शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

परदेशातील मुलांच्या वृद्ध आईवडिलांची देखभाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:39 IST

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये विशेषत: संगणक, अणुविज्ञान, माहिती तंत्रशास्त्र यासारख्या विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांत बहुधा नोकºया मिळतात. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मुले नोकरीनिमित्त परदेशी जातात व तेथेच काही कालावधीनंतर स्थायिक होतात. चांगली नोकरी, चांगले वातावरण, भरपूर पगार, स्वच्छ परिसर, करिअर करण्यासाठी उपलब्ध संधी, गुणवत्तेला वाव, भरपूर पैसा, चांगले जीवनमान या गोष्टी बहुधा प्रगत राष्ट्रामध्ये नोकरी व व्यवसायासाठी मुलांना आकर्षित करतात. त्यामुळे वृद्ध आईवडील भारतात एकटे पडतात.

मुलांना वारंवार भारतात येणे शक्य होत नाही. वयानुसार वृद्धांचे शारीरिक आजार व मानसिक दुर्बलता वाढीस लागते. नातवंडांसोबत खेळण्याच्या वयात एकटेपणा व आधाराविना जीवन जगणे असह्य होत असते. सुरुवातीच्या काळात नातेवाईक व आप्तांचा आधार मिळतो. मात्र नंतर तो मिळणे कठीण होत जाते. परदेशातील मुलांकडून त्यांना पैशाची आवक असते, पण रुग्णालयात वारंवार नेणे, औषधोपचार करून घेणे, खाण्यापिण्याची सोय होणे, मानसिक व कुटुंबाचे प्रेम मिळणे या गोष्टींपासून ते वंचित होत असल्यामुळे म्हातारपण अजूनच असह्य होते. आज पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात अशा वृद्ध नागरिकांची देखभाल करणे, त्यांचे खानपान करणे यासाठी विविध संस्थांनी आपले व्यवसाय चालू केले आहेत.

डॉक्टरची वेळ घेणे, दिलेल्या वेळेत वृद्ध लोकांच्या घरी जाऊन त्यांना नियमित दवाखान्यात नेणे, त्यांची डॉक्टरकडून तपासणी करून घेणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे, औषधी आणून देणे, त्यांना घरी व्यवस्थित पोहोचविणे, रोजचे जेवण पोहोचविणे, नियमित रक्तदाब तपासणे, रक्तातील घटकांची चाचणी करून रिपोर्टचा रेकॉर्ड ठेवणे, आरोग्य व्यवस्था घरी उपलब्ध करून देणे यासारख्या कामासाठी वर्षभराचा करार केला जातो व सेवा दिली जाते. याचे पैसे आॅनलाइन पद्धतीने बºयाचदा मुलांकडून सेवा देणाºया संस्थेच्या खात्यात भरले जातात. काही मुले परदेशातील अमेरिकन, इंग्रजी मुलींशी विवाह करतात. कुटुंबातील जवळीक संपुष्टात येते. व्हिसा व ग्रीनकार्ड अडचणीमुळे काही वेळा वृद्धांना परदेशात जाता येत नाही. काही वृद्ध मुलांकडे परदेशात जातात, पण बºयाच लोकांना काही काळानंतर करमत नाही व स्वत:ला तेथील परिस्थिती व वातावरणाशी जुळवून घेणे शक्य होत नसल्याने पुन्हा भारतात येण्याशिवाय पर्याय नसतो.

काही वेळा तर वृद्धांच्या अंत्यविधीलासुद्धा मुलांना परदेशातून वेळेवर येणे व उपस्थित राहणे शक्य होत नाही. भरपूर पैसा असूनसुद्धा हिरमुसलेले वृद्धापकाळातील आयुष्य जगणे बºयाचदा वृद्धांच्या नशिबी येते. प्रगत वैद्यकशास्त्र व योग्य देखभाल यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढत आहे. एका अभ्यासानुसार, भारतामध्ये वर्ष २0२५ पर्यंत जवळपास १२५ लक्ष लोक वयाच्या ६0 वर्षांपर्यंत जीवित राहणार आहेत व त्यामुळे त्यांची शुश्रूषा करणे अत्यावश्यक होणार आहे. म्हणूनच भारतात वृद्धांची देखभाल करणे हा व्यवसाय म्हणून उदयास येत आहे व भविष्यात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोमाने वेग धरेल ही वास्तविकता आपल्याला विसरता येणार नाही.- प्रा. डॉ. संदीप ताटेवार । अभियांत्रिकी प्राध्यापक