शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला दिल्लीच्या तख्तावर बसायची घाई

By admin | Updated: September 6, 2014 11:04 IST

दिल्लीत भारतीय जनता पक्ष सरकार बनवणार असल्याची कुजबूज कानावर येत आहे. ही कुजबूज खरी असेल तर त्याचे अनेक अर्थ निघतात.

-लोकमित्र,  राजकीय अभ्यासक
 
दिल्लीत भारतीय जनता पक्ष सरकार बनवणार असल्याची  कुजबूज कानावर येत आहे. ही कुजबूज खरी असेल तर  त्याचे अनेक अर्थ निघतात. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेच्या एकूण ७0 जागांपैकी ३१ जागा  भाजपाला मिळाल्या होत्या. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजपा पुढे आला होता. पण सरकार स्थापण्यास तेवढय़ा जागा पुरेशा नव्हत्या. चार आमदार कमी पडत होते. तेवढे आमदार भाजपाला जमवता आले नाहीत. त्यामुळे  भाजपाचे सरकार बनू शकले नाही. पण राजकीय क्षितिजावर प्रथमच  आलेल्या आम आदमी पार्टीने सरकार 
बनवून सार्‍यांना धक्का दिला. आम आदमी पार्टीला भाजपापेक्षा कमी म्हणजे २८ जागा मिळाल्या 
होत्या. काँग्रेसच्या बिनशर्त पाठिंब्यावर आम आदमीचे सरकार उभे झाले.  दिल्लीत सरकार स्थापून आम्ही काँग्रेसवर कृपा केली असाच आव सुरुवातीपासून आम आदमी पार्टीने आणला होता. सरकार बनवणे ही आमची नव्हे तर काँग्रेसची लाचारी आहे असे संकेत आम आदमी पार्टीवाले सुरुवातीपासून देत होते. पण हे सरकार फार  काळ चालले नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना चमकवले आणि वैतागही आणला. केजरीवाल यांनी राजीनामा दिला तेव्हा   भाजपाने सरकार स्थापावे असे लोकांना वाटणे स्वाभाविक होते. भाजपाने बरीच खटपटही केली. पण आम आदमी पार्टी फोडणे त्यांना जमले नाही. आम आदमीत फूट पडली असती तर भाजपाला सरकार बनवणे सोपे गेले असते.  काँग्रेसने  भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नव्हता. त्याचा परिणाम असा झाला, की भाजपा सरकार बनवू शकला नाही.  दिल्लीसोबतच चार राज्यांत झालेल्या  निवडणुकीपैकी तीन राज्यांत भाजपाने प्रचंड विजय मिळवला होता. या पार्श्‍वभूमीवरही आमदारांची फोडाफोड केली तर पक्षाची मतदारांमध्ये प्रतिमा बिघडेल असे वाटून भाजपाने गप्प राहणे पसंत केले.  काही महिन्यांनंतर  सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या होत्या. आपण सत्तेच्या मागे नाही हे दाखवणे भाजपाला आवश्यक होते.  दिल्लीत सरकार बनवले असते तर भाजपावर नक्कीच टीका झाली असती.  भाजपाने राजमोह टाळला. त्याचा भाजपाला मोठा फायदाही झाला. सिद्धांतावर चालणारा पक्ष म्हणून  दिल्लीकर भाजपाकडे पाहायला लागले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला याचा प्रचंड फायदा झाला. इतिहासात कधी मिळाले नव्हते एवढे बहुमत मिळाले आणि देशात भाजपाचे सरकार आले. मोदी सरकारला १00 दिवस पूर्ण झाले आहेत. सामान्य माणसात उत्साह आहे.  अशा हवेत दिल्लीत सरकार बनवले तर  लोकांना ते खटकणार नाही असे भाजपाला वाटते.  त्यामुळेच त्याने सरकार बनवण्याची धडपड नव्याने सुरू केली आहे. परिस्थिती बदललेली नाही. आधीच्या परिस्थितीत भाजपाची हिंमत होत नव्हती. आज  मात्र भाजपाचा दृष्टिकोन बदलला आहे.  
पूर्वी भाजपाकडे ३१ आमदार होते, आता २८ उरले आहेत. कारण तिघे खासदार बनले आहेत. त्यामुळे पूर्वीची रड आजही कायम आहे. सरकार बनवायला अजूनही संख्याबळ कमी पडते. त्यासाठी भाजपाला आणखी चार आमदार आणावे लागतील. आम आदमी पार्टीत फूट पडेल तरच हे शक्य आहे. आम आदमीचे रॉजर बिन्नी सुरुवातीपासून भाजपाच्या छावणीत आहेत. पार्टीने मागेच त्यांना काढून टाकले आहे. रामबिर शौकिन हे अपक्ष आमदारदेखील भाजपाकडे गेले आहेत. तरीही आम आदमी किंवा काँग्रेसमधून चार आमदार फुटेपर्यंत भाजपा सरकार स्थापन करू शकत नाही. मग कसे व्हायचे? या कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय? 
आतापर्यंतच्या परंपरा तोडफोडीच्या आहेत.  तोडफोड करून लोकांनी सरकारं बनवली आहेत.  भाजपाला तसे वागायचे असेल तर प्रश्न येतो कुठे?  आदर्श गुंडाळून ठेवायचे असतील तर अडचण नाही. भाजपा आरामात सरकार बनवू शकते. पण  राजकारणाला तत्त्व आणि संवेदनशीलतेशी जोडायचे असेल तर, आदर्श निर्माण करायचा असेल तर भाजपाने सरकार बनवण्याच्या फंदात पडू नये. नव्याने निवडणुका घ्यायला राज्यपालांना सांगितले पाहिजे. जनतेचा विश्‍वास मिळवून मगच सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  
पण दिल्लीत सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत,  जी नव्याने राजकीय समीकरणे मांडली जात आहेत, ते पाहता भाजपाला दिल्लीच्या तख्तावर बसायची घाई झाली आहे.  लालकिल्ला जिंकला असल्याने आता आपल्याला आदर्श वगैरे पाळण्याची आवश्यकता नाही, असे भाजपा मानू लागला आहे असे दिसते. लोकसभेत मिळवलेल्या स्पष्ट बहुमतामुळे त्यांच्यात फाजील आत्मविश्‍वास आलेला दिसतो.  आदर्शाच्या मार्गावर चालण्याची आपल्याला आवश्यकता नाही  असे भाजपा मानत असेल तर तो मोठी चूक करतो आहे. मतदारांचे डोके फिरले तर एका रात्रीत ते भाजपाला जमिनीवर आणतील. राजकारणात सारेच क्षम्य आहे असे म्हटले जाते. असेलही. पण संवेदनाही काही चीज आहे. भावनांच्या लाटा काम करून जातात. सत्तेसाठी भाजपाही सरड्यासारखा रंग बदलतो हे लोकांच्या लक्षात आले तर अनर्थ होईल. त्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग तर होईलच, पण लोकशाहीवरचा लोकांचा विश्‍वासही ढळेल. त्यामुळे दिल्लीत मागच्या दाराने सरकार बनवण्याचा प्रयत्न भाजपाने न केलेला बरा.  हा मोह  भाजपाला पुढच्या काळात महागात पडू शकतो.