शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

भिड्यांचा आंबा इंद्रदरबारात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:35 IST

स्वर्गलोकातील कृषिरत्नांनी आणि वैद्यकतज्ज्ञांनी भिड्यांच्या आंब्याचे त्रिलोकातील पेटंटवर दावा केल्याने एक नवा वाद इंद्रदरबाराच्या पटलावर आला होता.

- राजा मानेस्वर्गलोकातील कृषिरत्नांनी आणि वैद्यकतज्ज्ञांनी भिड्यांच्या आंब्याचे त्रिलोकातील पेटंटवर दावा केल्याने एक नवा वाद इंद्रदरबाराच्या पटलावर आला होता. भिड्यांच्या आंबे पुराणावर इंद्रलोकचा मराठीभूमीतील स्टार रिपोर्टर यमकेने बातम्यामागील बातम्या शोधून आपला रिपोर्ट महागुरू नारदांना सादर केला होता. राज यांच्या व्यंगचित्रापासून ते थेट भिडेभक्तांच्या पत्रकार परिषदेपर्यंतची खडान्खडा माहिती त्याने देऊनही या नव्या पेटंटवादाने यमके हैराण झाला होता. त्यातून मुक्ती मिळावी म्हणून अखेर त्याने नारदांना फोन केला अन् बोलू लागला...यमके- चरणस्पर्श करतो गुरुदेव! ‘भिड्यांचा आंबा’ या विषयात आता दम राहिलेला नाही. मग इंद्रदरबारात हा वाद कशासाठी?नारद - शिष्या, फळांच्या राजाचा विषय इतक्या सहजतेने कसा संपेल? चार हजार वर्षांचा इतिहास असलेला हा लाडका राजा आहे. आमीर खुसरोसारख्या शायरापासून अकबर बादशाहपर्यंत सर्व क्षेत्रातील हा लाडका आंबा आहे. मग त्याचे पेटंटही तेवढेच महत्त्वाचे ना!यमके - मग, तिथे भिड्यांच्या आंब्याच्या पेटंटचा काय संबंध?नारद - अरे, स्वर्गलोकातील दिग्गजांनी त्या पेटंटवर दावा केला, एवढ्यावर हा विषय थांबलेला नाही. भू-लोकी नव्या वादांना तोंड फुटल्याचे तुला ठाऊक कसे नाही? अरे, वंध्यत्व निवारण शास्त्रात आयुष्य झिजविणाऱ्या शेकडो डॉक्टरांनी या आंब्याच्या विरोधात आवाज उठविला आहे. केमिस्ट संघटनांनी हा आंबा आता आमच्या दुकानातही ठेवू द्या, अशी मागणी केली आहे. रामदेवबाबाही आता याच आंब्याचा ब्रँड घेऊन त्याचे मार्केटिंग करणार आहेत म्हणे! मोदींच्या भिडेप्रेमाचा आधार घेत ते पेटंट आपल्या आश्रमात नेण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणे!यमके - तरीही भिड्यांचा आंबा कल्पनेतला आणि स्वप्नातलाच आहे, हे कुणाला कसे समजत नाही?नारद - भिड्यांना शेतही नाही आणि आंब्याची बागही नाही तरीही त्यांनी सांगितलेल्या आंब्याची कोय उस्मानाबादच्या मोहित्यांच्या शेतातील आहे.यमके- असेल! त्याला एवढे का महत्त्व देता? आंबे खाऊन मुलं-बाळं झाली असे सांगणारे १८० कुटुंब कुठे आणि कशी आहेत?नारद- शिष्या, तू फक्त सरळ विचार करतोस. कोय उस्मानाबादची म्हणून भिड्यांच्या आंब्यांच्या पेटंटवर मराठवाड्याचा हक्क असल्याचा दावा केला जातोय. अशोकराव, धनुभाऊ, पंकजाताई, अमितभैय्यापासून ते खैरे-निलंगेकरांपर्यंत ही मागणी रेटण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याची वार्ता आहे.यमके - मग, आता मला कोणती असाईनमेंट देता?नारद - स्वत:चे शेत नाही व पर्यायाने आंब्यांची बागही नाही, असे असताना भिड्यांनी आंब्याच्या विषयाला जन्मीच का घातले? या प्रश्नाचे उत्तर शोध.यमके - मोदी कवचकुंडल आणि भीमा-कोरेगाव विषयांना बगल देण्यासाठी या विषयाचा जन्म झाला असेल गुरुदेव!नारद - शिवभक्तीवर बेंबीच्या देठापासून बोलणाºयाने विज्ञानाशी बंड करू नये. आपल्या अंधभक्तांना अंधश्रद्धेला मिठ्या मारण्यास भाग पाडू नये हे भिड्यांना कोण सांगणार? हाच संदेश इंद्रदरबारातील पेटंटवादावरही पडदा टाकेल.