शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

भावा, सांभाळ रे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:39 IST

कोणताही पक्ष आणि नेता हा कार्यकर्त्यांना द्वेशबुध्दीने वागा, प्रतिस्पर्धी पक्ष व कार्यकर्त्याचा मत्सर करा असे कधीही सांगत नाही. खाली कार्यकर्तेच एकमेकांना कट्टर शत्रू समजून वागत, बोलत असतात.

मिलिंद कुलकर्णीलोकसभा व विधान सभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्याने सर्वत्र निवडणूक ज्वर पसरला आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत राजकारणाचीच चर्चा सुरु आहे. लग्नकार्य असो की, अंत्ययात्रा...दोन्ही ठिकाणी निवडणुकीचीच चर्चा आहे. समाजमाध्यमांवर तर निवडणूक विषयी चर्चेला महापूर आला आहे. मोदीभक्त आणि विरोधक अशी सरळ विभागणी झालेली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने, त्यांनी आधार कार्डविषयी केलेले वक्तव्य व्हीडिओद्वारे पुन्हा प्रसारीत करुन त्यातील फोलपणा लक्षात आणून दिला जात आहे. जनरल थिमय्या, संत रविदास, संत कबीर आणि अन्य संतांचा कालावधी यात मोदी यांनी भाषणात केलेली गफलत आवर्जून लक्षात आणून दिली जात आहे. अर्थात भक्तदेखील प्रत्युत्तरादाखल राहुल गांधी, नवज्योतसिंग सिध्दू यांचे व्हीडिओ प्रसारीत करीत आहे. विश्वैश्वरैया यांचा नामोच्चार करताना राहुल गांधी यांची उडालेली भंबेरी, बटाट्याविषयीचे कथित वक्तव्य हे व्हीडिओ सर्वाधिक प्रसारीत होत आहे. व्हॉटस अ‍ॅप मेसेजद्वारे मोदी यांचे महिमामंडन केले जात आहे. त्यात मोदी यांच्या परिवारातील कुणीही सत्तेत नाही. आईसोबत घराच्या ओट्यावर प्लॅस्टिक खुर्चीवर बसलेल्या मोदी यांचा फोटो आवर्जून प्रसारीत केला जातो. हिमालयात तपस्या करायला गेलेल्या मोदी यांचे छायाचित्र सर्वाधिक प्रसारीत होत आहे. परदेशी निधी मिळणाऱ्या स्वयंसेवी संस्थांवर निर्बंध, पॉस व आधारमुळे स्वस्त धान्य दुकानांमधील गैरव्यवहार रोखणे, सर्जिकल स्ट्राईक, नोटबंदीने काळाबाजाराला चाप असे महत्त्वपूर्ण निर्णय भाजपा आणि भक्तांकडून प्रसारीत होत आहेत. तर काँग्रेस आणि मोदी विरोधक हे असहिष्णुता, दलित-मुस्लिमांवरील अन्याय, राममंदिराचा अनुत्तरीत विषय, १५ लाख रुपये बँक खात्यात न येणे, मल्या, नीरव मोदी, चोकसी यांचे देशातून पलायन या मुद्यांवर जोर देत आहेत.प्रियंका गांधी राजकारणात सक्रीय झाल्याने समाजमाध्यमांवरील युध्दाला आणखी धार चढली आहे. भाजपा आणि मोदीभक्त प्रियंका यांच्यावर अक्षरश: वैयक्तीक टीका करीत आहेत. दिल्लीतील रात्रीच्या रॅलीत धक्काबुक्की करणाºया नागरिकांना रागावणाºया प्रियंकाविषयी अपप्रचार करणे, भावाच्या मदतीला धावून आलेल्या इतिहासातील बहिणींचे उल्लेख करुन खिल्ली उडविणे, मोदींच्या कुटुंबातील कुणीच राजकारणात नसताना गांधी घराण्यातील तिसरी व्यक्ती आता राजकारणात आल्याचे अधोरेखित करणे, असे प्रकार सुरु आहेत.या पार्श्वभूमीवर दोन छायाचित्रे सर्वाधिक चर्चेत राहिली. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या विशेष शोसाठी राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उपस्थिती आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत खूप चर्चेत राहिले. दुसरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुपूत्राच्या विवाह सोहळ्याला उपस्थित काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, राष्टÑवादीच्या सुप्रिया सुळे, सुनेत्रा अजित पवार, स्मिता ठाकरे, रश्मी उध्दव ठाकरे यांचे समूह छायाचित्रदेखील लोकप्रिय झाले. दोन्ही प्रसंग वेगळे आहेत. बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तीमत्व असे आहे की, सर्वच पक्षीय नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यावर मन:पूर्वक प्रेम करीत असत. त्यांच्यावरील चित्रपटाला त्यामुळे सर्वपक्षीयांनी हजेरी लावली आणि मोकळेपणाने मनोगते व्यक्त केली. तर राज ठाकरे यांच्याकडील पहिल्या शुभकार्याला सगळे जमणे ओघाने आलेच. लग्नकार्य, सुखद प्रसंगात एकत्र येणे ही तर भारतीय संस्कृती झाली. त्याला अनुरुप हे सगळे झाले. पण निवडणुकीचे राजकारण इतके हातघाईला आलेले आहे की, कार्यकर्त्यांना ही गोष्ट कल्पनेपलिकडील वाटते. त्यातून मग संदेशांचा भडीमार सुरु झाला. भावा, सांभाळ रे. गावा गावात आपण पक्ष आणि नेत्याच्या नावाने भांडत बसतो आणि तिकडे नेते एकत्र येतात आणि हास्यविनोद करतात. मात्र या संदेशात अर्धसत्य आहे. कोणताही पक्ष आणि नेता हा कार्यकर्त्यांना द्वेशबुध्दीने वागा, प्रतिस्पर्धी पक्ष व कार्यकर्त्याचा मत्सर करा असे कधीही सांगत नाही. खाली कार्यकर्तेच एकमेकांना कट्टर शत्रू समजून वागत, बोलत असतात. नेत्यांच्या पातळीवर असलेले समंजसपण, तारतम्य, परिपक्वता ही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली तर लोकशाहीच्यादृष्टीने ते सुचिन्ह म्हणावे लागेल.

टॅग्स :Jalgaonजळगाव