शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Bihar Assembly Election 2020: नितीशना तारणारी नारीशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 01:15 IST

बिहारमधील नारीशक्तीने एनडीएला तारले. मोदींबरोबर गेल्यामुळे गेली तीन वर्षे नितीशकुमार हे सर्वत्र टीकेचे धनी झाले होते.

बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झाले. मात्र मुख्यमंत्रिपदाबद्दल बुधवारी दुपारपर्यंत नितीश यांचे मौन होते. मुख्यमंत्रिपदाभोवती वलय असले तरी जनमताचा पाया नसेल तर ते पोकळ असते. जनतेच्या मनावर राज्य करण्यासाठी आमदारांची भक्कम संख्या पाठीशी लागते. पन्नास वर्षे राजकारणात काढलेल्या नितीशकुमार यांना हे चांगले माहीत आहे. यामुळे बहुमतातील पक्षाने देऊ केलेले मुख्यमंत्रिपद अल्पमतात राहून ते स्वीकारतील का हा प्रश्न आहे. उलट बाजूने पंधरा वर्षे चालविलेला सुशासनाचा गाडा दुसऱ्या व्यक्तीच्या हाती द्यायचा की सुधारणांना नेटाने अधिक बळ द्यायचे याचा विचारही नितीश यांना करावा लागेल. मुख्यमंत्रिपदी नितीश असणे भाजपसाठी सोयीचे आहे. जाहीरपणे दिलेला शब्द आपण पाळतो, असा प्रचार देशात, विशेषतः महाराष्ट्रात करण्याची संधी भाजपला यातून मिळेल.

नितीश यांच्या पक्षाची संख्या रोडावण्यामागे त्यांचा ढिसाळ कारभार नव्हे, तर चिराग पास्वानचा प्रभावी प्रचार अधिक कारणीभूत ठरला असे मतांची आकडेवारी दाखविते. चिरागनी बंड केले नसते तर नितीशकुमारांच्या पक्षाची संख्या तेजस्वी यादव यांच्या राजदपेक्षा अधिक झाली असती. चिराग व नितीशकुमार यांच्या मतांची बेरीज अनेक ठिकाणी राजदपेक्षा अधिक होते. चिराग यांना अवघी एक जागा मिळाली. मात्र भाजपच्या विरोधात उमेदवार उभे न करून आणि फक्त नितीशकुमार यांच्या विरोधात निवडणूक लढवून भाजप व तेजस्वी यादव या दोघांच्या जागा त्यांनी वाढविल्या. लालूपुत्र तेजस्वीचे कौतुक करताना त्या विजयातील चिरागच्या वाट्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. तेजस्वी यादव यांचा प्रचाराचा धडाका मोठा असला तरी नितीशकुमार यांच्या विरोधात लाट उभी करण्यात ते अयशस्वी ठरले.

लालूप्रसादांची अचानक साथ सोडण्याच्या नितीशकुमार यांच्या राजकीय संधिसाधूपणाला जनता धडा शिकविल हा तेजस्वींचा कयास खरा ठरला नाही. मुस्लीम मतदारांबाबतही त्यांचा भ्रमनिरास झाला. यादव-मुस्लीम समीकरण तुटले. मुस्लीम मतदारांना तेजस्वीपेक्षा ओवेसी जवळचे वाटले. प्रत्येक पक्ष मतपेटीसाठी आपला उपयोग करून घेतो ही भावना मुस्लीम मतदारांत वाढली आहे. यामुळे काँग्रेस, समाजवादी पार्टी, राजद अशा सर्व पक्षांना फटका बसत आहे. यादवांबरोबर अन्य लहान जातींची आघाडी तेजस्वी यादव यांना उभारता आली नाही. त्यांच्या नेतृत्वातील ही महत्त्वाची त्रुटी आहे. 

तरुण व दमदार तेजस्वीसमोर नितीश व मोदी यांचे वयस्कर नेतृत्व फिके पडणार असा होरा होता. तसे झाले नाही. नितीश व मोदी हे मुरलेले राजकारणी असल्यामुळे पहिल्या टप्प्यात तेजस्वीला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी प्रचाराचा रोख सफाईने बदलला. लालू काळातील गुंडाराज विरुद्ध नितीशकुमार यांचे सुशासन असा प्रचाराचा रोख केला. त्याचा प्रभावी प्रतिवाद करणे तेजस्वी यादव यांना जमले नाही. एनडीएला निवडणुकीत का यश मिळाले याची पंतप्रधान मोदी यांनी केलेली मीमांसा इथे लक्ष वेधून घेते. केंद्र व राज्य सरकारच्या कामाला महिलांनी प्रतिसाद दिला, असे मोदी यांनी म्हटले आहे. कोरोना व पूर यांचा जबर फटका बिहारला बसला. मात्र याच काळात गरिबांच्या घरात मोफत धान्य मिळत होते व खात्यात पैसेही जमा होत होते. गरिबांच्या घरापर्यंत मदत थेट पोहोचविण्याची जी प्रशासकीय पद्धत मोदी यांनी बसविली आहे त्यामुळे महिला आश्वस्त झाल्या.

मुलींना सायकली, ग्रामपंचायतीत आरक्षण आणि मुख्यतः दारूबंदी अशा धोरणांमुळे नितीशकुमारही महिलांमध्ये लोकप्रिय होते. परंतु, मोदी-नितीश यांनी घातलेल्या लालूंच्या गुंडाराजच्या भीतीने महिलांना एनडीएच्या बाजूने मतदान करण्यास अधिक प्रवृत्त केले. गुंडाराजचा फटका महिलांनाच सर्वाधिक बसला होता. महिला मतदारांच्या संख्येत पाच टक्क्यांनी झालेली वाढ उशिरा लक्षात आल्याने एक्झिट पोल चुकले अशी कबुली अक्सिस इंडियाचे प्रदीप गुप्ता यांनीही दिली.

बिहारमधील नारीशक्तीने एनडीएला तारले. मोदींबरोबर गेल्यामुळे गेली तीन वर्षे नितीशकुमार हे सर्वत्र टीकेचे धनी झाले होते. परंतु, त्यांचा कारभार बिहारमध्ये सुव्यवस्था निर्माण करणारा होता. बिहारमधील समस्या अतिशय जटिल असल्यामुळे त्या झटपट पूर्णपणे सुटणे शक्य नाही. मात्र व्यक्तिगत राजकीय प्रतिष्ठेपेक्षा आपण सुरू केलेल्या योजना पूर्ण करण्यास नितीशकुमार यांनी यापुढे महत्त्व दिले आणि भाजपने मतलबी राजकारण केले नाही तर सुशासित कारभार अजून पाच वर्षे सुरू राहू शकतो.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक