शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

हेही नसे थोडके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 1:16 AM

व्यक्तिस्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार खºया अर्थाने सर्वसामान्यांना उपभोगता येत आहे का? या प्रश्नाचे उत्तर मागितले तर बहुतेक नाही असेच उत्तर मिळेल.

आज भारतीय स्वातंत्र्याचा ७० वा वाढदिवस साजरा करीत असताना भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार खºया अर्थाने सर्वसामान्यांना उपभोगता येत आहे का? या प्रश्नाचे उत्तर मागितले तर बहुतेक नाही असेच उत्तर मिळेल. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर काही निर्णय निश्चितच चांगले झाले, त्याचे परिणामही जाणवू लागले. नोटाबंदीच्या निर्णयाचा सुरुवातीला सर्वसामान्यांना फटका जाणवला असला तरी आता स्थिती सामान्य होऊ लागली आहे. पाकिस्तान, चीनसोबतचे संबंध ताणले असताना सरकारने खंबीर भूमिका घेतली त्याचेही स्वागत होत आहे. मात्र काही आघाड्यांवर सरकारला येत असलेले अपयश त्यामुळे नजरेआड करता येऊ शकत नाही. आज देशभरात हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तुम्हा आम्हा सर्वांचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला जगणे कठीण झाले आहे. ‘रोटी, कपडा, मकान’ हे आपल्या संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार त्यांना का मिळत नाहीत? बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना सुशिक्षित करण्याचे भरमसाठ कारखाने काढून शिक्षणसम्राट गब्बर झाले आहेत आणि होत आहेत. पण या कारखान्यातून बाहेर पडलेले देशातील सुमारे १२ कोटी सुशिक्षित तरुण (हा आकडा २०१५ चा आहे) मात्र आजही रस्त्यांवर वणवण फिरताना दिसत आहेत. सरकारने ‘राईट टू एज्युकेशन’ची सोय तर केली पण त्यांना ‘राईट टू जॉब’चा दिलासा देण्याची जबाबदारीही सरकारची आहे . ही जबाबदारी सरकार पार पाडत नसेल तर मग या रिकाम्या डोक्याच्या तरुणांनी देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा वेगळ्या मार्गाने उपयोग केला तर त्याला जबाबदार कोण? आज काश्मिरात काय स्थिती आहे. तेथील असंख्य बेकार तरुण-तरुणींनी अक्षरश: दहशतवाद्यांची ‘नोकरी’ पत्करली आहे. ऐकायला हे अविश्वसनीय आणि चमत्कारिक वाटेल पण हे वास्तव आहे. जम्मू काश्मिरात दहशतवादी कारवाया पार पाडताना अतिरेकी या तरुणांना हाताशी धरत आहेत. सुरक्षा पथकांवर दगडफेक करण्यासाठी या तरुणांना दिवसाकाठी ७०० रुपये दिले जात असल्याची माहिती आहे. कन्हैयाकुमारच्या आंदोलनात हजारो तरुण-तरुणींचा सहभाग असतो. सकल मराठा समाजाच्या मोर्चात लाखोंच्या संख्येने युवा वर्ग सामील झालेला दिसतो, तो केवळ हौस म्हणून नव्हे तर आपल्यातील असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी आणि आपले न्याय्य हक्क पदरात पाडून घेण्यासाठी ही तरुणाई रस्त्यावर उतरलेली असते. आता सरकार लोकांना दिलासा देणारे काही लोकोपयोगी निर्णय घेणार आहे. बार्कलेज इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सिद्धार्थ संन्याल यांच्या म्हणण्यानुसार मोदी सरकार आता येत्या १८ महिन्यांच्या काळात सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. ही पुढच्या निवडणुकांची तयारी म्हटले तरी उशिरा का होईना सरकारला सर्वसामान्यांचे हित आठवले हेही नसे थोडके.