शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

कॅगचा बौद्धिक खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 01:15 IST

राफेल व्यवहारावर टिप्पणी करणारा कॅगचा अहवाल बुधवारी संसदेत मांडला गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ‘जितं मया’ अशी घोषणा केली. खरे तर, कोणत्याही बाजूचे पूर्ण समाधान होईल अशी अहवालाची मांडणी नाही.

राफेल व्यवहारावर टिप्पणी करणारा कॅगचा अहवाल बुधवारी संसदेत मांडला गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ‘जितं मया’ अशी घोषणा केली. खरे तर, कोणत्याही बाजूचे पूर्ण समाधान होईल अशी अहवालाची मांडणी नाही. हा अहवाल सरकारवर ताशेरे झाडत नाही तशी शाबासकीही देत नाही. राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा कोणताही संशय या अहवालात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या उमटलेला नाही, एवढी एकच बाब सरकारच्या बाजूने जाणारी आहे. मात्र व्यवहार पूर्णपणे निर्दोष झाला, असेही कॅगने म्हटलेले नाही. सौदा फायद्याचा झाल्याचा प्रचार मोदी करतात. वस्तुस्थिती वेगळी असून फायदा झाला असला तरी तो अत्यंत मामुली आहे व डुसॉल कंपनीला अधिक फायदा झाला आहे, असे हा अहवाल सांगतो. तथापि यातून पैशाची बेकायदा देवाणघेवाण झाल्याचे दिसत नाही. शहाणपणाचा अभाव आणि करार करण्याची घाई यामुळे ही त्रुटी राहिली असावी. यूपीएच्या काळात संरक्षण खरेदी ठप्प झाल्याने भारताची संरक्षण व्यवस्था दुबळी झाली व शत्रुराष्ट्रे प्रबळ झाली. म्हणून तातडीने ३६ विमानांची खरेदी करावी लागली, असेही मोदी सांगत होते. अद्ययावत विमान खरेदी करण्याचा प्रश्न आपण जलदीने सोडवला म्हणून पाठ थोपटून घेत होते. वस्तुत: असे काहीही झालेले नाही. उलट आधी ठरल्याप्रमाणे ११८ ऐवजी फक्त ३६ विमानेच घ्यायचे का ठरले, याचा समाधानकारक खुलासा संरक्षण मंत्रालयाने केला नाही, असे कॅगने म्हटले आहे. यूपीए सरकारपेक्षा फक्त एक महिना लवकर आता राफेल दाखल होणार आहे. फक्त एक महिन्याच्या जलदीसाठी इतका आटापिटा व स्वत:चा उदोउदो करण्याची गरज होती काय, असा प्रश्न उद्भवतो. मोदी सरकार स्वत:ला जे कार्यक्षमतेचे व कुशल कारभाराचे प्रमाणपत्र देतात ते तितकेसे बरोबर नाही, असे कॅगने दाखवून दिले आहे. मात्र राफेल व्यवहारावर भ्रष्टाचाराचा डाग कॅगला सापडला नसल्याने मोदी सरकारला या अहवालाचा प्रचारासाठी उपयोग होईल. या अहवालावर काँग्रेस व मोदी विरोधातील अन्य पक्षांनी अपेक्षेप्रमाणे झोड उठविली. काँग्रेसने तर अहवाल मांडला जाण्यापूर्वीच त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राफेल व्यवहार संशयातीत नाही हे अनेकांना मान्य आहे. पण सरकारला कोंडीत पकडताना घाई करूनही चालत नाही. भ्रष्टाचाराचे ठोस मुद्दे घेऊन राफेल व्यवहारावर मारा केला तर जनतेचा त्यावर विश्वास बसेल. कॅग अहवाल येण्याची वाट पाहून आणि सरकारच्या विरोधात जाणारी अहवालातील निरीक्षणे घेऊन काँग्रेसने टीका केली असती तर काँग्रेसला ते फायद्याचे ठरले असते. कॅगचे मुख्याधिकारी महरिषी यांच्याकडून नि:पक्ष अहवाल येणे शक्यच नाही, असा संशय काँग्रेसने अहवाल येण्यापूर्वीच जाहीर केला. पण अहवालाने व्यवहारातील अनेक त्रुटी उघड केल्या आहेत. राफेल खरेदीसाठी वाटाघाटी करणाऱ्या समितीतील तीन सदस्यांनी या व्यवहाराशी असहमती दर्शविली होती, असे काँग्रेसने म्हटले आहे. या असहमतीची दखल कॅगने घेतलेली नाही, असे काँग्रेस म्हणते. पण केवळ राफेल हेच एकमेव विमान योग्य होते काय, असा प्रश्न कॅगचे मुख्याधिकारी महरिषी यांनी उपस्थित केला आहे. म्हणजे कॅगने स्वतंत्र बुद्धीने काम केले आहे. याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. कारण काँग्रेसलाही राफेल विमान पसंत आहे. फक्त कराराच्या योग्यतेवर काँग्रेसचा आक्षेप आहे. सत्तेवर आल्यास राफेल खरेदी रद्द न करता आम्ही करार बदलून याहून जास्त विमाने घेऊ, असे पी. चिदम्बरम यांनी सांगितले. यावरून काँग्रेसची भूमिका कळून येते. तथापि, सर्व राजकीय पक्षांनी गंभीरपणे विचारात घ्यावे असे दोन मुद्दे अहवालात आहेत. संरक्षणसामग्री खरेदीच्या सदोष व चालढकल करणाºया यंत्रणेत बदल करण्याची तसेच केवळ स्वस्त निविदेवर विसंबून न राहण्याची सूचना कॅगने केली आहे. अत्याधुनिक विमानांची खरेदी गेली १९ वर्षे रखडली आहे. जगातील कोणतेही अत्याधुनिक तंत्रज्ञान वेगाने कालबाह्य होत असते. या वेगवान जगात टिकायचे असेल तर केवळ किमतीचा घोळ न घालता प्रभावी शस्त्रायुधे जलदीने खरेदी करणारी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. ही जबाबदारी सर्व पक्षांवर आहे आणि परस्पर संवादातूनच ती साध्य होईल. संवादाचा अभाव हा मोदी सरकारचा स्वभाव असल्यामुळे राफेलचे रामायण घडत आहे व पुढेही घडत राहील. मग सरकार कुणाचेही येवो.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील