शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा ‘तेजो’भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:50 IST

भारतीय रेल्वेमागचे शुक्लकाष्ठ अजून संपलेले दिसत नाही. देशातल्या वेगवान रेल्वेमध्ये अभिमानाने उल्लेख होत असलेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये घडलेली विषबाधेची घटना रेल्वे सेवेची नाचक्की करणारी आहे.

भारतीय रेल्वेमागचे शुक्लकाष्ठ अजून संपलेले दिसत नाही. देशातल्या वेगवान रेल्वेमध्ये अभिमानाने उल्लेख होत असलेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये घडलेली विषबाधेची घटना रेल्वे सेवेची नाचक्की करणारी आहे. रेल्वेची ‘खानपान’ सेवा एकेकाळी दर्जेदार आणि परवडणारी मानली जायची. पण गेल्या १५-२० वर्षांत या सेवेचा दर्जा प्रचंड प्रमाणात घसरला. केवळ पर्याय नसल्याने ही सेवा जिवंत राहिली. त्याची गांभीर्याने दखल घेत रेल्वे मंडळाने सुधारणा करण्याच्या घोषणाही केल्या. पण तेजसमधील विषबाधेच्या घटनेने रेल्वेची ही सेवाही काळवंडली. ‘तेजस’मधील आॅम्लेट आणि सूप प्यायल्यानंतर अनेकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. जवळपास २४ जणांना बाधा झाली. त्यातील तिघांची प्रकृती तर अत्यवस्थ झाली होती. या घटनेमुळे रेल्वेमधील खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी पुन्हा एकदा चर्चा चव्हाट्यावर आली आहे. ‘पॅन्ट्री कार’मधील अस्वच्छता, पुरेसे प्रशिक्षण नसलेले कर्मचारी, खानपानाचे कंत्राट एकदा मिळाल्यानंतर दर्जाकडे ढुंकूनही न पाहणारे मिजासखोर कंत्राटदार आणि त्यांना पाठीशी घालणारे रेल्वे अधिकारी या सर्वांची तपशिलाने चौकशी व्हायला हवी. ‘तेजस’मधील घटनेनंतर वरिष्ठ अधिकाºयांनी सर्वच रेल्वेमधील खाद्य पदार्थांची चाळणी पद्धतीने तपासणी करायला हवी. ज्या कंत्राटदारांकडून खाण्याचा दर्जा राखला गेलेला नाही त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकायला हवे. कारण हा थेट प्रवाशांच्या जिवाशी खेळ आहे. रेल्वेने गेल्या अर्थसंकल्पात चार नवीन एक्स्प्रेसची घोषणा केली. हमसफर, अंत्योदय, उदय आणि तेजस एक्स्प्रेस. तेजस एक्स्प्रेसला भारतीय रेल्वेचा वेगवान चेहरा म्हणून देशासमोर सादर करण्यात आले. परंतु विषबाधेच्या घटनेने ही प्रतिमा धुळीस मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे चर्चेत आहे. सप्टेंबर महिन्यातील तीन रेल्वे अपघात असोत; दुरांतो एक्स्प्रेस, एल्फिन्स्टन दुर्घटना असो वा तेजसमधील विषबाधा. खरेतर, यामुळे भारतीय रेल्वेच्या तेजाला ग्रहण लागले आहे. सप्टेंबरमध्ये तीन रेल्वे अपघात घडले. शक्तिकुंज, कैफियत, उत्कल एक्स्प्रेस या तीनही अपघातांत प्रवासी दगावले. आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेस घसरली. यात जीवितहानी झाली नाही.त्यानंतर रेल्वे इतिहासात काळ्या शाईने नोंदवली जाणारी घटना पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात घडली. प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत २३ निष्पापांचा बळी गेला. याचा परिणाम म्हणजे दोन दिवस रेल्वेमंत्र्यांनी बैठका घेतल्या. रेल्वेच्या व्यवस्थेत मोठे बदल करण्याच्या घोषणा झाल्या. त्या घटनेला महिना पूर्ण होण्याच्या आधीच तेजसला चिपळूण येथे ब्रेक लागला. या घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. पण, रेल्वेच्या खाद्यसेवेचे पुरते धिंडवडे उडाले. ती भरपाई कशी करणार, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत