शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

परदेशातील मुलांच्या वृद्ध आईवडिलांची देखभाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:39 IST

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये विशेषत: संगणक, अणुविज्ञान, माहिती तंत्रशास्त्र यासारख्या विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांत बहुधा नोकºया मिळतात. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मुले नोकरीनिमित्त परदेशी जातात व तेथेच काही कालावधीनंतर स्थायिक होतात. चांगली नोकरी, चांगले वातावरण, भरपूर पगार, स्वच्छ परिसर, करिअर करण्यासाठी उपलब्ध संधी, गुणवत्तेला वाव, भरपूर पैसा, चांगले जीवनमान या गोष्टी बहुधा प्रगत राष्ट्रामध्ये नोकरी व व्यवसायासाठी मुलांना आकर्षित करतात. त्यामुळे वृद्ध आईवडील भारतात एकटे पडतात.

मुलांना वारंवार भारतात येणे शक्य होत नाही. वयानुसार वृद्धांचे शारीरिक आजार व मानसिक दुर्बलता वाढीस लागते. नातवंडांसोबत खेळण्याच्या वयात एकटेपणा व आधाराविना जीवन जगणे असह्य होत असते. सुरुवातीच्या काळात नातेवाईक व आप्तांचा आधार मिळतो. मात्र नंतर तो मिळणे कठीण होत जाते. परदेशातील मुलांकडून त्यांना पैशाची आवक असते, पण रुग्णालयात वारंवार नेणे, औषधोपचार करून घेणे, खाण्यापिण्याची सोय होणे, मानसिक व कुटुंबाचे प्रेम मिळणे या गोष्टींपासून ते वंचित होत असल्यामुळे म्हातारपण अजूनच असह्य होते. आज पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात अशा वृद्ध नागरिकांची देखभाल करणे, त्यांचे खानपान करणे यासाठी विविध संस्थांनी आपले व्यवसाय चालू केले आहेत.

डॉक्टरची वेळ घेणे, दिलेल्या वेळेत वृद्ध लोकांच्या घरी जाऊन त्यांना नियमित दवाखान्यात नेणे, त्यांची डॉक्टरकडून तपासणी करून घेणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे, औषधी आणून देणे, त्यांना घरी व्यवस्थित पोहोचविणे, रोजचे जेवण पोहोचविणे, नियमित रक्तदाब तपासणे, रक्तातील घटकांची चाचणी करून रिपोर्टचा रेकॉर्ड ठेवणे, आरोग्य व्यवस्था घरी उपलब्ध करून देणे यासारख्या कामासाठी वर्षभराचा करार केला जातो व सेवा दिली जाते. याचे पैसे आॅनलाइन पद्धतीने बºयाचदा मुलांकडून सेवा देणाºया संस्थेच्या खात्यात भरले जातात. काही मुले परदेशातील अमेरिकन, इंग्रजी मुलींशी विवाह करतात. कुटुंबातील जवळीक संपुष्टात येते. व्हिसा व ग्रीनकार्ड अडचणीमुळे काही वेळा वृद्धांना परदेशात जाता येत नाही. काही वृद्ध मुलांकडे परदेशात जातात, पण बºयाच लोकांना काही काळानंतर करमत नाही व स्वत:ला तेथील परिस्थिती व वातावरणाशी जुळवून घेणे शक्य होत नसल्याने पुन्हा भारतात येण्याशिवाय पर्याय नसतो.

काही वेळा तर वृद्धांच्या अंत्यविधीलासुद्धा मुलांना परदेशातून वेळेवर येणे व उपस्थित राहणे शक्य होत नाही. भरपूर पैसा असूनसुद्धा हिरमुसलेले वृद्धापकाळातील आयुष्य जगणे बºयाचदा वृद्धांच्या नशिबी येते. प्रगत वैद्यकशास्त्र व योग्य देखभाल यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढत आहे. एका अभ्यासानुसार, भारतामध्ये वर्ष २0२५ पर्यंत जवळपास १२५ लक्ष लोक वयाच्या ६0 वर्षांपर्यंत जीवित राहणार आहेत व त्यामुळे त्यांची शुश्रूषा करणे अत्यावश्यक होणार आहे. म्हणूनच भारतात वृद्धांची देखभाल करणे हा व्यवसाय म्हणून उदयास येत आहे व भविष्यात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोमाने वेग धरेल ही वास्तविकता आपल्याला विसरता येणार नाही.- प्रा. डॉ. संदीप ताटेवार । अभियांत्रिकी प्राध्यापक