शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बाटलीतील राक्षस

By admin | Updated: June 24, 2016 01:03 IST

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी नावाचे थोर थोर गृहस्थ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अघोषित प्रवक्ते असल्याची जी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे तिच्यात अणुमात्रही अतिशयोक्ती नाही.

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी नावाचे थोर थोर गृहस्थ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अघोषित प्रवक्ते असल्याची जी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे तिच्यात अणुमात्रही अतिशयोक्ती नाही. खरे तर स्वामी यांना बाटलीतील राक्षसाची उपमा देणे अधिक सयुक्तिक ठरेल. या राक्षसाने म्हणे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा घास घेतला आहे आणि आपणच तो घेतला असे सांगत सध्या ते ‘जितं मया’ अशा आरोळ्या ठोकत आहेत. आता म्हणे त्यांना घास घ्यायचा आहे तो केन्द्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा. तो घेऊन झाला की केन्द्राच्या सेवेतील सत्तावीस अधिकाऱ्यांची एक ‘हिट लिस्ट’ त्यांच्या खिशात तयार आहे. अरविंद सुब्रह्मण्यम अनिवासी भारतीय आहेत आणि अमेरिकेचे नागरिक आहेत. पण ते केवळ त्या देशाचे नागरिक आहेत इतकेच नव्हे तर अमेरिकेचे एजंट आहेत आणि भारताच्या हिताच्या विरुद्ध जाणारे आहेत असा स्वामींचा त्यांच्यावर आरोप आहे. एक बाब निश्चित की, अरविंद सुब्रह्मण्यम गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांचे कठोर टीकाकार होते. तरीही मोदी सरकारनेच त्यांना आपला आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यावरुन तेव्हां मोदींनी स्वामींचा सल्ला घेतला नसावा असे दिसते. रघुराम राजन यांचे तसे नव्हे. त्यांची नियुक्ती संपुआच्या द्वितीय सत्ताकाळात झाली असली तरी सत्तांतरानंतर नव्या सरकारने त्यांची कारकीर्द सुरु ठेवली होती. पण तितकेच नव्हे तर मोदींनी प्रारंभीच्या काळात राजन यांची जाहीर प्रशंसादेखील केली होती. दरम्यान अत्यंत उटपटांग अशी वैश्विक ख्याती प्राप्त केलेल्या स्वामींना पंतप्रधानांनी राज्यसभेत आणून बसवले. आणि लगेचच रघुराम राजन मनाने पूर्ण भारतीय नसल्याचा व त्यांच्या असण्याने देशाला आर्थिक अवकळा येत चालल्याचा शोध स्वामी यांना लागला. ज्या सरकारचा ‘स्वामी’च इतका अगोचर आहे, त्या सरकारबरोबरचे संबंध पुढे चालू ठेवण्यापेक्षा अध्ययन आणि अध्यापन या मूळ आवडीच्या क्षेत्राकडे वळलेले बरे असा विचार राजन यांनी केला तेव्हां स्वामी यांना त्यात स्वत:चा विजय दिसला. त्यानंतर तर स्वामींना जणू चेवच आला आहे. परिणामी त्यांना याचसाठी मोदींनी खासदार केले असे म्हणणे अतार्किक ठरु नये. स्वामी राजन यांच्या दिशेने चिखलाचे गोळे फेकत होते, तेव्हां त्यांना कुणीही गप्प केले नाही पण अरविंद सुब्रह्मण्यम यांच्यावर त्यांनी दात धरताच अर्थमंत्री अरुण जेटली आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वामींचे मत व्यक्तिगत मत असल्याचे म्हटले आहे. पण या दोहोंच्या प्रतिक्रियांना अर्थ नाही कारण खुद्द जेटलीदेखील स्वामींच्या हिट लिस्टवरच आहेत. अशा स्थितीत स्वामींना केवळ मोदीच गप्प करु शकतात पण अडवाणी-मुरलीमनोहर यांचे निर्माल्य करणारे मोदी स्वामींकडे कक्ष देत नाहीत यातच सर्व काही येते. पण एक बाब मोदीही विसरतात आणि ती म्हणजे बाटलीतल्या राक्षसाला जो बाहेर काढतो त्यालाच तो राक्षस एक ना एक दिवस गिळंकृत करायला मागेपुढे बघत नसतो.