शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

७० कोटींचा हिशोब द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 02:22 IST

एखाद्या गरीब विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क भरण्यास एक दिवसाचा विलंब केल्यास त्याला बाहेरचा रस्ता दाखविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या

एखाद्या गरीब विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क भरण्यास एक दिवसाचा विलंब केल्यास त्याला बाहेरचा रस्ता दाखविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थापनात ७० कोटी ९० लाख रुपयांचा गोलमाल असल्याचा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी ठेवला आहे. ‘कॅग’चा अहवाल नेहमीच येतो. देऊन टाकू हिशोब या मानसिकतेत वावरणाºया प्रशासकीय अधिकाºयांसाठी ही बाब नवी नसली तरी विद्यापीठाचे विविध विभाग, परीक्षा केंद्र, कर्मचारी इत्यादींना देण्यात आलेल्या अग्रिमाच्या रकमेपैकी ७० कोटी ९० लाख रुपयांची रक्कम अद्यापही समायोजित न होणे. यातील काही अग्रीम रकमेचे समायोजन १९८८ पासून प्रलंबित असणे ही निश्चितच सरकार आणि आर्थिक बाबतीत नंबर वन १ चे प्रशासन असल्याचा दावा करणाºया कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे ७० कोटी ९० लाख रुपयांचा हिशोब विद्यापीठाने सरकार आणि कॅगला सादर करावा, हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. जे अधिकारी हिशोब सादर करण्यास असमर्थ असतील, यातील काही निवृत्त झाले असतील तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करीत कारवाई होणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त आयोजित अतिथीभोजमध्ये न बोलविता जेवणाचा स्वाद घेणाºया प्राध्यापकांचा हिशोब लावणाºया विद्यापीठ प्रशासनाला ७० कोटी ९० लाख रुपयांचा हिशोब (समायोजन) सादर करण्यास विलंब का लागतोय, ही निश्चितच न समजणारी बाब आहे. ‘कॅग’ने तर आपल्या अहवालात या रकमेत मोठ्या प्रमाणात अफरातफर होण्याची भीती व्यक्त केली आहे. ‘कॅग’ कधीही कोणत्याही अहवालात भीती व्यक्त करीत नाही. मात्र विद्यापीठाच्या बाबतीत ‘कॅग’ला असे वाटणे यात घोटाळा तर दडला नाही ना, याची खातरजमा कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी करून घेणे निश्चितच गरजेचे आहे. अन्यथा कार्यकाळ संपताना तेही अडचणीत येऊ शकतात. ‘कॅग’ने विद्यापीठाच्या महाविद्यालय संलग्नीकरण प्रक्रियेतील घोळ, शिक्षणप्रणाली, संशोधनातील माघारलेपणा आदी बाबींवर ताशेरे ओढले आहेत. ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या वर्षाचा अहवाल जारी करताना ‘कॅग’ने २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीची तपासणी करण्यासाठी जानेवारी ते जून २०१७ दरम्यान लेखापरीक्षण केले होते. यात अग्रीम घेणाºया विभागाचे प्रमुखास निधीचे समायोजन करण्यासाठी जबाबदार ठरविले आहे. असे असतानाही पहिल्या अग्रीमची परतफेड झाल्याशिवाय पुढील अग्रीम प्रदान करायला नको होते. विद्यापीठात मात्र हे नियमित होत आहे. परीक्षा विभागात याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या रकमेचा हिशोब घेण्यात आला नाही तर हा आकडा भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.