शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

भिड्यांचा आंबा इंद्रदरबारात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:35 IST

स्वर्गलोकातील कृषिरत्नांनी आणि वैद्यकतज्ज्ञांनी भिड्यांच्या आंब्याचे त्रिलोकातील पेटंटवर दावा केल्याने एक नवा वाद इंद्रदरबाराच्या पटलावर आला होता.

- राजा मानेस्वर्गलोकातील कृषिरत्नांनी आणि वैद्यकतज्ज्ञांनी भिड्यांच्या आंब्याचे त्रिलोकातील पेटंटवर दावा केल्याने एक नवा वाद इंद्रदरबाराच्या पटलावर आला होता. भिड्यांच्या आंबे पुराणावर इंद्रलोकचा मराठीभूमीतील स्टार रिपोर्टर यमकेने बातम्यामागील बातम्या शोधून आपला रिपोर्ट महागुरू नारदांना सादर केला होता. राज यांच्या व्यंगचित्रापासून ते थेट भिडेभक्तांच्या पत्रकार परिषदेपर्यंतची खडान्खडा माहिती त्याने देऊनही या नव्या पेटंटवादाने यमके हैराण झाला होता. त्यातून मुक्ती मिळावी म्हणून अखेर त्याने नारदांना फोन केला अन् बोलू लागला...यमके- चरणस्पर्श करतो गुरुदेव! ‘भिड्यांचा आंबा’ या विषयात आता दम राहिलेला नाही. मग इंद्रदरबारात हा वाद कशासाठी?नारद - शिष्या, फळांच्या राजाचा विषय इतक्या सहजतेने कसा संपेल? चार हजार वर्षांचा इतिहास असलेला हा लाडका राजा आहे. आमीर खुसरोसारख्या शायरापासून अकबर बादशाहपर्यंत सर्व क्षेत्रातील हा लाडका आंबा आहे. मग त्याचे पेटंटही तेवढेच महत्त्वाचे ना!यमके - मग, तिथे भिड्यांच्या आंब्याच्या पेटंटचा काय संबंध?नारद - अरे, स्वर्गलोकातील दिग्गजांनी त्या पेटंटवर दावा केला, एवढ्यावर हा विषय थांबलेला नाही. भू-लोकी नव्या वादांना तोंड फुटल्याचे तुला ठाऊक कसे नाही? अरे, वंध्यत्व निवारण शास्त्रात आयुष्य झिजविणाऱ्या शेकडो डॉक्टरांनी या आंब्याच्या विरोधात आवाज उठविला आहे. केमिस्ट संघटनांनी हा आंबा आता आमच्या दुकानातही ठेवू द्या, अशी मागणी केली आहे. रामदेवबाबाही आता याच आंब्याचा ब्रँड घेऊन त्याचे मार्केटिंग करणार आहेत म्हणे! मोदींच्या भिडेप्रेमाचा आधार घेत ते पेटंट आपल्या आश्रमात नेण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणे!यमके - तरीही भिड्यांचा आंबा कल्पनेतला आणि स्वप्नातलाच आहे, हे कुणाला कसे समजत नाही?नारद - भिड्यांना शेतही नाही आणि आंब्याची बागही नाही तरीही त्यांनी सांगितलेल्या आंब्याची कोय उस्मानाबादच्या मोहित्यांच्या शेतातील आहे.यमके- असेल! त्याला एवढे का महत्त्व देता? आंबे खाऊन मुलं-बाळं झाली असे सांगणारे १८० कुटुंब कुठे आणि कशी आहेत?नारद- शिष्या, तू फक्त सरळ विचार करतोस. कोय उस्मानाबादची म्हणून भिड्यांच्या आंब्यांच्या पेटंटवर मराठवाड्याचा हक्क असल्याचा दावा केला जातोय. अशोकराव, धनुभाऊ, पंकजाताई, अमितभैय्यापासून ते खैरे-निलंगेकरांपर्यंत ही मागणी रेटण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याची वार्ता आहे.यमके - मग, आता मला कोणती असाईनमेंट देता?नारद - स्वत:चे शेत नाही व पर्यायाने आंब्यांची बागही नाही, असे असताना भिड्यांनी आंब्याच्या विषयाला जन्मीच का घातले? या प्रश्नाचे उत्तर शोध.यमके - मोदी कवचकुंडल आणि भीमा-कोरेगाव विषयांना बगल देण्यासाठी या विषयाचा जन्म झाला असेल गुरुदेव!नारद - शिवभक्तीवर बेंबीच्या देठापासून बोलणाºयाने विज्ञानाशी बंड करू नये. आपल्या अंधभक्तांना अंधश्रद्धेला मिठ्या मारण्यास भाग पाडू नये हे भिड्यांना कोण सांगणार? हाच संदेश इंद्रदरबारातील पेटंटवादावरही पडदा टाकेल.