शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

भामसंचा घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:02 IST

जुने ते सोने अशी म्हण मराठीत आहे. इतर भारतीय भाषांमध्ये अशा आशयाच्या म्हणी आहेत की नाहीत कोण जाणे; पण भारतीय माणूस इतिहासात रमतो, हे सत्य आहे.

जुने ते सोने अशी म्हण मराठीत आहे. इतर भारतीय भाषांमध्ये अशा आशयाच्या म्हणी आहेत की नाहीत कोण जाणे; पण भारतीय माणूस इतिहासात रमतो, हे सत्य आहे. आताच्या तुलनेत जुना काळ कसा चांगला, रम्य, वैभवशाली, समृद्ध होता, हे कथन करीत सुस्कारे सोडणे त्याला आवडते. अलीकडे मात्र, इतिहासातील गत सहा-सात दशकांच्या कालखंडात जे काही झाले ते सगळे टाकाऊ असल्याचा कांगावा करीत बदलून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाच्या नियोजनबद्ध विकासाचा कणा ठरलेल्या योजना आयोगाचा गाशा एक दिवस असाच गुंडाळण्यात आला आणि नीती आयोग अस्तित्वात आणण्यात आला. त्यावेळी जुन्या बाटलीत नवी दारू म्हणून विरोधकांनी त्याची संभावना केली; पण आता तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मातृ संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील भारतीय मजदूर संघानेच नीती आयोगाला धारेवर धरले आहे. केवळ नीती आयोगच नव्हे, तर नरेंद्र मोदी सरकारच्या एकूणच आर्थिक धोरणावर भामसंने सडकून टीका केली आहे. भामसंच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच नागपुरात पार पडली. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भामसंचे महामंत्री ब्रजेश उपाध्याय यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांची पार चिरफाड केली. काँग्रेसचीच आर्थिक धोरणे राबवित असल्याचा हल्ला, त्यांनी मोदी सरकारवर चढविला. गत काही दिवसांपासून मोदी सरकारवर चौतर्फा टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. राजकीय विरोधकांसोबतच विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि समाजमाध्यमांमध्ये सक्रिय ट्रोल असे सारेच मोदी सरकारवर तुटून पडत असताना, आता साक्षात परिवारातील संघटनेकडून झालेला हल्ला जिव्हारी लागणाराच म्हणायला हवा. त्यातही ऊठसूट काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा देणे सुरू असताना, संघ परिवारातील संघटनेनेच काँग्रेसची धोरणे राबवित असल्याची टीका करावी, यापेक्षा मोठा दैवदुर्विलास तो कोणता? संघ परिवाराची राजकीय शाखा असलेल्या भाजपाच्या सरकारवर टीका करण्यामागे भामसंची जी भूमिका असेल ती असो; पण उपाध्याय यांनी नेमक्या त्याच मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले आहे, जे मुद्दे विविध विचारवंत व अर्थतज्ज्ञांनी गत काही दिवसात मांडले आहेत. आर्थिक मंदी आणि थंडावलेली रोजगार निर्मिती हे त्यापैकी प्रमुख मुद्दे! पंतप्रधान मोदी व सरकारमधील इतर धुरीण या आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे साफ फेटाळून लावतात; पण आता थेट परिवारातूनच घरचा अहेर मिळाल्याने, किमान आता तरी त्यांनी या मुद्यांची दखल घ्यायला हवी. तसे झाल्यास जनता भामसंला निश्चितच धन्यवाद देईल!