शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

बंदी, मुक्ती... सब कुछ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:24 IST

अधूनमधून पब्लिकला शॉक देणे, हे सरकारचे आवडीचे काम असते. मग या शॉकट्रिमेंटसाठी सरकार कधी बंदीचे हत्यार उपसते तर कधी काही गोष्टींपासून मुक्तीचा नारा देते.

अधूनमधून पब्लिकला शॉक देणे, हे सरकारचे आवडीचे काम असते. मग या शॉकट्रिमेंटसाठी सरकार कधी बंदीचे हत्यार उपसते तर कधी काही गोष्टींपासून मुक्तीचा नारा देते. आपल्या पाच वर्षांच्या राजवटीत असेकाही आगळेवेगळे केल्याशिवाय आपल्या छातीचे माप वाढतच नाही असे जणू सरकारला वाटत असावे. बरं असे निर्णय अभ्यास करून, संपूर्ण तयारी करून आणि पर्याय तयार ठेवून घेतले जातात का? तर अजिबात नाही.पण राजेहो...आमची पब्लिकही मोठी सहनशील आणि विचारी आहे. त्यांना माहीत आहे... हे बंदी, मुक्तीे केवळ फार्स आहेत. काही दिवस होईल त्रास मग पुन्हा ‘जैसे थे’.मोदी साहेबांनी एका रात्रीतून ‘नोटाबंदी’ लावली. पब्लिक खूष! त्यांना वाटले आता काळा पैशावाल्यांची खैर नाही. पण कसलं काय...! काळा पैसा बाहेर आला पण तो चक्क पांढरा होऊन. व्यवहार कॅशलेस तर झाले नाहीत पण पब्लिक बिचारी कितीतरी दिवस कॅशलेस होती.महाराष्टÑातील काही जिल्ह्यांत लागू केलेल्या दारूबंदीचे घ्या! आधी मिळत होती त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात दारूची उलाढाल होते या जिल्ह्यांत.खरं नाही वाटत...? मग वर्धा, चंद्रपूर किंवा गडचिरोली...यापैकी कोणत्याही जिल्ह्यात जा...घरबसल्या केवळ एक फोन फिरवा...पत्ता द्या...१० मिनिटात दारू घरपोच. हां... पैसे थोडे जास्त मोजावे लागतात. (साहाब...बॅन है, रिस्क भी तो उठाना पडता है... यावेळी डिलिवरी बॉय तुमच्या ज्ञानात भर घालतो)आता काल-परवा आलेल्या प्लास्टिकबंदीचे उदाहरण घ्या! काय तयारी आहे सरकारची? काही पर्याय आहेत का तुमच्याकडे. चार लाख कामगार बेकार होतील, त्याचे काय? ...काही उत्तर नाही.प्लास्टिकबंदीचा निर्णय एकदम मान्य हो...पर्यावरणाच्या दृष्टीने ते आवश्यकच होते. पण कन्फ्युजन किती? कशावर बंदी आहे, कशावर नाही, लोक गोंधळातच आहेत. आधी म्हणायचे किराणा दुकानातून प्लास्टिक पिशव्या बाद. आता म्हणतात, पाव किलोसाठी चालेल. ५०-५० ग्रॅमच्या पाच वस्तंूसाठी चालेल का विचारले तर म्हणतात माहीत नाही, धाकले महाराजांना विचारावे लागेल! बरं दंडही एवढा भयानक की, छाती दडपून जाते. परवा एक सर्जन विचारत होते... काहो, प्लास्टिक सर्जरीवरही बंदी आहे का?...उत्तर येते...चिरंजीवांना विचारावे लागेल.बिसलरी बाटल्या सर्वाधिक हानिकारक असताना त्यावर बंदी का नाही? असे विचारले तर...बाटल्या जिथे तयार होतात त्या कारखान्याच्या मालकालाच का विचारत नाही? असा उलट प्रश्न केला जातो.लोकांना कळले नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घ्यायचे असतात येथे तर ते सोडून धाकले महाराज, चिरंजीव, कारखाना मालक आणि आणखी कोण, कोण एवढे कसे बाहेरचे इन्व्हॉल्व्ह झाले.नंतर कुठूनतरी कळले...हा ट्रिपल रोल एकाचाच आहे.बरं मुख्यमंत्र्यांना विचारले तर त्यांचे कानावर हात आणि तोंडाला चिकट पट्टी (बहुदा प्लास्टिकचीच) पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते...होऊन जाऊ द्या...कळू द्या लोकांना त्यांच्या नेत्यांची ‘बुद्धिमत्ता’.-दिलीप तिखिले

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी