शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

पक्षबदलू नेत्यांना शुभेच्छा

By अतुल कुलकर्णी | Updated: May 10, 2018 23:50 IST

तमाम पक्ष बदलू नेते हो, आणि त्यांना पक्षात पावन करणाऱ्यांनो, आपण विविध पक्षातील नेत्यांना ज्या सफाईने स्वत:च्या पक्षात घेत आहात तितकी सफाई तर स्वच्छ भारत अभियानातही नाही. या अत्यंत पवित्र कार्याचे वर्णन करण्यासाठी आम्हा पामरांकडे शब्दच नाहीत.

तमाम पक्ष बदलू नेते हो,आणि त्यांना पक्षात पावन करणाऱ्यांनो,आपण विविध पक्षातील नेत्यांना ज्या सफाईने स्वत:च्या पक्षात घेत आहात तितकी सफाई तर स्वच्छ भारत अभियानातही नाही. या अत्यंत पवित्र कार्याचे वर्णन करण्यासाठी आम्हा पामरांकडे शब्दच नाहीत. ज्या चार दोन लाख लोकांनी तुम्हाला मतं दिली त्यांच्या फुल्यावर फुल्या मारत तुम्ही बिनदिक्कत क्षणभरात जो परकाया पक्ष प्रवेश करता तसा तर या आधीच्या कोणत्याही देवदेवतांना जमला नसेल.ही एवढी सफाई येते कुठून तुमच्याकडे? विचार, भूमिका, जनताजनार्दनास दिलेला शब्द या असल्या तद्दन फालतू शब्दांना काहीही महत्त्व नसते, हे आपण यानिमित्ताने ज्या दमदारपणे जनतेला ठासून सांगितले त्याला तोड नाही. जाहीरनामे हे फक्त टाइमपास म्हणून वाचायचे असतात आणि निवडणुका संपल्या की त्याचा उपयोग गुंडाळी करुन चणे, शेंगदाणे आणि भेळ खाण्यासाठी किती मस्त होतो हे मतदार नावाच्या तथाकथित राजाला कसे कळणार..? काही नतद्रष्ट पत्रकार आणि सो कॉल्ड बुद्धिवादी वर्ग पक्षांतरावर काहीही बोलतो. हे असले लोक तत्त्वाच्या गोष्टी सांगतात. पण तत्त्वाने कुठं पोट भरत का साहेब. भूक लागली की अंबानी असो की चणेवाला, सगळ्यांना खायला भाजी, भाकरीच लागते. शिवाय सत्तेपुढं शहाणपण चालत नाही हे देखील या नतद्रष्ट मतदारांना आणि सो कॉल्ड बुद्धिजीवींना बिलकूल कळत नाही.पक्षांतर करणे किंवा दुसºया पक्षात जाणे यामागची भावनाच कुणी समजून घेत नाही. अनेकदा सत्तेत असणाºया पक्षातील एखाद्या नेत्याने मित्रत्वाच्या नात्याने, विरोधी पक्षात असणाºयास प्रेमाने फोन केला आणि साहेब, तुमची फाईल आमच्याकडे आलीय... चांगली आहे... पण मी काही कुणाला देणार नाही बरं का... कारण माझं तुमच्यावर विशेष प्रेम आहे... असं समजा म्हणाला तर आपण देखील त्यांचा नको का मान ठेवायला...? शेवटी आपली संस्कृती जपायला पाहिजे की नाही...? आपल्या नेत्यांनी त्या फोन करणाºयाच्या अतीव प्रेमापोटी, तात्काळ आपला पक्ष सोडला, दुसºया पक्षात प्रवेश केला की हे बोरुबहाद्दर लगेच त्यावर भलेमोठे भाष्य करायला तयार होतात. पण मला एक सांगा, तुमच्याएवढी मैत्री अन्य कोणत्या ठिकाणी शोधून तरी सापडते का साहेब...?मला सांगा, आता सत्तेतील एका सहयोगी पक्षाने विरोधात असणाºया एका पक्षाला जाहीर पाठिंबा दिला तर बिघडलं कुठे? पण नाही त्यातही हे लगेच काडी करत राहतात. नेत्यांना म्हणे, साधनसुचिता राहिलेली नाही, असेही सांगतात. हे असले अवघड शब्द कधी कामाला येत नाहीत. शेवटी सत्तेत असणारे विरोधकांचे मित्रच कामाला येतात, हे कसे काय विसरतात हे लोक कोणास ठावूक...? साने गुरुजींचा जमाना जाऊन आता नाणे गुरुजींचा जमाना आला हे देखील यांना कळत नाही... तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जे करताय ते अगदी योग्य आहे. असेच पक्ष बदलत राहा, जनता आपल्याशिवाय जाणार कुठे? फुल्या, फुल्या मारत आपल्यालाच मतदान करणार आहे. तेव्हा आॅल दि बेस्ट साहेबहो... 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या