शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची काँग्रेस होईलच कशी?

By admin | Updated: March 22, 2017 23:38 IST

उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची नेमणूक झाल्यानं राजकीय चर्चाविश्वात झंझावात उठला आहे.

उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची नेमणूक झाल्यानं राजकीय चर्चाविश्वात झंझावात उठला आहे. उलट-सुलट युक्तिवादाच्या गदारोळात काही तथ्य समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार नव्हते. गोरखपूर मतदारसंघातून २०१४ साली पाचव्यांदा भाजपाचे खासदार म्हणून ते निवडून आले आहेत. भाजपाला विधानसभा निवडणुकीत ३२५ जागा मिळाल्या. मात्र त्यापैकी एकाही आमदाराला मुख्यमंत्री न बनवता आदित्यनाथ यांना या पदावर बसविण्यात आलं आहे.दुसरं तथ्य म्हणजे गोवा व मणिपूर येथे सर्वात मोठा पक्ष नसूनही सौदेबाजीचं राजकारण करून सत्ता ताबडतोब आपल्या पदरात पडावी, यासाठी भाजपाने मोठी धावपळ केली. पण उत्तर प्रदेशात अभूतपूर्व यशानंतरही मुख्यमंत्रिपदी कोण येणार, हे ठरविण्यास आठवडा जावा लागला. आता उपमुख्यमंत्री झालेले केशव मौर्य हे इतर मागासवर्गीयांतील आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. दुसरे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा हे ब्राह्मण आहेत. खुद्द आदित्यनाथ हे रजपूत आहेत. भाजपाला ‘हिंदू’ मतांचं एकत्रीकरण करण्यात मौर्य यांचा मोठा वाटा होता. त्यामुळं मुख्यमंत्रिपदाची माळ आपल्याच गळ्यात पडेल, अशी खात्री मौर्य यांना वाटत होती. ही घडण्याची शक्यता नाही, असं दिसू लागताच, मौर्य यांचे समर्थक तेच मुख्यमंत्री बनणार, असं सांगताना दिसू लागले. त्याला उत्तर म्हणून योगी आदित्यनाथ यांचे समर्थकही स्पर्धेत उतरले. हे वादळ शमवण्यासाठी मोदी-शहा या दुकलीला काही दिवस घालवावे लागलेले दिसतात. त्यातूनच दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा निर्णय घेऊन आणि ‘एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या साथीला किमान दोन उपमुख्यमंत्री तरी हवेतच’, असा युक्तिवादही केला जात आहे. तथ्य असं आहे की, राजकीय समीकरणं जुळवताना केलेली ही सोईची प्रशासकीय संरचना आहे... कारण मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांना नेमायचं, हे ठरविण्यात आलेलंच होतं. फक्त ही सत्तेची समीकरणं जुळवण्यात वेळ गेला एवढंच. तिकडं गोव्यात व मणिपूरमध्ये ‘पैशाच्या थैल्या ओता, पदांची खैरात करा आणि पाठबळ मिळवा’, असा सरळ सौदा होता. सत्तेची समीकरणं जुळवताना जातीच्या पलीकडं जाऊन ‘हिंदू’ ही ओळख घट्टपणं आकाराला आणण्याच्या प्रयत्नाला अडथळा येईल, अशी कोणतीही जोखीम पत्करायची मोदी-शहा यांची तयारी नव्हती. तिसरं तथ्यं आहे, ते स्वत:ला योगी म्हणवणारे आदित्यनाथ हे ज्या गोरखपूर मठाचे ‘महंत’ आहेत, त्याच्या परंपरेचं. आदित्यनाथ हे दिग्विजय नाथ यांची परंपरा चालवत आले आहेत. हे दिग्विजयनाथ १९२१ साली काँगे्रसमध्ये होते. चौरी चौरा येथील आंदोलनात त्यांना अटकही झाली होती. (पुढे हे दिग्विजयनाथ १९६७ साली हिंदू महासभेच्या तिकिटावर निवडून आल्यावर संसद सदस्यांची माहिती असलेल्या १९६७च्या पुस्तिकेत हा उल्लेख आहे). हे दिग्विजयनाथ १९३४ मध्ये मठाचे महंत झाले. नंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. दिग्विजयनाथ यांच्या मृत्यूनंतर १९६९ साली अद्वैतनाथ हे महंत झाले. त्यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून १९९१ व १९९६ची निवडणूक लढवली. आदित्यनाथ हे या दोन्ही पूर्वसुरींची परंपरा चालवत आले आहेत. लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीत व नंतर झालेल्या पोटनिवडणुकांत आदित्यनाथ यांनी ‘लव्ह जिहाद’वरून रण माजवलं होतं. प्रत्येक धर्मांतरित हिंंदूच्या बदल्यात १०० मुस्लीम स्त्रियांचं धर्मांतर घडवून आणण्याचं जाहीर आवाहन त्यांनी केलं होतं.असे हे आदित्यनाथ उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री बनल्यावर राज्यघटनेच्या चौकटीत ‘सबका साथ, सबका विकास’ करणार असल्याची ग्वाही देत आहेत. जरा मागं वळून २००२ ते २०१३-१४ या काळातील मोदी यांची विधानं बघितली, तर असंच काहीसं आढळून येत नाही काय? तरीही हेच मोदी संसदेच्या इमारतीच्या पायरीवर डोकं ठेवून ‘राज्यघटना हाच माझा धर्म’ असं म्हणाले होतेच की! तथ्यं हेच आहे की, कडवं हिंदुत्व हा मोदी यांचा खरा चेहरा आहे. त्यांनी इंदिरा गांधी यांची एकाधिकारशाहीची शैली उचलली आहे इतकंच. पण मोदी म्हणजे इंदिरा गांधी नव्हे ते आणि भाजपा आता काँगे्रस बनत आहे, असं समजणं हा एक तर भाबडेपणा आहे किंवा निव्वळ मतलबी संधिसाधूपणा आहे. काँगे्रस ही सत्ता मिळविण्यासाठी व ती टिकविण्याकरिता जमातवादी राजकारण करीत आली आहे. उलट ‘जमातवाद’ हा भाजपाचा स्थायिभावच आहे व राहणारही आहे. राहिला प्रश्न मतदारांचा. त्यांनी भाजपाला मतं दिली-२०१४ साली आणि आता उत्तर प्रदेशातही. पण याच मतदारांनी इंदिरा गांधी यांना १९७१ साली डोक्यावर घेतलं होतं, १९७७ साली बाजूला फेकलं होतं आणि १९८०ला पुन्हा निवडलं होतंच ना ! तेव्हा संख्याबळ हा लोकशाहीतील एकमेव निकष असू शकत नाही. लोकशाही मूल्यं मानणं आणि ती प्रत्यक्षात आचरणात आणणं, हे महत्त्वाचं असतं. तसं संघाची राजकीय आघाडी असलेलं भाजपाचा राजकीय ‘डीएनए’च नाही. तेव्हा भाजपाची काँगे्रस होईलच कशी? त्यामुळं आदित्यनाथ यांची निवड मोदी करणार, यात नवल ते काय !-प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)