शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीतील राक्षस

By admin | Updated: June 24, 2016 01:03 IST

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी नावाचे थोर थोर गृहस्थ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अघोषित प्रवक्ते असल्याची जी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे तिच्यात अणुमात्रही अतिशयोक्ती नाही.

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी नावाचे थोर थोर गृहस्थ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अघोषित प्रवक्ते असल्याची जी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे तिच्यात अणुमात्रही अतिशयोक्ती नाही. खरे तर स्वामी यांना बाटलीतील राक्षसाची उपमा देणे अधिक सयुक्तिक ठरेल. या राक्षसाने म्हणे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा घास घेतला आहे आणि आपणच तो घेतला असे सांगत सध्या ते ‘जितं मया’ अशा आरोळ्या ठोकत आहेत. आता म्हणे त्यांना घास घ्यायचा आहे तो केन्द्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा. तो घेऊन झाला की केन्द्राच्या सेवेतील सत्तावीस अधिकाऱ्यांची एक ‘हिट लिस्ट’ त्यांच्या खिशात तयार आहे. अरविंद सुब्रह्मण्यम अनिवासी भारतीय आहेत आणि अमेरिकेचे नागरिक आहेत. पण ते केवळ त्या देशाचे नागरिक आहेत इतकेच नव्हे तर अमेरिकेचे एजंट आहेत आणि भारताच्या हिताच्या विरुद्ध जाणारे आहेत असा स्वामींचा त्यांच्यावर आरोप आहे. एक बाब निश्चित की, अरविंद सुब्रह्मण्यम गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांचे कठोर टीकाकार होते. तरीही मोदी सरकारनेच त्यांना आपला आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यावरुन तेव्हां मोदींनी स्वामींचा सल्ला घेतला नसावा असे दिसते. रघुराम राजन यांचे तसे नव्हे. त्यांची नियुक्ती संपुआच्या द्वितीय सत्ताकाळात झाली असली तरी सत्तांतरानंतर नव्या सरकारने त्यांची कारकीर्द सुरु ठेवली होती. पण तितकेच नव्हे तर मोदींनी प्रारंभीच्या काळात राजन यांची जाहीर प्रशंसादेखील केली होती. दरम्यान अत्यंत उटपटांग अशी वैश्विक ख्याती प्राप्त केलेल्या स्वामींना पंतप्रधानांनी राज्यसभेत आणून बसवले. आणि लगेचच रघुराम राजन मनाने पूर्ण भारतीय नसल्याचा व त्यांच्या असण्याने देशाला आर्थिक अवकळा येत चालल्याचा शोध स्वामी यांना लागला. ज्या सरकारचा ‘स्वामी’च इतका अगोचर आहे, त्या सरकारबरोबरचे संबंध पुढे चालू ठेवण्यापेक्षा अध्ययन आणि अध्यापन या मूळ आवडीच्या क्षेत्राकडे वळलेले बरे असा विचार राजन यांनी केला तेव्हां स्वामी यांना त्यात स्वत:चा विजय दिसला. त्यानंतर तर स्वामींना जणू चेवच आला आहे. परिणामी त्यांना याचसाठी मोदींनी खासदार केले असे म्हणणे अतार्किक ठरु नये. स्वामी राजन यांच्या दिशेने चिखलाचे गोळे फेकत होते, तेव्हां त्यांना कुणीही गप्प केले नाही पण अरविंद सुब्रह्मण्यम यांच्यावर त्यांनी दात धरताच अर्थमंत्री अरुण जेटली आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वामींचे मत व्यक्तिगत मत असल्याचे म्हटले आहे. पण या दोहोंच्या प्रतिक्रियांना अर्थ नाही कारण खुद्द जेटलीदेखील स्वामींच्या हिट लिस्टवरच आहेत. अशा स्थितीत स्वामींना केवळ मोदीच गप्प करु शकतात पण अडवाणी-मुरलीमनोहर यांचे निर्माल्य करणारे मोदी स्वामींकडे कक्ष देत नाहीत यातच सर्व काही येते. पण एक बाब मोदीही विसरतात आणि ती म्हणजे बाटलीतल्या राक्षसाला जो बाहेर काढतो त्यालाच तो राक्षस एक ना एक दिवस गिळंकृत करायला मागेपुढे बघत नसतो.