शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

संधी साधता येईल?

By admin | Updated: July 13, 2015 00:23 IST

चीनमधील शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटली आणि सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला.

चीनमधील शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटली आणि सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला. शेअर बाजार अत्यंत संवेदनशील असल्याने, ग्रीसमधील आर्थिक संकटापाठोपाठ चीनमध्ये शेअर बाजार कोसळल्याने भारतीय शेअर बाजार कोसळले, यात आश्चर्यजनक असे काही नव्हते; परंतु चीनमधील बाजार कोसळणे ही भारतासाठी खरेच धोक्याची घंटा आहे का? काही जाणकारांनुसार, ही भारतासाठी धोक्याची घंटा तर नाहीच; पण साधली तर संधीच ठरेल! चीनमधील संकटात भारतासाठी संधी शोधणारे तज्ज्ञ, २००८ मधील लेहमन ब्रदर्स पेचप्रसंगाची आठवण करून देतात. त्या पेचप्रसंगाच्या वेळीही जगभरातील शेअर बाजार एकापाठोपाठ कोसळले आणि भारतातही चिंतेचे वातावरण पसरले; मात्र कालांतराने भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आली व नंतर धावायलाही लागली. चीनमधील घटनेचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो, असे मानणाऱ्या अर्थतज्ज्ञांच्या मते, या संकटामुळे जगभरातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारावर विपरीत परिणाम होईल व त्यांच्या किमती घसरतील. भारत अशा वस्तूंची आयात, तर सेवांची निर्यात करतो. त्यामुळे वस्तूंच्या किमतीत घसरण होण्याचा भारताला लाभच होईल. भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन प्रामुख्याने देशांतर्गत मागणीच्या इंधनावर धावत असल्याने, चिनी बाजार कोसळल्यामुळे पडणारा मनोवैज्ञानिक प्रभाव लवकरच पुसला जाईल, असेही या तज्ज्ञांना वाटते. चीनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बॅँक व्याजदरातील अपेक्षित कपात पुढे ढकलू शकते आणि तसे झाल्यास जागतिक गुंतवणूकदार अमेरिकेकडे न वळता, भारताकडे वळू शकतील व त्याचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला होईल. सध्याच्या घडीला भारतातील महागाईचा दर नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर, मान्सूनने साथ दिली आणि नरेंद्र मोदी सरकारने योग्य ती पावले उचलली, तर संभाव्य संकटाचे संधीत रूपांतर करणे शक्य असल्याचे, या तज्ज्ञांचे मत आहे. डिझेलनंतर एलपीजी व रॉकेलवरील अनुदान बंद करून त्यांना नियंत्रणमुक्त करणे, सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे, बॅँकांना तातडीने भांडवलाचा पुरवठा करणे आणि कायद्याची गरज नसेल ती नियंत्रणे हटविण्याचा वेग वाढविणे, इत्यादी उपाययोजना त्यांनी सुचविल्या आहेत. या उपाययोजनांसाठी नरेंद्र मोदींनी बिहार निवडणूक आटोपण्याची वाट बघू नये; अन्यथा उशीर होईल, असा इशाराही या तज्ज्ञांनी दिला आहे.