शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

७० कोटींचा हिशोब द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 02:22 IST

एखाद्या गरीब विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क भरण्यास एक दिवसाचा विलंब केल्यास त्याला बाहेरचा रस्ता दाखविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या

एखाद्या गरीब विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क भरण्यास एक दिवसाचा विलंब केल्यास त्याला बाहेरचा रस्ता दाखविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थापनात ७० कोटी ९० लाख रुपयांचा गोलमाल असल्याचा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी ठेवला आहे. ‘कॅग’चा अहवाल नेहमीच येतो. देऊन टाकू हिशोब या मानसिकतेत वावरणाºया प्रशासकीय अधिकाºयांसाठी ही बाब नवी नसली तरी विद्यापीठाचे विविध विभाग, परीक्षा केंद्र, कर्मचारी इत्यादींना देण्यात आलेल्या अग्रिमाच्या रकमेपैकी ७० कोटी ९० लाख रुपयांची रक्कम अद्यापही समायोजित न होणे. यातील काही अग्रीम रकमेचे समायोजन १९८८ पासून प्रलंबित असणे ही निश्चितच सरकार आणि आर्थिक बाबतीत नंबर वन १ चे प्रशासन असल्याचा दावा करणाºया कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे ७० कोटी ९० लाख रुपयांचा हिशोब विद्यापीठाने सरकार आणि कॅगला सादर करावा, हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. जे अधिकारी हिशोब सादर करण्यास असमर्थ असतील, यातील काही निवृत्त झाले असतील तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करीत कारवाई होणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त आयोजित अतिथीभोजमध्ये न बोलविता जेवणाचा स्वाद घेणाºया प्राध्यापकांचा हिशोब लावणाºया विद्यापीठ प्रशासनाला ७० कोटी ९० लाख रुपयांचा हिशोब (समायोजन) सादर करण्यास विलंब का लागतोय, ही निश्चितच न समजणारी बाब आहे. ‘कॅग’ने तर आपल्या अहवालात या रकमेत मोठ्या प्रमाणात अफरातफर होण्याची भीती व्यक्त केली आहे. ‘कॅग’ कधीही कोणत्याही अहवालात भीती व्यक्त करीत नाही. मात्र विद्यापीठाच्या बाबतीत ‘कॅग’ला असे वाटणे यात घोटाळा तर दडला नाही ना, याची खातरजमा कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी करून घेणे निश्चितच गरजेचे आहे. अन्यथा कार्यकाळ संपताना तेही अडचणीत येऊ शकतात. ‘कॅग’ने विद्यापीठाच्या महाविद्यालय संलग्नीकरण प्रक्रियेतील घोळ, शिक्षणप्रणाली, संशोधनातील माघारलेपणा आदी बाबींवर ताशेरे ओढले आहेत. ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या वर्षाचा अहवाल जारी करताना ‘कॅग’ने २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीची तपासणी करण्यासाठी जानेवारी ते जून २०१७ दरम्यान लेखापरीक्षण केले होते. यात अग्रीम घेणाºया विभागाचे प्रमुखास निधीचे समायोजन करण्यासाठी जबाबदार ठरविले आहे. असे असतानाही पहिल्या अग्रीमची परतफेड झाल्याशिवाय पुढील अग्रीम प्रदान करायला नको होते. विद्यापीठात मात्र हे नियमित होत आहे. परीक्षा विभागात याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या रकमेचा हिशोब घेण्यात आला नाही तर हा आकडा भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.