शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

पक्षबदलू नेत्यांना शुभेच्छा

By अतुल कुलकर्णी | Updated: May 10, 2018 23:50 IST

तमाम पक्ष बदलू नेते हो, आणि त्यांना पक्षात पावन करणाऱ्यांनो, आपण विविध पक्षातील नेत्यांना ज्या सफाईने स्वत:च्या पक्षात घेत आहात तितकी सफाई तर स्वच्छ भारत अभियानातही नाही. या अत्यंत पवित्र कार्याचे वर्णन करण्यासाठी आम्हा पामरांकडे शब्दच नाहीत.

तमाम पक्ष बदलू नेते हो,आणि त्यांना पक्षात पावन करणाऱ्यांनो,आपण विविध पक्षातील नेत्यांना ज्या सफाईने स्वत:च्या पक्षात घेत आहात तितकी सफाई तर स्वच्छ भारत अभियानातही नाही. या अत्यंत पवित्र कार्याचे वर्णन करण्यासाठी आम्हा पामरांकडे शब्दच नाहीत. ज्या चार दोन लाख लोकांनी तुम्हाला मतं दिली त्यांच्या फुल्यावर फुल्या मारत तुम्ही बिनदिक्कत क्षणभरात जो परकाया पक्ष प्रवेश करता तसा तर या आधीच्या कोणत्याही देवदेवतांना जमला नसेल.ही एवढी सफाई येते कुठून तुमच्याकडे? विचार, भूमिका, जनताजनार्दनास दिलेला शब्द या असल्या तद्दन फालतू शब्दांना काहीही महत्त्व नसते, हे आपण यानिमित्ताने ज्या दमदारपणे जनतेला ठासून सांगितले त्याला तोड नाही. जाहीरनामे हे फक्त टाइमपास म्हणून वाचायचे असतात आणि निवडणुका संपल्या की त्याचा उपयोग गुंडाळी करुन चणे, शेंगदाणे आणि भेळ खाण्यासाठी किती मस्त होतो हे मतदार नावाच्या तथाकथित राजाला कसे कळणार..? काही नतद्रष्ट पत्रकार आणि सो कॉल्ड बुद्धिवादी वर्ग पक्षांतरावर काहीही बोलतो. हे असले लोक तत्त्वाच्या गोष्टी सांगतात. पण तत्त्वाने कुठं पोट भरत का साहेब. भूक लागली की अंबानी असो की चणेवाला, सगळ्यांना खायला भाजी, भाकरीच लागते. शिवाय सत्तेपुढं शहाणपण चालत नाही हे देखील या नतद्रष्ट मतदारांना आणि सो कॉल्ड बुद्धिजीवींना बिलकूल कळत नाही.पक्षांतर करणे किंवा दुसºया पक्षात जाणे यामागची भावनाच कुणी समजून घेत नाही. अनेकदा सत्तेत असणाºया पक्षातील एखाद्या नेत्याने मित्रत्वाच्या नात्याने, विरोधी पक्षात असणाºयास प्रेमाने फोन केला आणि साहेब, तुमची फाईल आमच्याकडे आलीय... चांगली आहे... पण मी काही कुणाला देणार नाही बरं का... कारण माझं तुमच्यावर विशेष प्रेम आहे... असं समजा म्हणाला तर आपण देखील त्यांचा नको का मान ठेवायला...? शेवटी आपली संस्कृती जपायला पाहिजे की नाही...? आपल्या नेत्यांनी त्या फोन करणाºयाच्या अतीव प्रेमापोटी, तात्काळ आपला पक्ष सोडला, दुसºया पक्षात प्रवेश केला की हे बोरुबहाद्दर लगेच त्यावर भलेमोठे भाष्य करायला तयार होतात. पण मला एक सांगा, तुमच्याएवढी मैत्री अन्य कोणत्या ठिकाणी शोधून तरी सापडते का साहेब...?मला सांगा, आता सत्तेतील एका सहयोगी पक्षाने विरोधात असणाºया एका पक्षाला जाहीर पाठिंबा दिला तर बिघडलं कुठे? पण नाही त्यातही हे लगेच काडी करत राहतात. नेत्यांना म्हणे, साधनसुचिता राहिलेली नाही, असेही सांगतात. हे असले अवघड शब्द कधी कामाला येत नाहीत. शेवटी सत्तेत असणारे विरोधकांचे मित्रच कामाला येतात, हे कसे काय विसरतात हे लोक कोणास ठावूक...? साने गुरुजींचा जमाना जाऊन आता नाणे गुरुजींचा जमाना आला हे देखील यांना कळत नाही... तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जे करताय ते अगदी योग्य आहे. असेच पक्ष बदलत राहा, जनता आपल्याशिवाय जाणार कुठे? फुल्या, फुल्या मारत आपल्यालाच मतदान करणार आहे. तेव्हा आॅल दि बेस्ट साहेबहो... 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या