शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

budget 2018 : दीडपट हमीभावाची अशीही बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:00 IST

कृषी क्षेत्राला उभारी, रोजगारनिर्मिती आणि खासगी गुंतवणुकीला चालना देणे अशी तीन प्रमुख आव्हाने आजच्या अर्थसंकल्पाकडून पूर्ण होतील किंवा त्याबद्दल काही ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा असताना मोदी सरकारच्या अखेरच्या अर्थसंकल्पात शेतक-यांची पुन्हा एकदा फसवणूक झाली आहे, बेरोजगार युवकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

- पृथ्वीराज चव्हाण(माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य )कृषी क्षेत्राला उभारी, रोजगारनिर्मिती आणि खासगी गुंतवणुकीला चालना देणे अशी तीन प्रमुख आव्हाने आजच्या अर्थसंकल्पाकडून पूर्ण होतील किंवा त्याबद्दल काही ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा असताना मोदी सरकारच्या अखेरच्या अर्थसंकल्पात शेतक-यांची पुन्हा एकदा फसवणूक झाली आहे, बेरोजगार युवकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही तर उद्योगांना निगम करातून कोणतीही सूट न दिल्यामुळे गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता मावळली आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेतकरीवर्ग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विशेष भर देण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतक-यांचे उत्पन्न दुपटीच्या त्याच त्या घोषणा आणि उत्पादन खर्चाच्या आकडेवारीचे फसवे गणित मांडून शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमीभाव देण्याची अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेली घोषणा किती पोकळ आहे हे यातून समोर आले.दुप्पट कृषी उत्पन्न आणि हमीभावाबाबतीत केलेल्या घोषणांच्या तपशिलात जाऊन पहिले असता दोन गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात. दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार शेतक-यांचे उत्पन्न गेल्या चार वर्षांत फक्त १ टक्क्याने वाढले आहे. अर्थमंत्री सांगतात त्याप्रमाणे शेती उत्पादनात वाढ झाली, परंतु कृत्रिमरीत्या शेतमालाच्या किमती नियंत्रित केल्याने शेतक-यांचे उत्पन्न वाढू शकले नाही. शेतकरीविरोधी आयात-निर्यात धोरण आणि बाजार नियंत्रण राबवल्यामुळे देशातील शेतकºयांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळाला नाही.उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक हमीभाव देताना नेमके ‘उत्पादन खर्च’ काढताना त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी धरायच्या याबद्दल स्वामिनाथन आयोगाने विस्तृत मार्गदर्शन केले आहे. परंतु, आता अशी शंका येत आहे की मोदी सरकार ‘उत्पादन खर्च’ यामधील घटक कमी करून त्याची व्याप्ती कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून नवीन सूत्रानुसार सरकारी व्याख्येप्रमाणे शेतकºयांचा उत्पादन खर्च कमी करायचा आणि त्याच्या दीडपट हमीभाव द्यायचा.मुद्रा योजनेअंतर्गत मोठमोठाले आकडे सांगून सरकारने (स्वयं) रोजगारनिर्मिती केल्याचा दावा केला. परंतु वास्तवातील आकडेवारी काय आहे? मुद्रा योजनेअंतर्गत एकूण दिल्या गेलेल्या कर्जापैकी ४७% कर्ज हे शिशू (रु. पन्नास हजारपर्यंत) प्रवर्गातील आहे, ३०% कर्ज हे किशोर (रु. पन्नास हजार ते रु. पाच लाख) प्रवर्गातील लाभार्थ्यांना वाटले आहे आणि केवळ २३% कर्ज तरुण (रु. पाच लाख ते रु. १० लाख) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना दिले गेले आहे. याची सरासरी काढली असता मुद्रा योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला फक्त ४३,००० रुपये मिळाले आहेत. आता एवढ्या रकमेत किती शाश्वत रोजगार निर्माण झाले असतील हे सांगण्यासाठी कोणत्याही अर्थतज्ज्ञाची गरज नाही.२५० कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या लघू आणि मध्यम उद्योगांना २५% कराच्या जाळ्यात आणून सरकारने फक्त ७००० कोटी रुपयांची खैरात केली आहे. एकूण जमा होणा-या निगम करापैकी हे प्रमाण फक्त १% इतके नगण्य आहे. त्यातच मोठ्या उद्योगांना अपेक्षित असलेली करसूट न दिल्याने गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला किती चालना मिळणार हा प्रश्न आहे.आयुषमान योजनेअंतर्गत १० कोटी कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख विमाकवच देण्याची घोषणा आकर्षक आहे. परंतु, यासंबंधी अर्थसंकल्पात तरतूदच केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ही घोषणा फक्त निवडणूक समोर ठेवून केली आहे की काय, असे मानण्यास वाव आहे.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८FarmerशेतकरीagricultureशेतीBudgetअर्थसंकल्प