शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

धाडसी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2016 05:16 IST

घोषणा आणि भूलथापा हे अलीकडच्या काळात घट्ट असे समीकरण बनल्याची अनुभूती येऊ लागली आहे. पूर्वी अर्थात स्वातंत्र्यपूर्वकाळात घोषणा या शब्दाला एक वजन होते. जनतेतून

घोषणा आणि भूलथापा हे अलीकडच्या काळात घट्ट असे समीकरण बनल्याची अनुभूती येऊ लागली आहे. पूर्वी अर्थात स्वातंत्र्यपूर्वकाळात घोषणा या शब्दाला एक वजन होते. जनतेतून त्या घोषणेचे जितके स्वागत केले जायचे तितकेच किंबहुना त्याहून अधिक घोषणाकर्त्याची जबाबदारी वाढलेली असायची. त्यामुळे घोषणा आणि घोषणापूर्ती असे समीकरण त्याकाळी मानले जायचे. आता घोषणापूर्तीची जागा भूलथापांनी घेतली आहे. निवडणूक काळात केवळ मतप्राप्तीसाठी मनाला वाट्टेल त्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करणे हे नेत्यांच्या अंगवळणीच पडले आहे. ज्या लोकांच्या बळावर आपण राजसिंहासनावर विराजमान होतो, त्यांच्या भल्याची, हिताची आणि आरोग्याची काळजी वाहणे हे सरकारचे आद्यकर्तव्यच असते. परंतु याचा विसर पडल्याचाच अनुभव येत असतो. अशा स्थितीत लोकहितासाठी आर्थिक तोटा सहन करावा लागला तरी तो सोसण्याची तयारी दर्शवायला धाडस लागते. ते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दाखविले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सन्मानार्थ बिहारमध्ये १०० टक्के दारूबंदी करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहापासून प्रेरणा घेऊन नितीशकुमार यांनी ‘एक तर मी पदावर राहीन, अन्यथा मद्यविक्री सुरू राहील’ अशी भीष्मप्रतिज्ञा केली आहे. एखादा जनहितार्थ निर्णय घेताना आणि त्यासाठी प्रसंगी पद त्यागण्याची तयारी ठेवायला जे धाडस लागते, ते यातून दिसून आले आहे. महाराष्ट्र सरकार मात्र अशाप्रकारचा निर्णय घेण्याचे धाडस करू शकलेले नाही. त्यामुळे पद त्यागण्याची भाषा तर फार लांबची गोष्ट. महाराष्ट्र सरकारचा जीव महसुलात अडकतो. त्या महसुलापायी लाखो कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली तरी चालेल; पण महसूल बुडता कामा नये. दारूनिर्मितीच्या कारखान्यांना परवानेही सरकारनेच द्यायचे आणि त्यावर कडी म्हणून राज्यात दारूबंदी होण्यासाठी विभाग कार्यान्वित करायचा तोही सरकारनेच, किती हास्यास्पद बाब आहे ही ! दारूची निर्मितीच झाली नाही तर बंदीसाठी एक विभाग खर्ची घालण्याची वेळच येणार नाही. त्यासाठी हवे नितीशकुमार यांच्यासारखा निर्णय घेण्याचे धाडस !