शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बंदी, मुक्ती... सब कुछ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:24 IST

अधूनमधून पब्लिकला शॉक देणे, हे सरकारचे आवडीचे काम असते. मग या शॉकट्रिमेंटसाठी सरकार कधी बंदीचे हत्यार उपसते तर कधी काही गोष्टींपासून मुक्तीचा नारा देते.

अधूनमधून पब्लिकला शॉक देणे, हे सरकारचे आवडीचे काम असते. मग या शॉकट्रिमेंटसाठी सरकार कधी बंदीचे हत्यार उपसते तर कधी काही गोष्टींपासून मुक्तीचा नारा देते. आपल्या पाच वर्षांच्या राजवटीत असेकाही आगळेवेगळे केल्याशिवाय आपल्या छातीचे माप वाढतच नाही असे जणू सरकारला वाटत असावे. बरं असे निर्णय अभ्यास करून, संपूर्ण तयारी करून आणि पर्याय तयार ठेवून घेतले जातात का? तर अजिबात नाही.पण राजेहो...आमची पब्लिकही मोठी सहनशील आणि विचारी आहे. त्यांना माहीत आहे... हे बंदी, मुक्तीे केवळ फार्स आहेत. काही दिवस होईल त्रास मग पुन्हा ‘जैसे थे’.मोदी साहेबांनी एका रात्रीतून ‘नोटाबंदी’ लावली. पब्लिक खूष! त्यांना वाटले आता काळा पैशावाल्यांची खैर नाही. पण कसलं काय...! काळा पैसा बाहेर आला पण तो चक्क पांढरा होऊन. व्यवहार कॅशलेस तर झाले नाहीत पण पब्लिक बिचारी कितीतरी दिवस कॅशलेस होती.महाराष्टÑातील काही जिल्ह्यांत लागू केलेल्या दारूबंदीचे घ्या! आधी मिळत होती त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात दारूची उलाढाल होते या जिल्ह्यांत.खरं नाही वाटत...? मग वर्धा, चंद्रपूर किंवा गडचिरोली...यापैकी कोणत्याही जिल्ह्यात जा...घरबसल्या केवळ एक फोन फिरवा...पत्ता द्या...१० मिनिटात दारू घरपोच. हां... पैसे थोडे जास्त मोजावे लागतात. (साहाब...बॅन है, रिस्क भी तो उठाना पडता है... यावेळी डिलिवरी बॉय तुमच्या ज्ञानात भर घालतो)आता काल-परवा आलेल्या प्लास्टिकबंदीचे उदाहरण घ्या! काय तयारी आहे सरकारची? काही पर्याय आहेत का तुमच्याकडे. चार लाख कामगार बेकार होतील, त्याचे काय? ...काही उत्तर नाही.प्लास्टिकबंदीचा निर्णय एकदम मान्य हो...पर्यावरणाच्या दृष्टीने ते आवश्यकच होते. पण कन्फ्युजन किती? कशावर बंदी आहे, कशावर नाही, लोक गोंधळातच आहेत. आधी म्हणायचे किराणा दुकानातून प्लास्टिक पिशव्या बाद. आता म्हणतात, पाव किलोसाठी चालेल. ५०-५० ग्रॅमच्या पाच वस्तंूसाठी चालेल का विचारले तर म्हणतात माहीत नाही, धाकले महाराजांना विचारावे लागेल! बरं दंडही एवढा भयानक की, छाती दडपून जाते. परवा एक सर्जन विचारत होते... काहो, प्लास्टिक सर्जरीवरही बंदी आहे का?...उत्तर येते...चिरंजीवांना विचारावे लागेल.बिसलरी बाटल्या सर्वाधिक हानिकारक असताना त्यावर बंदी का नाही? असे विचारले तर...बाटल्या जिथे तयार होतात त्या कारखान्याच्या मालकालाच का विचारत नाही? असा उलट प्रश्न केला जातो.लोकांना कळले नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घ्यायचे असतात येथे तर ते सोडून धाकले महाराज, चिरंजीव, कारखाना मालक आणि आणखी कोण, कोण एवढे कसे बाहेरचे इन्व्हॉल्व्ह झाले.नंतर कुठूनतरी कळले...हा ट्रिपल रोल एकाचाच आहे.बरं मुख्यमंत्र्यांना विचारले तर त्यांचे कानावर हात आणि तोंडाला चिकट पट्टी (बहुदा प्लास्टिकचीच) पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते...होऊन जाऊ द्या...कळू द्या लोकांना त्यांच्या नेत्यांची ‘बुद्धिमत्ता’.-दिलीप तिखिले

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी