शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फुटीचा सर्वाधिक फटका काँग्रेसलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:43 IST

एडिटर्स व्ह्यू

मिलिंद कुलकर्णीभाजपचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त टळला आहे. कोठेतरी माशी शिंकली. आता विजयादशमीचा मुहूर्त सांगितला जात असला तरी खडसे यांचा सूर बदललेला दिसतो. प्रथेप्रमाणे माध्यमांच्या माथ्यावर खापर फोडून खडसे मोकळे झाले. तरी पक्षांतराची प्रक्रिया पाहता पडद्या आड घडणाºया घडामोडी आणि त्या फलद्रूप होण्यासाठी करावे लागणारे सायास हे राजकीय नेत्यांना पुरते ठावूक आहे. त्यामुळे खडसे आता वेळ घेणार आहेत.भारतीय राजकारणातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात फूट आणि पक्षांतराचा इतिहासदेखील मोठा आहे. अलिकडे १९९९ मध्ये महाराष्टÑात काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्टÑवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मोठे  राजकीय वादळ आले. अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नेते काँग्रेस सोडून गेले. त्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. काँग्रेस पक्ष या वादळातून अद्यापही सावरलेला नाही. लोकसभेची एकही जागा त्यानंतर काँग्रेस जिंकू शकलेला नाही. विधानसभेची जागा देखील दहा वर्षांनंतर काँग्रेसच्या खात्यात जमा झाली.१९९९ च्या फुटीनंतरही दोन्ही काँग्रेसमध्ये सत्तेसाठी समझोता झाला. केद्र व राज्य सरकारमध्ये राष्टÑवादी काँग्रेस सहभागी झाली. १५ वर्षांची ही आघाडी २०१४ मध्ये फुटली. दोन्ही काँग्रेसने त्यावेळी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. १५ वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसची अवस्था दयनीय राहिली. अर्थात फटका राष्टÑवादीलादेखील बसला. केवळ एक आमदार निवडून आला. त्यामुळे पक्षांतर आणि त्याचा राजकीय पक्षांवर होणारा परिणाम अभ्यासताना १९९९ व २०१४ या दोन विधानसभा निवडणुकांकडे बघायला हवे.१९९९ मध्ये सर्वच मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत झाली. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना -भाजप युती मैदानात उतरले होते. तर २०१४ मध्ये आघाडी व युती तुटली आणि चारही प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या. काही मतदारसंघात फुटीचा लाभ युतीला मिळाला होता. परंतु, दमदार, वजनदार राष्टÑवादी नेत्यांनी पक्षांतरानंतरही जागा कायम राखली.१९९९ मध्ये भाजपने ४ तर युतीतील मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेने ५ जागा पटकावल्या होत्या. काँग्रेस व राष्टÑवादीला प्रत्येकी एका जागवेर समाधान मानावे लागले. १५ वर्षांच्या राज्यातील आघाडी सरकार नंतरही २०१४ मध्ये काँग्रेसचे अस्तित्व लयास जाऊ लागले तर राष्टÑवादी पुन्हा एकवर आली. भाजप ६ जागा जिंकून मोठा भाऊ झाला, सेनेला ३ जागा मिळाल्या. अमळनेरात अपक्ष उमेदवार निवडून आला.काँग्रेसचे किती पतन या दोन निवडणुकांमध्ये झाले, त्याची आकडेवारी मोठी रंजक आहे. १९९९ मध्ये लढलेले उमेदवार व त्यांची मते आणि (कंसात २०१४ मधील उमेदवार व त्यांची मते) पाहता हे ठळकपणे लक्षात येईल. चोपडा : लहू हिराजी पाटील : १६१८९ (ज्ञानेश्वर भादले : १०२८०), रावेर : राजाराम गणू महाजन  :विजयी : ४७७१९ (शिरीष चौधरी : ५५९६२),  जळगाव : डॉ.अर्जुन भंगाळे  ४१२८० (डॉ.राधेश्याम चौधरी ४०१४), अमळनेर : डॉ.अनिल शिंदे २२५२३ (गिरीश सोनजी पाटील १४५८), पारोळा : प्रदीप पवार २४६९९ (एरंडोल : प्रवीण वाघ : १६७०), पाचोरा : डी.एम.पाटील १४४५३ (प्रदीप पवार ४९०४), जामनेर : डॉ.सुरेश पाटील २१३७५ (ज्योत्स्ना विसपुते २६९५), मुक्ताईनगर : डॉ.जी.एन.पाटील २६६७६ (योगेद्रसिंह पाटील ४४९५), जळगाव ग्रामीण (डी.जी.पाटील ३९६८) व चाळीसगाव (अशोक खलाणे ३३२८), भुसावळ  (पुष्पा सोनवणे :३००५) या तीन जागांवर १९९९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार नव्हते.चोपडयात अरुणभाई गुजराथी यांनी जागा राखली. मात्र २०१४ मध्ये राष्टÑवादीला ही जागा गमवावी लागली. माधुरी किशोर पाटील पराभूत झाल्या. मावळते आमदार जगदीश वळवी हे भाजपकडून लढले होते. शिवसेनेचे प्रा. चंद्रकांत सोनवणे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांना जळगाव मतदारसंघात थोडया मतांनी दोनदा पराभव स्विकारावा लागला होता.याउलट रावेरमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे पूत्र शिरीष चौधरी यांना १९९९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुनही पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे राजाराम गणू महाजन निवडून आले. २०१४ मध्ये शिरीष चौधरी हे काँग्रेसचे उमेदवार असूनही पराभूत झाले. भाजपचे हरिभाऊ जावळे विजयी झाले होते.भुसावळ मतदारसंघात शिवसेनेचे संतोष चौधरी यांनी १९९९ मध्ये बंड करुनदेखील दिलीप भोळे आमदार झाले. चौधरी दुसºया क्रमांकावर तर राष्टÑवादीचे वासुदेव इंगळे तिसºया क्रमांकावर राहिले. २०१४ मध्ये राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री संजय सावकारे यांनी जागा कायम राखली.जळगावात १९९९ च्या निवडणुकीत सुरेशदादा जैन यांनी शिवसेनेतर्फे विजय मिळविला. काँग्रेसचे डॉ.अर्जुन भंगाळे व राष्टÑवादीचे निवृत्त प्राचार्य के.आर.सोनवणे पराभूत झाले. २०१४ मध्ये भंगाळे यांचे नातेवाईक सुरेश भोळे यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवून सुरेशदादा जैन (शिवसेना) यांचा पराभव केला. सुरेशदादा जैन यांनी सेना सोडल्यानंतर  झालेल्या २००२ मध्ये पोटनिवडणुकीत राष्टÑवादीतर्फे विजयी झाले.जळगाव ग्रामीण या नव्याने तयार झालेल्या मतदारसंघात २०१४ मध्ये चौकोनी लढतीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांची सरशी झाली आणि मंत्रिपद मिळाले. राष्टÑवादीचे गुलाबराव देवकर व काँग्रेसचे डी.जी.पाटील पराभूत झाले.हा इतिहास पाहता काँग्रेसला नवसंजिवनी मिळेल का या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव