शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आपल्यालाही असे काही करता येणार नाही?

By गजानन जानभोर | Updated: April 3, 2018 00:59 IST

आपण आयुष्यभर कौटुंबिक पाशात करकचून अडकलेले असतो. पण वैयक्तिक जीवनातील मोह-माया बाळगूनही आपण आपल्या भोवतालच्या एखाद्या शंकरबाबाला, मतीन भोसलेला मदत करू शकतो.

आपल्या अपराधाचे प्रायश्चित घेण्यासाठी एक न्यायमूर्ती दोषी अधिकाऱ्याला आपला पगार अनाथांना द्यायला सांगतो आणि मुलाच्या लग्नात जमा झालेले पैसे एक गुरुदेव भक्त फासेपारध्यांच्या मुलांना शिक्षणासाठी देतो, या दोन घटना माणूसपणाची हाक देणा-या आणि सारेच अंधारलेले नाही असे सांगणा-या देखील... सध्या अमरावतीचे माहिती आयुक्त असलेल्या संभाजी सरकुंडे या अधिका-याच्या हातून काही वर्षांपूर्वी एक चूक झाली. खरे तर अशा गुन्ह्यासाठी न्यायालय एकतर शिक्षा ठोठावते किंवा दंडाची रक्कम सरकारी निधीत जमा करायला सांगते. परंतु न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सरकुंडे यांना प्रायश्चित घेण्याची संधी दिली आणि महिन्याभराचा पगार घेऊन शंकरबाबा पापळकर या फकिराच्या आश्रमात पाठवले. लोकसेवक म्हणून समाजातील दीन-दुबळ्यांच्या दु:खाची तुम्हाला जाणीव असावी, न्या. गवर्इंच्या निर्देशामागील हा वस्तुपाठ. सरकुंडेंसाठी तो दंड असेल पण इतर लोकसेवकांसाठी ती प्रेरणा देखील आहे. न्यायमूर्ती गवर्इंनी त्या अधिका-याला शंकरबाबांच्या आश्रमात मदत द्यायला सांगणे ही गोष्ट न्यायालयावरील लोकश्रद्धा वाढवणारीही आहे.न्यायासने साधारणत: अशा गोष्टीत स्वत:हून लक्ष घालत नाहीत. न्यायदेवतेच्या डोळयावर असलेल्या पट्टीचे त्यांच्यावर एवढे दडपण असते की असे काही करणे म्हणजे चौकट मोडल्यासारखे तर होणार नाही ना, अशी भीती न्यायमूर्तींना वाटत असते. गवई यांच्या सामाजिक पुढाकारामुळे शंकरबाबा पापळकर नावाच्या फाटक्या कार्यकर्त्याला केवळ मदतच झालेली नाही तर त्याच्या परमेश्वरी कार्याकडे उच्चभ्रू समाजाचे लक्षही वेधले गेले आहे. शंकरबाबांच्या आश्रमात दीडशेपेक्षा अधिक अंध, अपंग, मतिमंद मुले आहेत. यातील काही नालीत सापडलेली तर काही कचºयात फेकलेली. हा फकीर ४० वर्षांपासून या दुर्दैवी जिवांचा संसार मांडून बसला आहे. ही मुले १८ वर्षांची झाल्यानंतर कायद्यानुसार त्यांना आश्रमात ठेवता येत नाही. त्यांच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था आजमितीला नाही. शंकरबाबा यासाठी रात्रंदिवस तळमळत असतात. या मुलांच्या पुनर्वसनाचा कायदा व्हावा असे कुठल्याही सरकारला वाटत नाही. त्यामुळे अशाच एखाद्या सामाजिक जाणिवेच्या न्यायासनाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.दुसरी घटना, अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील. राष्टÑसंतांच्या विचारांचा एक पाईक मुलाच्या लग्नात आलेले पैसे फासेपारध्यांच्या मुलांसाठी धडपडणाºया मतीन भोसले या कार्यकर्त्याला देतो. हा समाजशिक्षण देणारा विवाह सोहळा. भाऊराव बगाडे हे या गुरुदेव भक्ताचे नाव. याच सोहळ्यात ज्ञानेश्वर रक्षकांनी त्यांना अलीकडेच मिळालेल्या पुरस्काराचे २५ हजार रुपये मतीनला दिले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या खेड्यात मतीनची ‘प्रश्नचिन्ह’ ही शाळा आहे. फासेपारध्यांच्या ४५० मुलांना घेऊन तो इथे कुडाच्या घरांत राहतो. या शाळेतील मुले कधीकाळी भीक मागणारी, चोरी करणारी. आता त्यांच्या आयुष्याला अर्थ गवसला आहे. प्रत्येकालाच गाडगेबाबा होता येत नाही. त्यासाठी पराकोटीचा त्याग हवा असतो, स्वत:च्या हातांनी नात्यांचे पाश तोडावे लागतात. आपण मात्र आयुष्यभर कौटुंबिक पाशात करकचून अडकलेले असतो. पण वैयक्तिक जीवनातील मोह-माया बाळगूनही आपण आपल्या भोवतालच्या एखाद्या शंकरबाबाला, मतीन भोसलेला मदत करू शकतो. न्या. भूषण गवई, भाऊराव बगाडे किंवा ज्ञानेश्वर रक्षक या सहृदय माणसांनी आपले सामान्यपण कायम ठेवीत तेच केले. आपल्यालाही असे काही करता येणार नाही? 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या