शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

बिहारी मतसंग्रामाची नांदी

By admin | Updated: September 11, 2015 04:24 IST

निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्याने बिहारमधील मतसंग्रामाची नांदी झाली आहे. या संग्रामात विजयी होण्यासाठी इरेला पेटलेल्या दोन्ही बाजूंनी आधीपासूनच

निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्याने बिहारमधील मतसंग्रामाची नांदी झाली आहे. या संग्रामात विजयी होण्यासाठी इरेला पेटलेल्या दोन्ही बाजूंनी आधीपासूनच शंख फुंकण्यास सुरूवात केली होती. आरोप-प्रत्त्यारोपाच्या फैरी झडतच होत्या. आता त्यात व्यक्तिगत चिखलफेक आणि पराकोटीला जाऊन उणीदुणी काढण्याची भर पडणार आहे. हा सारा टोकाचा खटाटोप केला जात आहे, तो बिहारी जनतेच्या हिताच्या नावाखाली. प्रत्यक्षात आॅक्टोबर १२ पासून मतदानाच्या पाच फेऱ्या होऊन ८ नोव्हेंबरला दिवाळीच्या तीन दिवस आधी जे निकाल लागणार आहेत, त्यात दोन्हींपैकी कोणत्या बाजूचे राजकीय दिवाळे निघण्यास प्रारंभ होणार आहे, त्याचं प्रतिबिंब पडणार आहे. म्हणूनच हा बिहारी मतसंग्राम देशस्तरावरील राजकारणाला कलाटणी देण्याएवढा निर्णायक ठरण्याचा संभव आहे. विकास की सामाजिक न्याय हा तिढा बिहारच्या राजकारणात पूर्वापार आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी जो ‘विकासा’चा झंझावात निर्माण केला, त्याने ‘सामाजिक न्याय’ हा मुद्दा मागे सारला गेला आणि बिहारमध्ये भाजपाच्या विरोधकांचा फज्जा उडाला. ते घडू शकलं, ते जातीपातीच्या पलीकडं जाऊन ‘रोटी, कपडा और मकान’चे स्वप्न मोदी यांनी दाखवल्याने आणि ‘मला निवडून द्या, मी हा बदल घडवून आणीन’, असा विश्वास ते मतदारांच्या मनात निर्माण करू शकल्याने. पण गेल्या वर्षभरात मोदी यांंनी दाखवलेले हे स्वप्न पुरे झालेले नाही. त्यामुळे मतदार संभ्रमावस्थेत आहे. त्याची पहिली चुणूक मतदारांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव केल्याने दिसून आली. आता प्रथमच एका मोठ्या राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीला भाजपा सामोरा जात आहे. भाजपाला दिल्लीत दणका बसल्याने विरोधकांनीही उचल खाल्ली आणि त्यातूनच कालपरवापर्यंत एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले नितीशकुमार, लालूप्रसाद यादव व मुलायमसिंह यादव एकत्र आले. काँगे्रसनेही त्यांच्याशी हातमिळवणी केली. विकासासह सामाजिक न्याय, अशी भूमिका या पक्षांनी घेतली आणि बिहारचा विकास सर्वांगाने घडवून आणायचा असल्यास राज्याला केंद्राने ‘विशेष दर्जा’ देऊन खास मदतीचे ‘पॅकेज’ जाहीर केले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. त्याला उत्तर म्हणून मोदी यांनी बिहारमध्ये सभा घेऊन सव्वा लाख कोटींचे ‘पॅकेज’ देत असल्याची घोषण केली. या ‘पॅकेज’वरूनच मग राजकारण सुरू झाले. हे ‘पॅकेज’ म्हणजे बिहारी जनतेची फसवणूक असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. आता निवडणुका जाहीर झाल्याने या अशा आरोपांना नव्याने धार चढणार आहे. बिहारच्या अस्मितेचाही जो प्रश्न मोदी यांनी ‘राज्याच्या डीएनए’चा वाद उकरून काढल्याने उद्भवला आहे आणि त्यावरून जे रण माजवले जात आहे, त्यालाही वितंडवादाचे स्वरूप येण्याची शक्यता आहे. आपल्यासह बिहारमधील असंख्य लोकांच्या ‘डीएनए’चा नमुना प्रत्यक्षात मोदी यांना पाठवून नितीशकुमार यांनी या वादात नवी मजल आधीच गाठली आहे. नितीशकुमार म्हणतात, तसा ‘विकासाच्या ओघात सामाजिक न्याय’ की, ‘विकास घडत गेल्यास सामाजिक न्याय येणारच’ ही भाजपाची भूमिका, यापैकी कशाला मतदार पाठबळ देतात, हाच खरा या निवडणुकीतील कळीचा मुद्दा आहे. या दोन्ही भूमिकातील फरक हा राज्यकारभाराचा आहे. म्हणूनच नितीशकुमार यांच्या पारड्यात मते टाकाल, तर आज त्यांचे साथीदार बनलेल्या लालूप्रसाद यांचे पूर्वीचे ‘जंगल राज’ परत येण्याचा बागुलबुवा मोदी दाखवत आहेत आणि आमच्या हातात सत्ता होती, तेव्हा राज्यकारभार कसा सुनियोजित होता, आता त्याची कशी वासलात लागत आहे व लालूप्रसादांच्या हाती सत्ता आल्यास काय भोगावे लागेल, याचा पाढाही मोदी व भाजपा वाचत आहेत. हेच नितीशकुमार दोन वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या सोबत होते, हे गेल्या १० वर्षांच्या कारभाराचा हवाला देताना मोदी व भाजपा सोयीस्करपणे विसरत आहेत. तीच गोष्ट नितीशकुमारांची. आज ते मोदी व भाजपाला लक्ष्य करीत असले तरी हीच भाजपा त्यांना दोन वर्षांपूर्वीपर्यंत चालत होती. केवळ मोदी नेतृत्वपदी आले, म्हणून त्यांना ती नकोशी झाली. केंद्रातील वाजपेयी सरकारात तेच रेल्वेमंत्री असताना गोध्रा हत्त्याकांड घडले होते व त्यातूनच गुजरातचा नरसंहार घडून आला होता. तेव्हा नितीशकुमार यांनी मंत्रीपद सोडले नव्हते. मुद्दा इतकाच की, दोन्ही बाजू घेत असलेल्या भूमिकांचे खरे स्वरूप ‘बोलाचाच कढी, बोलाचीच कढी’ असे आहे. म्हणूनच दोन्ही बाजूंचा भर ‘जातीची समीकरणे’ ठीक बसविण्यावर आणि आघाडीत फूट पाडू न देण्यावर आहे. दलित व महादलित जातींना ‘यादवराज’ची भीती दाखवली जात आहे. उलट ओबीसी, दलित व महादलित आणि मुस्लिम यांची एकत्रित आघाडी करून त्यांची मते पारड्यात पाडून घेण्याची रणनीती नितीशकुमार यांची आघाडी आखत आहे. त्यांच्या आघाडीतून आता मुलायमसिंह यादव बाहेर पडले आहेत व त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. म्हणजे त्यांची मदत भाजपालाच होणार. याचा अर्थ ‘विकास’ व ‘सामाजिक न्याय’ हे मुद्दे तोंडी लावण्यापुरतेच उरणार आहेत.