शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भामसंचा घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:02 IST

जुने ते सोने अशी म्हण मराठीत आहे. इतर भारतीय भाषांमध्ये अशा आशयाच्या म्हणी आहेत की नाहीत कोण जाणे; पण भारतीय माणूस इतिहासात रमतो, हे सत्य आहे.

जुने ते सोने अशी म्हण मराठीत आहे. इतर भारतीय भाषांमध्ये अशा आशयाच्या म्हणी आहेत की नाहीत कोण जाणे; पण भारतीय माणूस इतिहासात रमतो, हे सत्य आहे. आताच्या तुलनेत जुना काळ कसा चांगला, रम्य, वैभवशाली, समृद्ध होता, हे कथन करीत सुस्कारे सोडणे त्याला आवडते. अलीकडे मात्र, इतिहासातील गत सहा-सात दशकांच्या कालखंडात जे काही झाले ते सगळे टाकाऊ असल्याचा कांगावा करीत बदलून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाच्या नियोजनबद्ध विकासाचा कणा ठरलेल्या योजना आयोगाचा गाशा एक दिवस असाच गुंडाळण्यात आला आणि नीती आयोग अस्तित्वात आणण्यात आला. त्यावेळी जुन्या बाटलीत नवी दारू म्हणून विरोधकांनी त्याची संभावना केली; पण आता तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मातृ संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील भारतीय मजदूर संघानेच नीती आयोगाला धारेवर धरले आहे. केवळ नीती आयोगच नव्हे, तर नरेंद्र मोदी सरकारच्या एकूणच आर्थिक धोरणावर भामसंने सडकून टीका केली आहे. भामसंच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच नागपुरात पार पडली. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भामसंचे महामंत्री ब्रजेश उपाध्याय यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांची पार चिरफाड केली. काँग्रेसचीच आर्थिक धोरणे राबवित असल्याचा हल्ला, त्यांनी मोदी सरकारवर चढविला. गत काही दिवसांपासून मोदी सरकारवर चौतर्फा टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. राजकीय विरोधकांसोबतच विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि समाजमाध्यमांमध्ये सक्रिय ट्रोल असे सारेच मोदी सरकारवर तुटून पडत असताना, आता साक्षात परिवारातील संघटनेकडून झालेला हल्ला जिव्हारी लागणाराच म्हणायला हवा. त्यातही ऊठसूट काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा देणे सुरू असताना, संघ परिवारातील संघटनेनेच काँग्रेसची धोरणे राबवित असल्याची टीका करावी, यापेक्षा मोठा दैवदुर्विलास तो कोणता? संघ परिवाराची राजकीय शाखा असलेल्या भाजपाच्या सरकारवर टीका करण्यामागे भामसंची जी भूमिका असेल ती असो; पण उपाध्याय यांनी नेमक्या त्याच मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले आहे, जे मुद्दे विविध विचारवंत व अर्थतज्ज्ञांनी गत काही दिवसात मांडले आहेत. आर्थिक मंदी आणि थंडावलेली रोजगार निर्मिती हे त्यापैकी प्रमुख मुद्दे! पंतप्रधान मोदी व सरकारमधील इतर धुरीण या आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे साफ फेटाळून लावतात; पण आता थेट परिवारातूनच घरचा अहेर मिळाल्याने, किमान आता तरी त्यांनी या मुद्यांची दखल घ्यायला हवी. तसे झाल्यास जनता भामसंला निश्चितच धन्यवाद देईल!