शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापेक्षाही सरकारी अनास्थेने कोट्यवधी गरीब बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 06:17 IST

परदेशात पर्यटक म्हणून जाणारे भारतीयही गरीब नक्कीच नाहीत. या तुलनेत भारतातल्या भारतात म्हणजे एकाच राज्यात खेड्यातून शहरात व एका राज्यातून दुसऱ्या राज्यात रोजीरोटीसाठी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या ३४ कोटी आहे.

कोरोनापेक्षाही सरकारी अनास्थेने देशातील कोट्यवधी गरीब बेजार झाल्याचे गेले काही दिवस देशभर दिसलेले चित्र रोगाच्या या साथीएवढेच भयावह आहे. सुखवस्तू घरांमधील ६०-७० लाख भारतीय नागरिक अधिक चैनीत व शानशौकीत राहता यावे यासाठी अमेरिका, युरोप व मध्य पूर्वेच्या देशांसह अन्य देशांमध्ये गेलेले आहेत. याखेरीज आणखी काही लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिकत आहेत. तेही सुखवस्तू घरातील आहेत.

परदेशात पर्यटक म्हणून जाणारे भारतीयही गरीब नक्कीच नाहीत. या तुलनेत भारतातल्या भारतात म्हणजे एकाच राज्यात खेड्यातून शहरात व एका राज्यातून दुसऱ्या राज्यात रोजीरोटीसाठी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या ३४ कोटी आहे. यापैकी बहुतांश असंघटित क्षेत्रातील व हातावर पोट असणारे आहेत. हे लोक अत्यंत खडतर परिस्थितीत केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी शहरांमध्ये राहात असतात.

फळे व भाजीपाल्याची विक्री, इस्त्री, पिठाची गिरणी, वाहनांची सफाई व छोटी-मोठी दुरुस्ती, घरकाम, अंगमेहनतीची इतर कामे, बांधकामे, निवासी व व्यापारी इमारतींची रखवाली असे शहरांचे असंख्य दैनंदिन व्यवहार या लोकांच्या जीवावर सुखेनैव सुरू असतात. पूर्वीही असे स्थलांतर होत असे. पण ते राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांपुरते व शेतीच्या हंगामापुरते असायचे. रेल्वेने देशात आडव्या-तिडव्या हजारभर किमी लांबीच्या मार्गांवर धावणाºया गाड्या सुरू केल्या. त्यामुळे ूबिहार-उत्तर प्रदेशातून पार केरळ, गोवा व तामिळनाडूपर्यंत, आसाम व प.बंगालपासून गुजरात व राजस्थानपर्यंत आणि झारखंड, ओडिशा व तेलंगणपासून दिल्ली व पंजाबपर्यंत थेट पोहोचण्याची सोय झाली. आर्थिक गरज, वाढती आकांक्षा व रेल्वेची ही सोय यामुळे या देशांतर्गत स्थलांतराचे प्रमाण व विस्तार गेल्या एक-दीड शतकात शतपटीने वाढला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या चार तासाची पूर्वसूचना देत देशव्यापी ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आणि या कोट्यवधी स्थलांतरित कामगार-मजुरांवर आभाळ कोसळले. हाताला काम नाही, खिशात पैसे नाही, शहरांमध्ये राहणे शक्य नाही व गावी परत जायलाही काही साधन नाही, अशा विचित्र कचाट्यात हे लोक सापडले. सुरुवातीचे दोन दिवस मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी धोका पत्करून जाता येईल तेथपर्यंत हे लोक जात राहिले. नंतर सर्वच ठप्प झाल्यावर प्रत्येक राज्यातून शेकडो किमीचा प्रवास पायी करून गावाकडे निघालेल्या या लोकांचे तांडे महामार्गांवर दिसू लागले.

राज्यांच्या सीमा बंद केल्याने अनेक राज्यांच्या सीमांवर असे हजारोंचे तांडे अडविले गेले. या लोकांचे करायचे काय, अशी स्थानिक प्रशासनाची अडचण झाली. संतापजनक बाब अशी की, परदेशात अडकलेल्या व समाजमाध्यमातून मदतीसाठी टाहो फोडणाºया काही हजार सुखवस्तू भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने लगेच विमाने रवाना केली. ते केले म्हणून तक्रार नाही. पण तेवढ्याच तत्परतेने, नव्हे किंबहुना ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याच्या आधीच सरकारने या देशांतर्गत स्थलांतरितांचा विचार करायला हवा होता. परदेशस्थ भारतीयांकडून देशाला मोठे परकीय चलन मिळते हे खरे. पण ते पैसे हे लोक आपापल्या कुटुंबाना पाठवत असतात. फक्त ते परकीय चलनात असतात म्हणून बँकांमार्फत अधिकृत मार्गाने येतात व पर्यायाने सरकारला वापरायला मिळतात.

तुलनेने या देशांतर्गत स्थलांतरितांचे अर्थव्यवस्थेतील योगदान खूप मोठे आहे. तरीही ते गरीब व वंचित वर्गात मोडतात म्हणून त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे होते. उशिरा का होईना पण केंद्र सरकारला जाग आली व स्थलांतरितांचे हे लोंढे आहेत तेथेच थोपवा, त्याची तेथेच राहण्या-जेवणाची सोय करा, असे निर्देश केंद्राने राज्यांना शुक्रवारी रात्री दिले. अशा प्रकारच्या स्थलांतराने ‘लॉकडाऊन’चा मुख्य उद्देशच विफल होईल.

कोरोना शहरातून गावखेड्यांमध्ये पोहोचेल, हेही अधोरेखित केले गेले. असे असूनही राजधानी दिल्लीला अगदी लागून असलेल्या व भाजपाचीच सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश सरकारने दिल्लीत अडकलेल्या त्या राज्यातील स्थलांतरितांना घरी नेऊन सोडण्यासाठी शेकडो विशेष बस पाठविल्या. त्या बसमध्ये आत ६०-७०जण कोंबलेले व छतावर आणखी ४०-५० जण अशी चित्रे पाहून देशाची पुन्हा एकदा फाळणी झाली की काय, अशी शंका मनात आली. एखादे राज्य सरकार अशा महाभयंकर संकटाच्या काळातही राजरोसपणे किती बेजबाबदार वागू शकते, याचे हे चीड आणणारे उदाहरण आहे. असेच सुरू राहिले तर सहा महिने ‘लॉकडाऊन’ करूनही कोरोना आटोक्यात येणार नाही व रोगापेक्षा भयंकर औषधाने देश रसातळाला जाईल, अशी भीती वाटते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत