शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

भामसंचा घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:02 IST

जुने ते सोने अशी म्हण मराठीत आहे. इतर भारतीय भाषांमध्ये अशा आशयाच्या म्हणी आहेत की नाहीत कोण जाणे; पण भारतीय माणूस इतिहासात रमतो, हे सत्य आहे.

जुने ते सोने अशी म्हण मराठीत आहे. इतर भारतीय भाषांमध्ये अशा आशयाच्या म्हणी आहेत की नाहीत कोण जाणे; पण भारतीय माणूस इतिहासात रमतो, हे सत्य आहे. आताच्या तुलनेत जुना काळ कसा चांगला, रम्य, वैभवशाली, समृद्ध होता, हे कथन करीत सुस्कारे सोडणे त्याला आवडते. अलीकडे मात्र, इतिहासातील गत सहा-सात दशकांच्या कालखंडात जे काही झाले ते सगळे टाकाऊ असल्याचा कांगावा करीत बदलून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाच्या नियोजनबद्ध विकासाचा कणा ठरलेल्या योजना आयोगाचा गाशा एक दिवस असाच गुंडाळण्यात आला आणि नीती आयोग अस्तित्वात आणण्यात आला. त्यावेळी जुन्या बाटलीत नवी दारू म्हणून विरोधकांनी त्याची संभावना केली; पण आता तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मातृ संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील भारतीय मजदूर संघानेच नीती आयोगाला धारेवर धरले आहे. केवळ नीती आयोगच नव्हे, तर नरेंद्र मोदी सरकारच्या एकूणच आर्थिक धोरणावर भामसंने सडकून टीका केली आहे. भामसंच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच नागपुरात पार पडली. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भामसंचे महामंत्री ब्रजेश उपाध्याय यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांची पार चिरफाड केली. काँग्रेसचीच आर्थिक धोरणे राबवित असल्याचा हल्ला, त्यांनी मोदी सरकारवर चढविला. गत काही दिवसांपासून मोदी सरकारवर चौतर्फा टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. राजकीय विरोधकांसोबतच विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि समाजमाध्यमांमध्ये सक्रिय ट्रोल असे सारेच मोदी सरकारवर तुटून पडत असताना, आता साक्षात परिवारातील संघटनेकडून झालेला हल्ला जिव्हारी लागणाराच म्हणायला हवा. त्यातही ऊठसूट काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा देणे सुरू असताना, संघ परिवारातील संघटनेनेच काँग्रेसची धोरणे राबवित असल्याची टीका करावी, यापेक्षा मोठा दैवदुर्विलास तो कोणता? संघ परिवाराची राजकीय शाखा असलेल्या भाजपाच्या सरकारवर टीका करण्यामागे भामसंची जी भूमिका असेल ती असो; पण उपाध्याय यांनी नेमक्या त्याच मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले आहे, जे मुद्दे विविध विचारवंत व अर्थतज्ज्ञांनी गत काही दिवसात मांडले आहेत. आर्थिक मंदी आणि थंडावलेली रोजगार निर्मिती हे त्यापैकी प्रमुख मुद्दे! पंतप्रधान मोदी व सरकारमधील इतर धुरीण या आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे साफ फेटाळून लावतात; पण आता थेट परिवारातूनच घरचा अहेर मिळाल्याने, किमान आता तरी त्यांनी या मुद्यांची दखल घ्यायला हवी. तसे झाल्यास जनता भामसंला निश्चितच धन्यवाद देईल!