शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

पक्षबदलू नेत्यांना शुभेच्छा

By अतुल कुलकर्णी | Updated: May 10, 2018 23:50 IST

तमाम पक्ष बदलू नेते हो, आणि त्यांना पक्षात पावन करणाऱ्यांनो, आपण विविध पक्षातील नेत्यांना ज्या सफाईने स्वत:च्या पक्षात घेत आहात तितकी सफाई तर स्वच्छ भारत अभियानातही नाही. या अत्यंत पवित्र कार्याचे वर्णन करण्यासाठी आम्हा पामरांकडे शब्दच नाहीत.

तमाम पक्ष बदलू नेते हो,आणि त्यांना पक्षात पावन करणाऱ्यांनो,आपण विविध पक्षातील नेत्यांना ज्या सफाईने स्वत:च्या पक्षात घेत आहात तितकी सफाई तर स्वच्छ भारत अभियानातही नाही. या अत्यंत पवित्र कार्याचे वर्णन करण्यासाठी आम्हा पामरांकडे शब्दच नाहीत. ज्या चार दोन लाख लोकांनी तुम्हाला मतं दिली त्यांच्या फुल्यावर फुल्या मारत तुम्ही बिनदिक्कत क्षणभरात जो परकाया पक्ष प्रवेश करता तसा तर या आधीच्या कोणत्याही देवदेवतांना जमला नसेल.ही एवढी सफाई येते कुठून तुमच्याकडे? विचार, भूमिका, जनताजनार्दनास दिलेला शब्द या असल्या तद्दन फालतू शब्दांना काहीही महत्त्व नसते, हे आपण यानिमित्ताने ज्या दमदारपणे जनतेला ठासून सांगितले त्याला तोड नाही. जाहीरनामे हे फक्त टाइमपास म्हणून वाचायचे असतात आणि निवडणुका संपल्या की त्याचा उपयोग गुंडाळी करुन चणे, शेंगदाणे आणि भेळ खाण्यासाठी किती मस्त होतो हे मतदार नावाच्या तथाकथित राजाला कसे कळणार..? काही नतद्रष्ट पत्रकार आणि सो कॉल्ड बुद्धिवादी वर्ग पक्षांतरावर काहीही बोलतो. हे असले लोक तत्त्वाच्या गोष्टी सांगतात. पण तत्त्वाने कुठं पोट भरत का साहेब. भूक लागली की अंबानी असो की चणेवाला, सगळ्यांना खायला भाजी, भाकरीच लागते. शिवाय सत्तेपुढं शहाणपण चालत नाही हे देखील या नतद्रष्ट मतदारांना आणि सो कॉल्ड बुद्धिजीवींना बिलकूल कळत नाही.पक्षांतर करणे किंवा दुसºया पक्षात जाणे यामागची भावनाच कुणी समजून घेत नाही. अनेकदा सत्तेत असणाºया पक्षातील एखाद्या नेत्याने मित्रत्वाच्या नात्याने, विरोधी पक्षात असणाºयास प्रेमाने फोन केला आणि साहेब, तुमची फाईल आमच्याकडे आलीय... चांगली आहे... पण मी काही कुणाला देणार नाही बरं का... कारण माझं तुमच्यावर विशेष प्रेम आहे... असं समजा म्हणाला तर आपण देखील त्यांचा नको का मान ठेवायला...? शेवटी आपली संस्कृती जपायला पाहिजे की नाही...? आपल्या नेत्यांनी त्या फोन करणाºयाच्या अतीव प्रेमापोटी, तात्काळ आपला पक्ष सोडला, दुसºया पक्षात प्रवेश केला की हे बोरुबहाद्दर लगेच त्यावर भलेमोठे भाष्य करायला तयार होतात. पण मला एक सांगा, तुमच्याएवढी मैत्री अन्य कोणत्या ठिकाणी शोधून तरी सापडते का साहेब...?मला सांगा, आता सत्तेतील एका सहयोगी पक्षाने विरोधात असणाºया एका पक्षाला जाहीर पाठिंबा दिला तर बिघडलं कुठे? पण नाही त्यातही हे लगेच काडी करत राहतात. नेत्यांना म्हणे, साधनसुचिता राहिलेली नाही, असेही सांगतात. हे असले अवघड शब्द कधी कामाला येत नाहीत. शेवटी सत्तेत असणारे विरोधकांचे मित्रच कामाला येतात, हे कसे काय विसरतात हे लोक कोणास ठावूक...? साने गुरुजींचा जमाना जाऊन आता नाणे गुरुजींचा जमाना आला हे देखील यांना कळत नाही... तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जे करताय ते अगदी योग्य आहे. असेच पक्ष बदलत राहा, जनता आपल्याशिवाय जाणार कुठे? फुल्या, फुल्या मारत आपल्यालाच मतदान करणार आहे. तेव्हा आॅल दि बेस्ट साहेबहो... 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या