शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

रेल्वेचा ‘तेजो’भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:50 IST

भारतीय रेल्वेमागचे शुक्लकाष्ठ अजून संपलेले दिसत नाही. देशातल्या वेगवान रेल्वेमध्ये अभिमानाने उल्लेख होत असलेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये घडलेली विषबाधेची घटना रेल्वे सेवेची नाचक्की करणारी आहे.

भारतीय रेल्वेमागचे शुक्लकाष्ठ अजून संपलेले दिसत नाही. देशातल्या वेगवान रेल्वेमध्ये अभिमानाने उल्लेख होत असलेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये घडलेली विषबाधेची घटना रेल्वे सेवेची नाचक्की करणारी आहे. रेल्वेची ‘खानपान’ सेवा एकेकाळी दर्जेदार आणि परवडणारी मानली जायची. पण गेल्या १५-२० वर्षांत या सेवेचा दर्जा प्रचंड प्रमाणात घसरला. केवळ पर्याय नसल्याने ही सेवा जिवंत राहिली. त्याची गांभीर्याने दखल घेत रेल्वे मंडळाने सुधारणा करण्याच्या घोषणाही केल्या. पण तेजसमधील विषबाधेच्या घटनेने रेल्वेची ही सेवाही काळवंडली. ‘तेजस’मधील आॅम्लेट आणि सूप प्यायल्यानंतर अनेकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. जवळपास २४ जणांना बाधा झाली. त्यातील तिघांची प्रकृती तर अत्यवस्थ झाली होती. या घटनेमुळे रेल्वेमधील खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी पुन्हा एकदा चर्चा चव्हाट्यावर आली आहे. ‘पॅन्ट्री कार’मधील अस्वच्छता, पुरेसे प्रशिक्षण नसलेले कर्मचारी, खानपानाचे कंत्राट एकदा मिळाल्यानंतर दर्जाकडे ढुंकूनही न पाहणारे मिजासखोर कंत्राटदार आणि त्यांना पाठीशी घालणारे रेल्वे अधिकारी या सर्वांची तपशिलाने चौकशी व्हायला हवी. ‘तेजस’मधील घटनेनंतर वरिष्ठ अधिकाºयांनी सर्वच रेल्वेमधील खाद्य पदार्थांची चाळणी पद्धतीने तपासणी करायला हवी. ज्या कंत्राटदारांकडून खाण्याचा दर्जा राखला गेलेला नाही त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकायला हवे. कारण हा थेट प्रवाशांच्या जिवाशी खेळ आहे. रेल्वेने गेल्या अर्थसंकल्पात चार नवीन एक्स्प्रेसची घोषणा केली. हमसफर, अंत्योदय, उदय आणि तेजस एक्स्प्रेस. तेजस एक्स्प्रेसला भारतीय रेल्वेचा वेगवान चेहरा म्हणून देशासमोर सादर करण्यात आले. परंतु विषबाधेच्या घटनेने ही प्रतिमा धुळीस मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे चर्चेत आहे. सप्टेंबर महिन्यातील तीन रेल्वे अपघात असोत; दुरांतो एक्स्प्रेस, एल्फिन्स्टन दुर्घटना असो वा तेजसमधील विषबाधा. खरेतर, यामुळे भारतीय रेल्वेच्या तेजाला ग्रहण लागले आहे. सप्टेंबरमध्ये तीन रेल्वे अपघात घडले. शक्तिकुंज, कैफियत, उत्कल एक्स्प्रेस या तीनही अपघातांत प्रवासी दगावले. आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेस घसरली. यात जीवितहानी झाली नाही.त्यानंतर रेल्वे इतिहासात काळ्या शाईने नोंदवली जाणारी घटना पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात घडली. प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत २३ निष्पापांचा बळी गेला. याचा परिणाम म्हणजे दोन दिवस रेल्वेमंत्र्यांनी बैठका घेतल्या. रेल्वेच्या व्यवस्थेत मोठे बदल करण्याच्या घोषणा झाल्या. त्या घटनेला महिना पूर्ण होण्याच्या आधीच तेजसला चिपळूण येथे ब्रेक लागला. या घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. पण, रेल्वेच्या खाद्यसेवेचे पुरते धिंडवडे उडाले. ती भरपाई कशी करणार, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत