शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ह्यबँग बँगह्ण!

By admin | Updated: October 20, 2014 01:02 IST

काँग्रेस व राष्ट्रवादीने ११ लक्ष कोटी रुपयांचे घोटाळे केले असून, त्यांना कायमचे गाडा, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे आवाहन होते.

हेमंत देसाई( जेष्ठ पत्रकार) - काँग्रेस व राष्ट्रवादीने ११ लक्ष कोटी रुपयांचे घोटाळे केले असून, त्यांना कायमचे गाडा, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे आवाहन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीत जाऊन पवारशाहीवर शरसंधान साधले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रथम स्थानावर येईल, हा अंदाज होताच. महायुतीत असतानाही शहा यांनी पूर्ण बहुमताने भाजपाला निवडून देण्याची हाक दिली होती. मात्र, शतप्रतिशत भाजपा हे महाराष्ट्राला मान्य नसल्याचे दिसते. याचे कारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सत्यशोधक चळवळ व नंतरची ब्राह्मणेतर चळवळ यामुळे महाराष्ट्रात मध्यम व कनिष्ठ जाती सत्तेच्या परिघात उतरू लागल्या होत्या. पुढे हीच गोष्ट लोकशाही चौकटीत बसवून आपली सामाजिक मुळे पक्की करण्याचे कसब काँग्रेसने बेरजेच्या राजकारणातून दाखवले. त्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून काँग्रेस ग्रामीण महाराष्ट्रात पोहोचली, तर समाजवादी पक्ष व जनसंघ शहरांतच होते. राज्यातील जनाधार असलेल्या नेत्यांना लगाम घालून आपल्या प्याद्यांना पुढं आणायचे, या इंदिराजींच्या तंत्रामुळे १९७0च्या दशकाच्या उत्तराधार्पासून काँग्रेस विस्कटू लागली. १९९९ मध्ये राष्ट्रवादीचा जन्म झाला, तेव्हा दलित, आदिवासी, मुसलमान, कनिष्ठ जाती काँग्रेसकडे व मुख्यत: मराठा आणि काही प्रमाणात ओबीसी राष्ट्रवादीकडे, असे चित्र तयार झाले. आघाडी सरकारचा कारभार दिवाळखोरीचा असूनही, विरोधी पक्षांच्या नाकर्तेपणामुळे तो चालू राहिला. युती भंगली, त्यामुळे भाजपाला आपण शिवसेनेपेक्षा श्रेष्ठ असल्याचे दाखवून देता आले. मात्र तरीही, भाजपाला महाराष्ट्रातला काँग्रेसी पाया उखडून टाकता आलेला नाही, हे सर्वात महत्त्वाचे. मोदी यांचा करिश्मा व भाजपाचे आर्य चाणक्य अमित शहा यांची व्यूहरचना नसती, तर भाजपाच्या प्रदेश नेत्यांना ही निवडणूक जिंकता आली नसती. याचे कारण उत्तमराव पाटील व गोपीनाथ मुंडेंसारखे नेते आज पक्षात नाहीत. माध्यमांच्या बळावर सध्या जिल्हा नेते प्रादेशिक नेते म्हणून गाजत आहेत. शिवाय ज्या पक्षाचे सरकार केंद्रात असते, त्याचेच सरकार राज्यात असावे, या जनभावनेचा भाजपाला लाभ झाला.उद्धव ठाकरेंच्या मागे आज बाळासाहेब ठाकरे नाहीत. पक्ष प्रादेशिक असल्यामुळे त्यांच्यामागे कोणी राष्ट्रीय करिश्मा असलेले नेते नाहीत. तरीसुद्धा त्यांनी हिमतीने यश मिळवले. मात्र, सेनेने जो गुजराती विरुद्ध मराठीचा संघर्ष उभा केला, तो सेनेच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यास उपयुक्त ठरला असला, तरी अव्वल स्थान मिळवण्याइतका तो मुद्दा महत्त्वाचा नव्हता. शिवाय, तो राज्यव्यापी मुद्दा ठरू शकत नव्हता. राज्याचे ५0 टक्के नागरीकरण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूक, कारखाने, रोजगार, एलबीटी, वाहतूक, पर्यटन, स्त्रीसुरक्षा हे प्रश्न भाजपाने रास्तपणे अजेंड्यावर घेतले. त्यामुळे शहरी मध्यमवर्ग, स्त्रिया, तरुणांनी भाजपाला डोक्यावर घेतले. ह्यमी अखंड आशावादीह्ण असे म्हणत राष्ट्रवादीने प्रगतीचे ढोल पिटले, परंतु लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. काँग्रेसने स्वच्छ व पारदर्शक प्रशासनाची जाहिरात करताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रकाशझोतात ठेवले. पण मुख्यमंत्री स्वच्छ, मात्र त्यांच्या शेजारचे, म्हणजे राष्ट्रवादीचे घर अस्वच्छ हे जनतेला दिसत होते. सर्व माजी मुख्यमंत्री बाबांच्या विरोधात. लोकशाही आघाडीत परस्परविरोध इतका होता की, खरे तर वेगळ्या विरोधी पक्षाची गरजच नव्हती! एवढे असूनही, ग्रामीण महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकांच्या इतके विधानसभेत आघाडीला लाथाडलेले नाही. राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला नसता व बाबांनी स्वच्छतेबरोबरच सर्वांना बरोबर घेऊन धडाक्यात निर्णय घेतले असते, तर?... या निवडणुकीत उद्धवला तुच्छ लेखणारे नारायण राणेंचे व राज ठाकरे यांच्या मनसेचे पानिपत झाले. ब्लू प्रिंटवाल्यांचा चेहरा पांढरा फटफटीत झाला. स्वत:ची रेघ मोठी करण्याचा प्रयत्न करण्याचा मार्ग माहीत नसलेल्यांना लोकांनी ताळ्यावर आणले. उलट एमआयएमला पहिल्या फटक्यात जे यश मिळाले, ते काँग्रेसने मुस्लिमांची निराशा केल्यामुळे.निकाल लागताच पवारांनी भाजपाला पाठिंबा देऊन टाकला. देशाला हिंदू धर्मांधतेपासून धोका आहे, प्रज्ञासिंह ठाकूर प्रभृतींना वाढवण्याच्या शक्तीपासून सावध राहा, असे पवार म्हणत होते. आता ते म्हणतात, ह्यराज्याला स्थिर सरकार हवे आहेह्ण. पण भाजपाचे सरकार स्थिर झाल्यास धर्मांधतेची विषवल्ली वाढणार नाही का?