शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

धाडसी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2016 05:16 IST

घोषणा आणि भूलथापा हे अलीकडच्या काळात घट्ट असे समीकरण बनल्याची अनुभूती येऊ लागली आहे. पूर्वी अर्थात स्वातंत्र्यपूर्वकाळात घोषणा या शब्दाला एक वजन होते. जनतेतून

घोषणा आणि भूलथापा हे अलीकडच्या काळात घट्ट असे समीकरण बनल्याची अनुभूती येऊ लागली आहे. पूर्वी अर्थात स्वातंत्र्यपूर्वकाळात घोषणा या शब्दाला एक वजन होते. जनतेतून त्या घोषणेचे जितके स्वागत केले जायचे तितकेच किंबहुना त्याहून अधिक घोषणाकर्त्याची जबाबदारी वाढलेली असायची. त्यामुळे घोषणा आणि घोषणापूर्ती असे समीकरण त्याकाळी मानले जायचे. आता घोषणापूर्तीची जागा भूलथापांनी घेतली आहे. निवडणूक काळात केवळ मतप्राप्तीसाठी मनाला वाट्टेल त्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करणे हे नेत्यांच्या अंगवळणीच पडले आहे. ज्या लोकांच्या बळावर आपण राजसिंहासनावर विराजमान होतो, त्यांच्या भल्याची, हिताची आणि आरोग्याची काळजी वाहणे हे सरकारचे आद्यकर्तव्यच असते. परंतु याचा विसर पडल्याचाच अनुभव येत असतो. अशा स्थितीत लोकहितासाठी आर्थिक तोटा सहन करावा लागला तरी तो सोसण्याची तयारी दर्शवायला धाडस लागते. ते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दाखविले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सन्मानार्थ बिहारमध्ये १०० टक्के दारूबंदी करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहापासून प्रेरणा घेऊन नितीशकुमार यांनी ‘एक तर मी पदावर राहीन, अन्यथा मद्यविक्री सुरू राहील’ अशी भीष्मप्रतिज्ञा केली आहे. एखादा जनहितार्थ निर्णय घेताना आणि त्यासाठी प्रसंगी पद त्यागण्याची तयारी ठेवायला जे धाडस लागते, ते यातून दिसून आले आहे. महाराष्ट्र सरकार मात्र अशाप्रकारचा निर्णय घेण्याचे धाडस करू शकलेले नाही. त्यामुळे पद त्यागण्याची भाषा तर फार लांबची गोष्ट. महाराष्ट्र सरकारचा जीव महसुलात अडकतो. त्या महसुलापायी लाखो कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली तरी चालेल; पण महसूल बुडता कामा नये. दारूनिर्मितीच्या कारखान्यांना परवानेही सरकारनेच द्यायचे आणि त्यावर कडी म्हणून राज्यात दारूबंदी होण्यासाठी विभाग कार्यान्वित करायचा तोही सरकारनेच, किती हास्यास्पद बाब आहे ही ! दारूची निर्मितीच झाली नाही तर बंदीसाठी एक विभाग खर्ची घालण्याची वेळच येणार नाही. त्यासाठी हवे नितीशकुमार यांच्यासारखा निर्णय घेण्याचे धाडस !