. देवेंद्र फडणवीस नागपुरातील ज्या मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले, त्या मतदारसंघात मागासवर्गीय आणि ओबीसी मतदारांचेच अधिक प्राबल्य आहे. स्वत: फडणवीसांचे वडील गंगाधरराव संघातील ‘कॉम्रेड’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पक्षसंघटन बांधताना ब्राह्मणांना नव्हे तर बहुजन कार्यकर्त्यांनाच मोठे केले, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या जातीत जन्मास येणे आपल्या हातात नसते. तो जैविक योगायोग असतो, त्यामुळे आपल्या जातीचा दुराभिमान किंवा अहंकार बाळगणे हे मनोविकाराचे लक्षण असते. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणात ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न उपस्थित केला आणि तो धसास लावला. फडणवीसांच्या अवतीभवती जे कार्यकर्ते दिसतात, त्यात बहुजन कार्यकर्त्यांचीच गर्दी अधिक असते. त्यामुळे जातीच्या पलीकडे जाऊन सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींबद्दल असे गलिच्छ आणि जातीयवाचक विधान करणे पवारांसारख्या लोकनेत्याला शोभणारे नाही. शरद पवार हे चाणाक्ष आहेत. ते कुठलेही विधान सहज किंवा अनवधानाने करीत नाहीत. परंतु छत्रपती संभाजी राजेंना भाजपाने राज्यसभेत पाठविल्यामुळे पवार अस्वस्थ झाले आहेत. ज्या समाजाच्या भरवशावर आपण आयुष्यभर राजकारण केले तो आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना, या भीतीतून व तो जाऊ नये या त्राग्यातून पवार मुद्दाम तसे बोलले. भारतीय समाज झुंडीतून कधीच बाहेर पडू इच्छित नाही. त्याला जातीचा द्वेष आणि धर्माचा विखार सतत खुणावत असतो. त्यामागील समाजशास्त्रीय कारणे पवारांना ठाऊक असल्याने अशा जातीच्या झुंडी आपल्याच कब्जात ठेवण्यासाठी पवार असे नेहमी धडपडत असतात. २००९ ची विधानसभा निवडणूक आठवत असेल, पवार आणि त्यांच्या पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर जेम्स लेनचा मुद्दा पद्धतशीरपणे चिघळविला आणि निवडणुका जिंकल्या. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ‘तीन टक्यांचे राजकारण’ असा जातीय शब्दप्रयोग पवार नेहमी करायचे. त्यामागील मळमळ तीच होती. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना शेतकऱ्यांनी आपले पंचप्राण मानले, त्या वेळीही घायकुतीला आलेले पवार जोशींच्या जातीचा उल्लेख वारंवार करायचे. खा. राजू शेट्टींनाही त्यांनी असेच हिणवले. मराठ्यांना कसे हाताळावे हे या ‘द ग्रेट मराठा’ नेत्याला कळते. फडणवीसांनी संभाजी राजेंना राज्यसभेवर पाठविण्याची केलेली खेळी पवारांच्या जिव्हारी लागली आहे. तोपर्यंत त्यांनी शाहू महाराजांच्या या वंशजाला गृहीत धरले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे पराभूत झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेत पाठवण्याचे शहाणपण पवारांना सुचले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भंडाऱ्यातून प्रफुल पटेल पराभूत होत असल्याचे लक्षात येताच पवारांनी त्यांना फोन करून ‘काळजी करू नका, तुम्हाला राज्यसभेवर तारिक अन्वरांच्या जागेवर मी पाठवत आहे’ असा दिलासा दिला होता. पण अशा वेळी पवारांना संभाजीराजेंची आठवण राहात नाही. या ‘जाणत्या राजा’ने रयतेच्या, कुणबी-मराठा शेतकऱ्यांच्या नष्टचर्याला कारणीभूत असलेल्या मूलभूत कारणांचा शोध घेतला नाही, जातीचे राजकारण करणाऱ्यांना तो कधी घ्यावासाही वाटत नाही. ही गोष्ट या समाजातील सुजाण तरुणांना आता कळून चुकली आहे. हा तरुण नव्या राजकीय पर्यायाच्या शोधात असताना कालपर्यंत धर्मवादाचे राजकारण करणारी भाजपा या समाजाला आपल्या नव्या जातीय राजकारणाच्या सापळ्यात ओढू पाहते, तेव्हा पवारांचे अगतिक होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच त्यांचा हा थयथयाट याच करुणेतून समजून घेणे गरजेचे आहे.