शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

बाटलीतील राक्षस

By admin | Updated: June 24, 2016 01:03 IST

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी नावाचे थोर थोर गृहस्थ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अघोषित प्रवक्ते असल्याची जी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे तिच्यात अणुमात्रही अतिशयोक्ती नाही.

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी नावाचे थोर थोर गृहस्थ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अघोषित प्रवक्ते असल्याची जी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे तिच्यात अणुमात्रही अतिशयोक्ती नाही. खरे तर स्वामी यांना बाटलीतील राक्षसाची उपमा देणे अधिक सयुक्तिक ठरेल. या राक्षसाने म्हणे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा घास घेतला आहे आणि आपणच तो घेतला असे सांगत सध्या ते ‘जितं मया’ अशा आरोळ्या ठोकत आहेत. आता म्हणे त्यांना घास घ्यायचा आहे तो केन्द्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा. तो घेऊन झाला की केन्द्राच्या सेवेतील सत्तावीस अधिकाऱ्यांची एक ‘हिट लिस्ट’ त्यांच्या खिशात तयार आहे. अरविंद सुब्रह्मण्यम अनिवासी भारतीय आहेत आणि अमेरिकेचे नागरिक आहेत. पण ते केवळ त्या देशाचे नागरिक आहेत इतकेच नव्हे तर अमेरिकेचे एजंट आहेत आणि भारताच्या हिताच्या विरुद्ध जाणारे आहेत असा स्वामींचा त्यांच्यावर आरोप आहे. एक बाब निश्चित की, अरविंद सुब्रह्मण्यम गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांचे कठोर टीकाकार होते. तरीही मोदी सरकारनेच त्यांना आपला आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यावरुन तेव्हां मोदींनी स्वामींचा सल्ला घेतला नसावा असे दिसते. रघुराम राजन यांचे तसे नव्हे. त्यांची नियुक्ती संपुआच्या द्वितीय सत्ताकाळात झाली असली तरी सत्तांतरानंतर नव्या सरकारने त्यांची कारकीर्द सुरु ठेवली होती. पण तितकेच नव्हे तर मोदींनी प्रारंभीच्या काळात राजन यांची जाहीर प्रशंसादेखील केली होती. दरम्यान अत्यंत उटपटांग अशी वैश्विक ख्याती प्राप्त केलेल्या स्वामींना पंतप्रधानांनी राज्यसभेत आणून बसवले. आणि लगेचच रघुराम राजन मनाने पूर्ण भारतीय नसल्याचा व त्यांच्या असण्याने देशाला आर्थिक अवकळा येत चालल्याचा शोध स्वामी यांना लागला. ज्या सरकारचा ‘स्वामी’च इतका अगोचर आहे, त्या सरकारबरोबरचे संबंध पुढे चालू ठेवण्यापेक्षा अध्ययन आणि अध्यापन या मूळ आवडीच्या क्षेत्राकडे वळलेले बरे असा विचार राजन यांनी केला तेव्हां स्वामी यांना त्यात स्वत:चा विजय दिसला. त्यानंतर तर स्वामींना जणू चेवच आला आहे. परिणामी त्यांना याचसाठी मोदींनी खासदार केले असे म्हणणे अतार्किक ठरु नये. स्वामी राजन यांच्या दिशेने चिखलाचे गोळे फेकत होते, तेव्हां त्यांना कुणीही गप्प केले नाही पण अरविंद सुब्रह्मण्यम यांच्यावर त्यांनी दात धरताच अर्थमंत्री अरुण जेटली आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वामींचे मत व्यक्तिगत मत असल्याचे म्हटले आहे. पण या दोहोंच्या प्रतिक्रियांना अर्थ नाही कारण खुद्द जेटलीदेखील स्वामींच्या हिट लिस्टवरच आहेत. अशा स्थितीत स्वामींना केवळ मोदीच गप्प करु शकतात पण अडवाणी-मुरलीमनोहर यांचे निर्माल्य करणारे मोदी स्वामींकडे कक्ष देत नाहीत यातच सर्व काही येते. पण एक बाब मोदीही विसरतात आणि ती म्हणजे बाटलीतल्या राक्षसाला जो बाहेर काढतो त्यालाच तो राक्षस एक ना एक दिवस गिळंकृत करायला मागेपुढे बघत नसतो.