शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

budget 2021 : शेतीचे उत्पन्न दुप्पट करणार होते, त्याचे काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 02:41 IST

budget 2021: जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवून देशासह जगाचीही अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली, अशा वाईट स्थितीमध्ये शेतकरीच संकटमोचक बनले. कृषिक्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेची  वेगाने होणारी घसरण थांबली.

- राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक)जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवून देशासह जगाचीही अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली, अशा वाईट स्थितीमध्ये शेतकरीच संकटमोचक बनले. कृषिक्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेची  वेगाने होणारी घसरण थांबली. लॉकडाऊनच्या काळामध्ये नोकऱ्या व रोजगार गमावलेल्या असंघटित क्षेत्रातील गरीब लोकांना गावातल्या शेतीनेच आसरा दिला. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या क्षेत्रासाठी भरीव तरतूद करतील, अशी शेतकऱ्यांची भाबडी आशा होती, ती फोल ठरली. या अर्थसंकल्पात शेतकरी, सामान्य माणूस, नोकरदार, व्यापारी यांच्यासाठी काहीच नसून कोरोनाकाळामध्ये ज्या अब्जाधिशांची मालमत्ता ३५ टक्क्यांनी वाढली, अशा देशातील ९५४ अब्जाधीश इंडियन लोकांसाठीचा हा अर्थसंकल्प  आहे, म्हणूनच शेअर बाजाराने उसळी खाल्ली.बाजारातील शेतीमालाची तेजीमंदी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात चिंताजनक बाब असते. सुसज्ज भांंडार व्यवस्था, शेतीगृहे, पॅकिंग हाऊस, सॉर्टिंग, ग्रेडिंग व्यवस्था गरजेची आहे. याकडे अर्थमंत्र्यांनी ढुंकूनही बघितलेले नाही. पायाभूत सुविधांमध्ये खासगी क्षेत्राची मक्तेदारी निर्माण झाल्याशिवाय नव्या तीन कृषी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणार नाही आणि शेतीक्षेत्रात नव्याने आलेल्या उद्योगपतींना तेजीमंदीचे श्रीखंड ओरपता येणार नाही. म्हणून अर्थमंत्र्यांनी जाणीवपूर्वक या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले आहे. शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना शेतकरी कंपन्यांमार्फत नव्हेतर कार्पोरेट हाऊसेसमार्फत चालना मिळावी असेच कदाचित अर्थमंत्र्यांना वाटत असेल. ऊस व दूध उत्पादकांना तर बेदखलच  केले आहे.रोजगार गमावलेला बहुसंख्य असंघटित मजूर अजूनही गावातच आहे. त्याला रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची होती. म्हणून महात्मा गांधी रोजगार योजनेसाठी भरीव तरतुदीची आवश्यकता असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा हजार कोटींची कपात करून यावर्षी केवळ ६१ हजार कोटींची तरतूद केली आहे. आक्रमक झालेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी गव्हासाठी ७५ हजार कोटींची तरतूद केल्याचा दावा  अर्थमंत्री  करतात. पण, ही तरतूद गहू खरेदी करण्यासाठी आहे आणि ती नेहमीच केली जाते. १५ लाख कोटी कृषी कर्जाचे बँकांना उद्दिष्ट आहे त्यातले  शेतकऱ्यांच्या पदरात किती पडणार हे कोडेच आहे. सिंचनासाठी पाच हजार कोटींची तरतूद आहे. त्यातून सिंचनाचे नवे प्रकल्प सोडा; चालू आहे तेसुद्धा मार्गी लागू शकत नाहीत.शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ ला दुप्पट होणार होते; त्याचे काय झाले? अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये वारंवार मनमोहन सिंग सरकारच्या तरतुदींचा उल्लेख येत होता. तुलना करायची असेल तर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये डिझेल, रासायनिक खते, वीजबिले, बियाणे, कीटकनाशके आदींचे भाव काय होते आणि आता काय आहेत, याची तुलना करा. या देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या अन्नधान्याची मालकी मूठभर लोकांच्या ताब्यात देऊन सर्वसामान्य जनतेला अन्नासाठी भिकेला लावायचे, या दिशेने सरकारने टाकलेले पाऊल म्हणजेच यंदाचा अर्थसंकल्प होय.

टॅग्स :budget 2021बजेट 2021agricultureशेती