शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

भाकरी, भोग आणि रोटी बँक

By admin | Updated: December 22, 2015 23:35 IST

खिशात दमडी नसेल तरी चालेल, पत असायला हवी. मग, घरात अन्नाचा दाणा नसला तरी चारचाकी घेऊ शकता तुम्ही. यासाठी अनेक योजना घेऊन बँका तुमच्या

खिशात दमडी नसेल तरी चालेल, पत असायला हवी. मग, घरात अन्नाचा दाणा नसला तरी चारचाकी घेऊ शकता तुम्ही. यासाठी अनेक योजना घेऊन बँका तुमच्या घराशी लोळण घेऊ शकतात. साधी शिपायाची नोकरी तुम्हाला चांगली पत मिळवून देऊ शकते. शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र हे सुख नाही. हजार-दोन हजारांच्या कर्जासाठी सात-बारा जमा करुनही कर्जासाठी उंबरठे झिजवावे लागतात त्या बिचाऱ्याला. बँकांना सात-बारा नव्हे तर पे-स्लीप लागते. शेतकऱ्यांनी ती आणायची कोठून?सलग चार वर्षांपासून दुष्काळ मराठवाड्याची पाठ सोडत नाही. दरवर्षी खाण्यापुरती ज्वारी तरी निघायची. यंदा तीही नाही. अनेक शेतकऱ्यांना हायब्रिड विकत घेऊन पोट भरावे लागेल. ते विकत कसे घ्यायचे, त्यासाठी पैसा कोठून आणायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण, पोट भरण्यासाठी म्हणजे भाकरीसाठी कुठलीही बँक कर्ज देत नाही. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना तर दारातही उभे केले जात नाही. शेतकऱ्यांचा हा भाकरीसाठीचा भोग आठवण्याला एक निमित्त आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबादेत ‘रोटी बँके’ची स्थापना झाली. कुठलीही पत न पाहता ही बँक तुम्हाला भाजी-भाकरी देते. हारुण मुकाती इस्लामिक सेंटरचे संस्थापक युसूफ मुकाती यांनी ही बँक सुरू केली आहे. गेल्या वर्षभरापासून ते या सेंटरमार्फत महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण देतात. संगणकापासून ते मेहंदीपर्यंतचे विनामूल्य प्रशिक्षण येथे दिले जाते. सर्व जाती-धर्मातील जवळपास दहा हजार महिलांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभे केले आहे. स्मार्ट सिटीच्या वाटेवर असलेल्या औरंगाबाद शहरात अनेक लोकांच्या नशिबी दोन वेळची भाकरीही नाही. भिकारी भीक मागून पोट भरतील. मध्यमवर्गीयांना तीही मागता येत नाही. दोन वेळच्या भाकरीसाठीचा हा भोग युसूफभार्इंना स्वस्थ बसू देत नव्हता. उत्तर प्रदेशातल्या कुठल्या तरी शहरात ‘रोटी बँके’ची बातमी त्यांनी एका वृत्तवाहिनीवर पाहिली आणि भुकेल्या औरंगाबादकरांची पोट भरण्याची सोय झाली. शहरात एकीकडे रिकाम्या पोटी झोपणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी शिल्लक अन्न वाया घालविणाऱ्यांची संख्याही कमी नाही. शिल्लक राहिलेले हे चांगले अन्न त्यांनी एका पाकिटात घालून या बँकेत आणून जमा करावे, असे आवाहन युसूफभार्इंनी केले. पाहाता-पाहाता २५० अन्नदात्यांनी नोंदणी केली. सध्या औरंगाबादेत सकाळ-संध्याकाळ अशी २५० पाकिटे दररोज जमा होतात. बँकेतील एका फ्रिजरमध्ये हे अन्न ठेवले जाते. एकावेळी ७५० पाकिटे बसतील, एवढे मोठे फ्रिज बनवून घेण्यात आले आहे. चांगलेच अन्न घेण्याची आणि देण्याची काळजी या बँकेत घेतली जाते. सकाळी ११ ते रात्री ८.३० पर्यंत ही बँक सुरू राहते. यासाठी एक कर्मचारीही नेमला आहे. रात्री आठनंतर बँकेत एकही पाकिट शिल्लक राहत नाही. त्यानंतरही रिकामे पोट घेऊन येणारे अनेक असतात. पण त्यासाठी पाकिट राहात नाही. श्रीमंत माणसाला दोन भाकरी आणि भाजीचे पाकिट जड नाही. पण ते देण्याची श्रीमंती असावी लागते. सध्या औरंगाबादेत अशी श्रीमंती केवळ २५० जणांकडेच दिसते. महिनाभरात अन्नदात्यांची ही संख्या सातशेवर जाईल, असा दावा युसूफभाई करतात. दररोज ही अडीचशे पाकिटे घेऊन जाणारे कोण? यातले केवळ २० टक्के भिकारी असतात. म्हणजे उर्वरित ८० टक्के लोक ही बँक सुरू होण्याआधी दररोज उपाशीपोटी झोपत असणार. कारण त्यांना आपला समाज भीकही मागू देत नाही. औरंगाबादेत सोय झाली. राज्यातील इतर शहरांचे काय? खेडेगावात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? महासत्ता, स्मार्ट सिटी, विदेशी गुंतवणूक असे मोठमोठे शब्द वापरुन आम्ही भले विकासाची हवा निर्माण करत असू. मात्र, आमची खरी लढाई आहे ती पोट भरण्याची. ही लढाई लढण्यासाठी प्रत्येक शहरात अशी बँक सुरू व्हायला हवी. ती जबाबदारी कोणाची? अर्थात, दोनवेळा पोटभर जेवण करुन ढेकर देणाऱ्या प्रत्येकाची. - गजानन दिवाण