शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

संधी साधता येईल?

By admin | Updated: July 13, 2015 00:23 IST

चीनमधील शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटली आणि सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला.

चीनमधील शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटली आणि सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला. शेअर बाजार अत्यंत संवेदनशील असल्याने, ग्रीसमधील आर्थिक संकटापाठोपाठ चीनमध्ये शेअर बाजार कोसळल्याने भारतीय शेअर बाजार कोसळले, यात आश्चर्यजनक असे काही नव्हते; परंतु चीनमधील बाजार कोसळणे ही भारतासाठी खरेच धोक्याची घंटा आहे का? काही जाणकारांनुसार, ही भारतासाठी धोक्याची घंटा तर नाहीच; पण साधली तर संधीच ठरेल! चीनमधील संकटात भारतासाठी संधी शोधणारे तज्ज्ञ, २००८ मधील लेहमन ब्रदर्स पेचप्रसंगाची आठवण करून देतात. त्या पेचप्रसंगाच्या वेळीही जगभरातील शेअर बाजार एकापाठोपाठ कोसळले आणि भारतातही चिंतेचे वातावरण पसरले; मात्र कालांतराने भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आली व नंतर धावायलाही लागली. चीनमधील घटनेचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो, असे मानणाऱ्या अर्थतज्ज्ञांच्या मते, या संकटामुळे जगभरातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारावर विपरीत परिणाम होईल व त्यांच्या किमती घसरतील. भारत अशा वस्तूंची आयात, तर सेवांची निर्यात करतो. त्यामुळे वस्तूंच्या किमतीत घसरण होण्याचा भारताला लाभच होईल. भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन प्रामुख्याने देशांतर्गत मागणीच्या इंधनावर धावत असल्याने, चिनी बाजार कोसळल्यामुळे पडणारा मनोवैज्ञानिक प्रभाव लवकरच पुसला जाईल, असेही या तज्ज्ञांना वाटते. चीनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बॅँक व्याजदरातील अपेक्षित कपात पुढे ढकलू शकते आणि तसे झाल्यास जागतिक गुंतवणूकदार अमेरिकेकडे न वळता, भारताकडे वळू शकतील व त्याचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला होईल. सध्याच्या घडीला भारतातील महागाईचा दर नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर, मान्सूनने साथ दिली आणि नरेंद्र मोदी सरकारने योग्य ती पावले उचलली, तर संभाव्य संकटाचे संधीत रूपांतर करणे शक्य असल्याचे, या तज्ज्ञांचे मत आहे. डिझेलनंतर एलपीजी व रॉकेलवरील अनुदान बंद करून त्यांना नियंत्रणमुक्त करणे, सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे, बॅँकांना तातडीने भांडवलाचा पुरवठा करणे आणि कायद्याची गरज नसेल ती नियंत्रणे हटविण्याचा वेग वाढविणे, इत्यादी उपाययोजना त्यांनी सुचविल्या आहेत. या उपाययोजनांसाठी नरेंद्र मोदींनी बिहार निवडणूक आटोपण्याची वाट बघू नये; अन्यथा उशीर होईल, असा इशाराही या तज्ज्ञांनी दिला आहे.