शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जेवढा मोठा प्रकल्प, तेवढा मोठा विकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:01 IST

नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ किंवा विरोधक हे नक्कीच संभ्रमावस्थेत असावेत. कारण रिफायनरीमुळे हवा, पाणी किंवा जमिनीचे प्रदूषण होईल, असा निकष लावला जात असेल

- मनमोहन शर्मानाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ किंवा विरोधक हे नक्कीच संभ्रमावस्थेत असावेत. कारण रिफायनरीमुळे हवा, पाणी किंवा जमिनीचे प्रदूषण होईल, असा निकष लावला जात असेल; तर तो साफ चुकीचा आहे. कारण या प्रकल्पासाठी सर्वात आधुनिक असे बीएस-व्हीआय प्लस (युरो व्हीआय) निकषांची पूर्तता करणारे जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा परिणाम येथील काजू, आंबा किंवा फळबागांवर होईल, या केवळ अफवा म्हणता येतील. तसे असते तर गुजरातच्या वाळवंटी जामनगरमध्ये रिफायनरी प्रकल्प आल्यानंतरही दर्जेदार केसरी आंबा पिकलाच नसता.देशातच नव्हे, तर जगभर इंधनाची गरज वाढताना दिसत आहे. विशेषत: मुंबईसारख्या महानगरात पेट्रोल, डिझेलच्या मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरीत कच्च्या तेलावर (क्रूड आॅइल) प्रक्रिया करून पेट्रोलियम पदार्थ मिळणार असतील, तर देशाच्या परकीय चलनात प्रचंड बचत होणार आहे. आजही देशाला ८० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. त्यात प्रक्रिया करण्यासाठीही बाहेरील देशांतील रिफायनरीवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी स्वत:ची रिफायनरी असेल, तर नक्कीच कर आणि इतर खर्च टाळता येतील. त्यातून या प्रकल्पात दररोज सुमारे १२ लाख बॅरल्स इतके पेट्रोलियम पदार्थ उपलब्ध होणार आहेत. त्याचा फायदा नक्कीच देशाला आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांना होणार आहे.पर्यावरणावर बोलायचेच झाले, तर विरोध करायला आधारच उरत नाही. कारण आजही चेंबूर येथील रिफायनरी आणि त्याशेजारी असलेल्या मानवी वस्त्यांकडे पाहून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. ६० वर्षांपूर्वी उभारलेल्या या रिफायनरीत कालांतराने बदल केले गेले. तरीही या ठिकाणी प्रदूषणाची समस्या जाणवत नाही. याउलट नाणार प्रकल्पात सर्वात आधुनिक पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे विविध पेट्रोलियम पदार्थ मिळवताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. देशातील जामनगर, विशाखापट्टणम, मथुरा अशा विविध शहरांचेही दाखले देता येतील.(लेखक आयसीटीचे माजी प्राध्यापक व रसायन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)(शब्दांकन - चेतन ननावरे)

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प