शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जेवढा मोठा प्रकल्प, तेवढा मोठा विकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:01 IST

नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ किंवा विरोधक हे नक्कीच संभ्रमावस्थेत असावेत. कारण रिफायनरीमुळे हवा, पाणी किंवा जमिनीचे प्रदूषण होईल, असा निकष लावला जात असेल

- मनमोहन शर्मानाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ किंवा विरोधक हे नक्कीच संभ्रमावस्थेत असावेत. कारण रिफायनरीमुळे हवा, पाणी किंवा जमिनीचे प्रदूषण होईल, असा निकष लावला जात असेल; तर तो साफ चुकीचा आहे. कारण या प्रकल्पासाठी सर्वात आधुनिक असे बीएस-व्हीआय प्लस (युरो व्हीआय) निकषांची पूर्तता करणारे जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा परिणाम येथील काजू, आंबा किंवा फळबागांवर होईल, या केवळ अफवा म्हणता येतील. तसे असते तर गुजरातच्या वाळवंटी जामनगरमध्ये रिफायनरी प्रकल्प आल्यानंतरही दर्जेदार केसरी आंबा पिकलाच नसता.देशातच नव्हे, तर जगभर इंधनाची गरज वाढताना दिसत आहे. विशेषत: मुंबईसारख्या महानगरात पेट्रोल, डिझेलच्या मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरीत कच्च्या तेलावर (क्रूड आॅइल) प्रक्रिया करून पेट्रोलियम पदार्थ मिळणार असतील, तर देशाच्या परकीय चलनात प्रचंड बचत होणार आहे. आजही देशाला ८० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. त्यात प्रक्रिया करण्यासाठीही बाहेरील देशांतील रिफायनरीवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी स्वत:ची रिफायनरी असेल, तर नक्कीच कर आणि इतर खर्च टाळता येतील. त्यातून या प्रकल्पात दररोज सुमारे १२ लाख बॅरल्स इतके पेट्रोलियम पदार्थ उपलब्ध होणार आहेत. त्याचा फायदा नक्कीच देशाला आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांना होणार आहे.पर्यावरणावर बोलायचेच झाले, तर विरोध करायला आधारच उरत नाही. कारण आजही चेंबूर येथील रिफायनरी आणि त्याशेजारी असलेल्या मानवी वस्त्यांकडे पाहून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. ६० वर्षांपूर्वी उभारलेल्या या रिफायनरीत कालांतराने बदल केले गेले. तरीही या ठिकाणी प्रदूषणाची समस्या जाणवत नाही. याउलट नाणार प्रकल्पात सर्वात आधुनिक पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे विविध पेट्रोलियम पदार्थ मिळवताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. देशातील जामनगर, विशाखापट्टणम, मथुरा अशा विविध शहरांचेही दाखले देता येतील.(लेखक आयसीटीचे माजी प्राध्यापक व रसायन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)(शब्दांकन - चेतन ननावरे)

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प