शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भाजपाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 05:16 IST

लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्ष उरले असताना झालेल्या चार लोकसभा आणि विधानसभांच्या ११ पोटनिवडणुकात मतदारांनी दिलेला कौल मोदी सरकार आणि सत्ताधारी भाजपाचे वारू जमिनीवर आणणारा आहे

लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्ष उरले असताना झालेल्या चार लोकसभा आणि विधानसभांच्या ११ पोटनिवडणुकात मतदारांनी दिलेला कौल मोदी सरकार आणि सत्ताधारी भाजपाचे वारू जमिनीवर आणणारा आहे. कर्नाटक पाठोपाठ आलेल्या या निकालाने देशाची राजकीय हवा सध्या कोणत्या दिशेने वाहत आहे, याचा अंदाज यावा. विशेषत: योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशात लागोपाठ तीन पोटनिवडणुकांमध्ये बसलेला जबर फटका आणि महाराष्टÑातील भंडारा-गोंदियाची गमावलेली जागा भाजपाच्या धुरिणांची काळजी वाढविणारा आहे. फुलपूर आणि गोरखपूर पाठोपाठ कैराना मतदारसंघात झालेला पराभव योगी आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या संघाच्या धुरिणांना मोठा धक्का आहे. स्वत: मुख्यमंत्री योगींसह अर्धेअधिक मंत्रिमंडळ आणि केंद्रीय मंत्री कैरानात अक्षरश: तळ ठोकून होते. तरीही तेथील जनतेने अजितसिंह यांच्या राष्टÑीय लोकदलाच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी केले. योगींना अतिआत्मविश्वास नडला, की लोकांना त्यांचा कारभार पसंत नाही? खरे तर या प्रश्नाचे उत्तर मोदी-शहांनी शोधायचे आहे. पालघरचा विजय मात्र त्यातल्या त्यात दिलासा देणारा आहे. शिवसेनेने तशी जोरदार टक्कर दिली. मात्र बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने त्यांचे मनसुबे उधळून लावले. काँग्रेसने तर आपले हसेच करून घेतले. वास्तविक, भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन सर्वपक्षीय आघाडी उभी केली असती, अथवा सेनेने बविआच्या उमेदवारास पाठिंबा दिला असता, तर कदाचित यापेक्षा वेगळा निकाल हाती आला असता. पण निवडणुकीनंतर अशा जर-तरला काही अर्थ नसतो. शिवसेनेने या पराभवातून धडा घेऊन नव्या जोेमाने पुढच्या तयारीला लागण्याऐवजी निवडणूक यंत्रणांवर खापर फोडले. निवडणूक काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या त्वेषाने भाजपावर तुटून पडले होते, ते बघता निकालानंतर सत्तेशी फारकत घेतील अशी अटकळ काहीनी बांधली होती. मात्र ठाकरे यांनी त्याबाबत चकार शब्दही उच्चारला नाही. सत्तेत राहून सत्ताधाºयांशी उभा दावा मांडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न लोकांनीही आता समजून घेतला आहे. भंडारा-गोंदियात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याचा फायदा राष्टÑवादीचे मधुकर कुकडे यांना झाला. वास्तविक, सध्या काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांनी भाजपाकडून ही जागा जिंकली होती. पण पक्षात वितुष्ट आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. या जागेवर त्यांचाही दावा होता. पण प्रफुल्ल पटेल यांनी यशस्वी शिष्टाई करून ही जागा आपल्या पक्षाकडे ठेवली. आजवरचा अनुभव लक्षात घेता, दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्र आले तरी कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने एक होत नाहीत. मात्र या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून विजय खेचून आणला. समविचारी पक्षांनी आघाडी केली तर भाजपाचा पराभव शक्य आहे, हे या पोटनिवडणुकीतून दिसून आले. उत्तर प्रदेशातील नूरपूर, बिहारातील जोकीहाट, प. बंगालमधील महेशतला, कर्नाटक, पंजाब आणि मेघालयातील विधानसभांच्या जागा भाजपाविरोधी पक्षांनी जिंकल्या आहेत. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्टÑीय जनता दलाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उमेदवाराचा केलेला दारुण पराभव बिहारच्या राजकरणाची दिशा स्पष्ट करणारा आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी नितीशकुमार यांनी नुकतीच केली आहे. या मागणीच्या आडून ते केंद्रावर दबाव आणू इच्छितात किंवा रालोआतून बाहेर पडण्याचा ते मार्ग शोधत असावेत असा कयास आहे. मेघालयाच्या आजच्या विजयाने काँग्रेस तिथे आता सर्वात मोठा पक्ष बनला आहे. पंजाबात अजून मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्रसिंग यांची जादू कायम आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने दोन जागा जिंकून आपण अजून शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. या पोटनिवडणुकीने भाजपाला दिलेला इशारा खूप काही सांगून जातो.