शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भावा, सांभाळ रे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:39 IST

कोणताही पक्ष आणि नेता हा कार्यकर्त्यांना द्वेशबुध्दीने वागा, प्रतिस्पर्धी पक्ष व कार्यकर्त्याचा मत्सर करा असे कधीही सांगत नाही. खाली कार्यकर्तेच एकमेकांना कट्टर शत्रू समजून वागत, बोलत असतात.

मिलिंद कुलकर्णीलोकसभा व विधान सभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्याने सर्वत्र निवडणूक ज्वर पसरला आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत राजकारणाचीच चर्चा सुरु आहे. लग्नकार्य असो की, अंत्ययात्रा...दोन्ही ठिकाणी निवडणुकीचीच चर्चा आहे. समाजमाध्यमांवर तर निवडणूक विषयी चर्चेला महापूर आला आहे. मोदीभक्त आणि विरोधक अशी सरळ विभागणी झालेली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने, त्यांनी आधार कार्डविषयी केलेले वक्तव्य व्हीडिओद्वारे पुन्हा प्रसारीत करुन त्यातील फोलपणा लक्षात आणून दिला जात आहे. जनरल थिमय्या, संत रविदास, संत कबीर आणि अन्य संतांचा कालावधी यात मोदी यांनी भाषणात केलेली गफलत आवर्जून लक्षात आणून दिली जात आहे. अर्थात भक्तदेखील प्रत्युत्तरादाखल राहुल गांधी, नवज्योतसिंग सिध्दू यांचे व्हीडिओ प्रसारीत करीत आहे. विश्वैश्वरैया यांचा नामोच्चार करताना राहुल गांधी यांची उडालेली भंबेरी, बटाट्याविषयीचे कथित वक्तव्य हे व्हीडिओ सर्वाधिक प्रसारीत होत आहे. व्हॉटस अ‍ॅप मेसेजद्वारे मोदी यांचे महिमामंडन केले जात आहे. त्यात मोदी यांच्या परिवारातील कुणीही सत्तेत नाही. आईसोबत घराच्या ओट्यावर प्लॅस्टिक खुर्चीवर बसलेल्या मोदी यांचा फोटो आवर्जून प्रसारीत केला जातो. हिमालयात तपस्या करायला गेलेल्या मोदी यांचे छायाचित्र सर्वाधिक प्रसारीत होत आहे. परदेशी निधी मिळणाऱ्या स्वयंसेवी संस्थांवर निर्बंध, पॉस व आधारमुळे स्वस्त धान्य दुकानांमधील गैरव्यवहार रोखणे, सर्जिकल स्ट्राईक, नोटबंदीने काळाबाजाराला चाप असे महत्त्वपूर्ण निर्णय भाजपा आणि भक्तांकडून प्रसारीत होत आहेत. तर काँग्रेस आणि मोदी विरोधक हे असहिष्णुता, दलित-मुस्लिमांवरील अन्याय, राममंदिराचा अनुत्तरीत विषय, १५ लाख रुपये बँक खात्यात न येणे, मल्या, नीरव मोदी, चोकसी यांचे देशातून पलायन या मुद्यांवर जोर देत आहेत.प्रियंका गांधी राजकारणात सक्रीय झाल्याने समाजमाध्यमांवरील युध्दाला आणखी धार चढली आहे. भाजपा आणि मोदीभक्त प्रियंका यांच्यावर अक्षरश: वैयक्तीक टीका करीत आहेत. दिल्लीतील रात्रीच्या रॅलीत धक्काबुक्की करणाºया नागरिकांना रागावणाºया प्रियंकाविषयी अपप्रचार करणे, भावाच्या मदतीला धावून आलेल्या इतिहासातील बहिणींचे उल्लेख करुन खिल्ली उडविणे, मोदींच्या कुटुंबातील कुणीच राजकारणात नसताना गांधी घराण्यातील तिसरी व्यक्ती आता राजकारणात आल्याचे अधोरेखित करणे, असे प्रकार सुरु आहेत.या पार्श्वभूमीवर दोन छायाचित्रे सर्वाधिक चर्चेत राहिली. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या विशेष शोसाठी राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उपस्थिती आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत खूप चर्चेत राहिले. दुसरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुपूत्राच्या विवाह सोहळ्याला उपस्थित काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, राष्टÑवादीच्या सुप्रिया सुळे, सुनेत्रा अजित पवार, स्मिता ठाकरे, रश्मी उध्दव ठाकरे यांचे समूह छायाचित्रदेखील लोकप्रिय झाले. दोन्ही प्रसंग वेगळे आहेत. बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तीमत्व असे आहे की, सर्वच पक्षीय नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यावर मन:पूर्वक प्रेम करीत असत. त्यांच्यावरील चित्रपटाला त्यामुळे सर्वपक्षीयांनी हजेरी लावली आणि मोकळेपणाने मनोगते व्यक्त केली. तर राज ठाकरे यांच्याकडील पहिल्या शुभकार्याला सगळे जमणे ओघाने आलेच. लग्नकार्य, सुखद प्रसंगात एकत्र येणे ही तर भारतीय संस्कृती झाली. त्याला अनुरुप हे सगळे झाले. पण निवडणुकीचे राजकारण इतके हातघाईला आलेले आहे की, कार्यकर्त्यांना ही गोष्ट कल्पनेपलिकडील वाटते. त्यातून मग संदेशांचा भडीमार सुरु झाला. भावा, सांभाळ रे. गावा गावात आपण पक्ष आणि नेत्याच्या नावाने भांडत बसतो आणि तिकडे नेते एकत्र येतात आणि हास्यविनोद करतात. मात्र या संदेशात अर्धसत्य आहे. कोणताही पक्ष आणि नेता हा कार्यकर्त्यांना द्वेशबुध्दीने वागा, प्रतिस्पर्धी पक्ष व कार्यकर्त्याचा मत्सर करा असे कधीही सांगत नाही. खाली कार्यकर्तेच एकमेकांना कट्टर शत्रू समजून वागत, बोलत असतात. नेत्यांच्या पातळीवर असलेले समंजसपण, तारतम्य, परिपक्वता ही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली तर लोकशाहीच्यादृष्टीने ते सुचिन्ह म्हणावे लागेल.

टॅग्स :Jalgaonजळगाव